संघ परिवार कोणत्यातरी बहाण्याने सतत मुसलमानांना हिंदूंचा शत्रू म्हणून प्रस्तुत करत असतो. संघ परिवाराची राजकीय संघटना असलेल्या भाजपचे सरकार एकीकडे श्रीमंतांच्या फायद्यासाठी जनतेला मिळत असलेल्या सुविधांमध्ये कपात करत चालली आहे, तर दुसरीकडे अनेक प्रकारच्या खोटारड्या मुद्यांवर जोर देत आहे जेणेकरून लोक आपापसात लढत रहावेत आणि यांच्या लूटीवर प्रश्नच उपस्थित होऊ नये. तरूणांना या विरुद्ध उठावेच लागेल नाहीतर देश भयंकर विध्वंसाकडे चालू लागला आहे. जनतेला हे समजवावेच लागेल की त्यांच्या बरबादीचे कारण एखादा दुसरा देश किंवा धर्म नाही तर लूट आणि अन्यायावर टिकलेली आजची व्यवस्था आहे.
Author: नौजवान भारत सभा
भगतसिंह – हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा जाहीरनामा
भारतीय भांडवलदारवर्ग आपल्याच जनतेचा विश्वासघात करून त्याच्या मोबदल्यात परकीय भांडवलदारांकडून सरकारात काही फुटकळ वाटा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच कष्टकरी वर्गाच्या सर्व आशा आता समाजवादावर केंद्रीत झाल्या आहेत. त्यातूनच संपूर्ण स्वातंत्र्य मिळवण्याच्या, सर्व भेदभाव व विशेषाधिकार नष्ट करण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता येणार आहे. देशाचे भवितव्य आता तरुणांच्या खांद्यावर आहे. तेच या धरतीचे सुपुत्र आहेत. हालअपेष्टा सहन करण्याची त्यांची तयारी, त्यांचे निडर शौर्य आणि आत्मबलिदानाची उसळती भावना हेच सांगतात, की भारताचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित आहे. एका अनुभूतीपूर्ण क्षणी देशबंधू दास म्हणाले होते की, “युवक हे भारतमातेचा मानबिंदू आणि आशास्थान दोन्ही आहेत. या आंदोलनाच्या मागे त्यांची प्रेरणा, त्यांचे बलिदान आणि त्यांचा विजय आहे. हाती मशाल घेऊन स्वातंत्र्याच्या मार्गावर निघालेले आघाडीचे सैनिक हेच आहेत. ते मुक्तीच्या मार्गावरील तीर्थयात्री आहेत.”
भगतसिंह – बॉॅम्बचे तत्तवज्ञान
हिंसा या शब्दाचा अर्थ आहे, अन्यायासाठी केला गेलेला बलप्रयोग. परंतु क्रांतिकारकांचा तर हा मुळीच उद्देश नाही. दुसऱ्या बाजूला अहिंसेचा सामान्यतः जो अर्थ समजला जातो, तो म्हणजे आत्मिक शक्तीचा सिद्धांत. त्याचा उपयोग व्यक्तिगत तसेच राष्ट्रीय अधिकार मिळवण्यासाठी केला जातो. आत्मक्लेशाद्वारे शेवटी आपल्या विरोधकाचे हृदय परिवर्तन होऊ शकेल अशी अपेक्षा ठेवली जाते.
भगतसिंह – बॉम्ब प्रकरणात सत्र न्यायालयात निवेदन
क्रांतीच्या ध्येयपूर्तीसाठी एक भयंकर युद्ध पेटणे अनिवार्य आहे. सर्व बंधनांना व अडथळ्यांना तुडवून पुढे जाणाऱ्या त्या युद्धाच्या शेवटी, सर्वहारा वर्गाच्या सर्वाधिकारशाहीची स्थापना होईल. ही सर्वाधिकारशाहीच क्रांतीच्या ध्येयाची पूर्ती करण्याचा मार्ग प्रशस्त बनवेल. क्रांती हा मानवजातीचा जन्मजात अधिकार आहे, जो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. स्वातंत्र्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. श्रमिक वर्गच समाजाचा खरा पोशिंदा आहे. जनतेच्या सर्वंकष सत्तेची स्थापना हे श्रमिक वर्गाचे अंतिम उद्दिष्ट आहे.
