पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशातील न्यायप्रिय जनता दुःखी आणि रागात आहे. पण एक विषारी गट आहे ज्याच्या चेहऱ्यावर या अमानुष कृत्यानंतरही धूर्त हास्य झळकत आहे. संघ परिवार आणि भाजपशी जोडलेल्या विविध लंपट गटांचे चेहरे या दिवसांत खुश दिसत आहेत. त्यांना मुस्लिमांवर हल्ला करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. विविध राज्यांतून काश्मीरी विद्यार्थी आणि मुस्लिम कामगारांवर हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत. धर्माच्या नावाने होणाऱ्या संघी दहशतवादाच्या सर्व घटनांकडे डोळेझाक करून झोपण्याचे सोंग करणारा गोदी मीडिया या दहशतवादी हल्ल्याला धर्मवादी रंग देण्यात गुंतला आहे. भाजपने पाळलेला आयटी सेल विविध प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसारित करण्यात रमला आहे. त्याद्वारे या हल्ल्याच्या विरोधात उभा राहिलेल्या प्रत्येक काश्मीरीला दहशतवादी ठरवण्यात आणि देशातील प्रत्येक मुस्लिमाला संशयाच्या चौकटीत ढकलण्यात येत आहे. पाकिस्तानचे भूत उभे करून प्रत्येक काश्मीरी आणि मुस्लिमाला हिंदुस्थानचा शत्रू ठरवून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. आम्ही देशातील प्रत्येक न्यायप्रिय विद्यार्थी, तरुण आणि सामान्य जनतेला आवाहन करतो की भाजप आणि संघ परिवाराच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचले पाहिजे. यांच्या नेत्यांची मुले परदेशात शिकत आहेत आणि चांगल्या पदांवर स्थायिक झाली आहेत, पण बेरोजगारीचा मार सहन करणाऱ्या आपल्या भावंडांना आणि मुलामुलींना हे लोक नष्ट करण्यास मुळीच संकोच करणार नाहीत. म्हणून मित्रांनो, शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा आणि आवास यासारख्या आपल्या मूलभूत हक्कांसाठी एकत्र या; धर्मवादी फॅशिस्टांच्या प्रचाराला बळी पडून आपल्याच भावंडांशी वैर बाळगू नका. काश्मीरी आणि गरीब, स्थलांतरित मुस्लिमांवर हल्ले करणाऱ्या गुंडांचा आपल्या एकतेच्या बळावर सामना करा, कारण अन्यायाला मूकपणे पाहणे म्हणजे अन्यायात सहभागी होण्यासारखेच आहे.
Category: पत्रक
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी इकडे आड तिकडे विहीर!! तलाठी भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करून सर्व दोषींवर कारवाई झालीच पाहिजे!
बेरोजगारीचा फास दिवसेंदिवस आणखी आवळला जात असताना, हजारो तरुण व विद्यार्थी तणाव व भविष्याच्या असुरक्षिततेपायी आत्महत्येला जवळ करत असताना भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ई. विविध पक्षांची भांडवली सरकारे मात्र त्यांच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट मित्रांना, उद्योगपतींना सवलती देण्यात मग्न आहेत. हे सर्व पक्ष दिखाव्यापुरते अशा मुद्यांवर आंदोलने करतात, परंतु या सर्वांनी सत्तेत असताना हीच धोरणे राबवली आहेत, कारण त्यांच्या बोलवत्या धन्यांची म्हणजे भांडवलदार वर्गाची तीच इच्छा आहे. त्यांच्या फायद्यासाठी कंत्राटीकरण, खाजगीकरण पुढे रेटले जात आहे आणि कोट्यवधी तरुणांच्या आयुष्याशी खेळ केला जात आहे. म्हणूनच सध्या सुरू असलेले आंदोलन हे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना धरून आहे. पण हे आंदोलन फक्त तलाठी भरतीमधील घोट्याळ्यापुरते मर्यादित नसले पाहिजे. सध्या वाढत असलेली बेरोजगारी, सरकारी नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हे प्रश्न आज सर्वच तरुणांसमोर आ वासून उभे आहेत. म्हणूनच सध्या सुरू असलेल्या आंदोलनाला व्यापक करत सर्व विद्यार्थी तरुणांनी आज एकत्र येणे गरजेचे आहे. मालक वर्गासाठी चालत असलेल्या या भांडवली सत्तेचे खरे चरित्र ओळखणे आज विद्यार्थी युवकांसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आपले खरे हित लक्षात घेऊन जाती-धर्माचे सगळे भेद बाजूला सारत विद्यार्थी-युवकांनी आज सर्वांसाठी शिक्षण व रोजगाराच्या अधिकाराच्या योग्य मागणीभोवती संघटित होणे आज काळाची गरज आहे, अन्यथा विद्यार्थी तरुणांचे जीव भांडवली पक्षांच्या राजकारणाला बळी पडत राहतील.
क्रांतिकारी शहीद राजगुरू यांच्या १११ व्या जयंती निमित्त
राजगुरू यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे स्वप्न एक शोषणमुक्त, समतामूलक, धर्मनिरपेक्ष, समाजाचे निर्माण करणे हे होते. पुढे चालून एका निश्चित वैचारिक विकासानंतर आपले ध्येय स्पष्टपणे आपल्या संघटनेच्या नावात असायला पाहिजे. त्यामुळे ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेच्या नावात बदल करत सोशलिस्ट (समाजवाद) शब्द या सर्व क्रांतिकारकांनी जोडला आणि या क्रांतिकारी संघटनेचे नाव ‘हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ म्हणजे एच.एस.आर.ए. (HSRA) असे ठेवण्यात आले. फक्त स्वतंत्र नाही तर नफ्या-तोट्यावर आधारित समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन, कामगार वर्गीय सत्तेचे निर्माण, म्हणजेच ‘क्रांती’ हे त्यांचे ध्येय होते.