भगतसिंह – विद्यार्थी आणि राजकारण
विद्यार्थ्यांचे मुख्य काम शिक्षण घेणे हे आहे, हे आम्हांला मान्य आहे आणि त्यांनी आपले पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करावे; पण देशाच्या सद्य:स्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्याचे उपाय यांचा विचार करण्याची क्षमता विकसित करणे याचा शिक्षणात समावेश असू नये? आणि जर असे नसेल, तर जे शिक्षण फक्त कारकूनी करण्यासाठी घेतले जाते, त्या शिक्षणालाही आम्ही निरुपयोगी मानतो. मग अशा शिक्षणाची गरजच काय? काही महाचतुर लोक असे म्हणतात, “मुला, तु राजकारण बघून जरूर शिक आणि विचार कर, पण प्रत्यक्ष राजकारणात कोणत्याही प्रकारचा सहभाग घेऊ नकोस. तू अधिक लायक बनलास तर तेच देशाच्या दृष्टीने फायद्याचे आहे.”
गौरी लंकेश यांचे शेवटचे संपादकीय – खोट्या बातम्यांच्या (फेक न्यूज)च्या काळात
क्रांतिकारी लोकस्वराज्य अभियान : भगतसिंहाचे स्वप्न अपूर्ण, तरुण, कष्टकरी करतील पूर्ण
सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्रांतीचे हे कार्य मोजके धाडसी तरुण नाही करू शकत. हे कार्य व्यापक कष्टकरी जनतेची एकजूट आणि संघटनेशिवाय होऊ शकत नाही. सामान्य जनतेच्या भागीदारीशिवाय ते होऊ शकत नाही. या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही प्रामुख्याने तरुणांना करीत आहोत. इतिहासात अवरोधाचा बर्फ नेहमीच तरुणांच्या रक्तांच्या उष्णतेने वितळला आहे.
भगत सिंह – धर्म आणि आपला स्वातंत्र्य संग्राम
प्रश्न हा आहे की धर्माला घरापुरते मर्यादित ठेवले तरी लोकांच्या हृदयातील भेदभाव वाढत नाहीत का? देशाने संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय गाठण्यावर धर्माचा काही परिणाम होत नाही? आजकाल संपूर्ण स्वातंत्र्याचे उपासक असलेले सद्गृहस्थ धर्माला बौद्धिक गुलामी म्हणतात. त्यांचे असे म्हणणे आहे की ईश्वर हा सर्वशक्तिमान आहे, मानव मात्र काहीच नाही, केवळ मातीची कठपुतळी आहे, असे मुलांना सतत सांगणे म्हणजे मुलांना कायमस्वरूपी कमकुवत बनवणे होय. त्यांची मानसिक शक्ती आणि त्यांचा आत्मविश्वासच नष्ट करणे आहे.
कष्टकरी सामान्य जनतेच्या आरोग्याचा पंचनामा आणि मोदी-योगीच्या जुमलेबाजीचं नग्न वास्तव
खरंतरं संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच आज आजारी आहे. भारतीय राज्यघटना भाग ३ कलम २१ मध्ये ‘जीवितांच्या रक्षणाचा अधिकार’ तर देते, पण जगण्यासाठीच्या पूर्वअटी म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षणाच्या जबाबदारीतून अंग बाहेर काढत आहे. सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या(पीपीपी) नावाखाली आता आरोग्यसेवेच खाजगीकरण होतंय. परीणामी आरोग्य सेवा महाग होणं आलंच. एका बाजूला १ टक्के लोकांकडे ५८ टक्के संपत्ती केंद्रित झाल्याच अहवाल आहे, अन्न धान्याबाबत स्वयंपूर्ण होण्याच्या वल्गना केल्या जाताहेत, तर दुसऱ्या बाजूला दिवसाला ५००० मुलं कुपोषणामूळं व भुकेमूळं मरताहेत. भांडवलशाहीत प्रत्येक गोष्ट पैशाच्या बाजारात तोलली जाते व कामगार-कष्टकरी सामान्य गरीब जनतेच्या जीवांची पर्वा या व्यवस्थेला नक्कीच नाही.
जाती अंताचा मार्ग सुधारवाद, संविधानवाद नाही तर “क्रांतीकारी वर्गीय एकजूट” आहे
आज भारत असंख्य जातींमध्ये वाटला गेला आहे. प्रत्येक जातीकडे आपल्याहून खालची म्हणायला एक जात आहे. देशात जाती आधारीत असंख्य संघटना आहेत. दर दिवशी दलित विरोधी हिंसाचार चालू असतो. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगांच्या रिपोर्टनुसार भारतात दर दिवशी तीन दलित स्त्रियांवर बलात्कार होतो. दिवसाला दोन दलितांची हत्या होते. उच्च शिक्षण संस्थांमध्ये दलित विद्यार्थ्यांप्रति होणारा भेदभाव किती आहे हे या तथ्यांवरून समजते की २००७ पासुन उत्तर भारत आणि हैदराबाद येथील विद्यापीठांत झालेल्या २५ आत्महत्यापैकी २३ आत्महत्या या दलित विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