झुंजार जनएकजूट अभियान – गरीबी, शिक्षणाचा अभाव ,बेरोजगारीच्या कारणांना ओळखा!
शहिदे आजम भगतसिंह यांनी म्हटले होते की सामान्य गरीब कष्टकरी जनतेचा एकच धर्म असतो – वर्गीय एकजूट! आपल्याला सर्व प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना नाकारावे लागेल आणि त्यांच्या विरोधात लढावे लागेल. आपल्याला शपथ घ्यावी लागेल की आपण आपल्या गल्लीबोळात, मोहल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना सांप्रदायिक उन्माद भडकवू देणार नाही आणि त्यांना पिटाळून लावू!
सावित्रीबाई फुले जयंती – नव्या ज्ञानबंदीच्या विरोधात, सर्वांना मोफत शिक्षणासाठी, कटिबध्द होऊयात…!
सावित्रीबाई स्वतःच्या प्रयत्नातून साक्षर झाल्या, पुढे शिक्षकही झाल्या. सामाजिक प्रश्नांबाबत तर त्यांनी अतिशय क्रांतिकारी भूमिका घेतल्याच, पण जोतिराव फुलेच्या मृत्यूनंतर मागे हटल्या नाहीत, तर अंतिम श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहिल्या आणि शेवटीसुद्धा पुण्यातल्या प्लेगच्या साथीत लोकांची सेवा करतानाच त्यांना मरण आले. त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्याला दिशा विद्यार्थी संघटना क्रांतिकारी अभिवादन करत आहे व सर्वांना मोफत शिक्षण-सर्वांना काम मिळवण्याच्या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे.
शहीद भगतसिंहाच्या जन्मदिवसा (28 सप्टेंबर) निमित्ताने नौजवान भारत सभेचे विशेष सदस्यता अभियान
स्वातंत्र्याच्या ज्या रोपट्याला भगतसिंहांसारखा महान शहीदांनी आपल्या रक्ताने शिपलं होतं ते सुकू लागले आहे. या शहीदांची स्वप्ने आमच्या डोळ्यात डोकावत आहेत. चला, या शहीदांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याच्या संघर्षात प्राणपणाने सामील होऊयात. हे पत्रक केवळ नौजवान भारत सभेचा परिचय नाही, तर आवाहन आहे कि तुम्ही नौजवान भारत सभेचे सदस्य बना आणि भगतसिंहांच्या विचारांना पुढे न्या.
कोणीच वाचणार नाही
काय नोटबंदीमुळे मृत्यू होताना जात धर्म विचारला होता काय? जीएसटी लागू झाल्यानंतर जेवढे उद्योग बरबाद झाले आणि त्यामुळे कितीतरी लोक मजबुर होऊन रस्त्यावर आलेत त्यात किती हिंदू होते? मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे देशात जी हलाखी पसरली आहे तीने हिंदू-मुस्लिम भेद नाही केला! परंतु जेव्हा मत घ्यायची वेळ येते तेव्हा हिंदू-मुस्लिम विभाजन पद्धतशीरपणे केले जाते.
महाराष्ट्रातील दलितांवर अन्याय अत्याचारांच्या घटनांचा विरोध करा! जातिव्यवस्थे विरोधात आवाज बुलंद करा!
जातीव्यवस्था आणि जातिगत अन्याय अत्याचार आपल्या समाजावरील एक घाणेरडा डाग आहे आणि हा डाग दिवसेंदिवस जास्तच दुर्गंधी पसरवत आहे. गेल्या 10 जूनला जळगाव येथील जामनेर तालुक्यात वाकडी गावांमध्ये दोन मातंग तरूणांना विहिरीत पोहल्याच्या कारणावरून फक्त बेदम मारलेच नाही तर नागडे करून पाहूर गावामध्ये फिरवत शेतात घेऊन गेले व व्हिडिओ बनवून व्हाट्सअप वर प्रसारित देखील करण्यात आला.
खूनी वेदांता, खूनी विकास! तुतिकोरिन (तुतुकुडी) येथील गोळीबाराची घटना आपल्या मानवीय अस्तित्वाला आव्हान आहे!
वेदांता ही लंडन मध्ये स्थित असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे आणि प्रदूषण करण्यासाठी जगभरात कुख्यात आहे. या कंपनी विरोधात हवा, पाणी आणि आसपासचे वातावरण प्रदूषित करण्याविरोधात झांबिया देशातील 2000 गावांनी सुध्दा केस ठोकली आहे. गोळीबारात मेलेले आणि प्रदूषणाने मेलेले सर्व लोक भारतीयच होते, पण त्यांच्यासाठी आता भाजपाई आणि संघी लोकांना भारतमाता आठवणार नाही कारण वेदांताची ‘देणगी’ यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे.
बलात्काऱ्यांच्या समर्थनात आंदोलने: न्यायाची नवीन संघी, भाजपाई व्याख्या!
भाजप अशा एका पक्षाच्या रुपात समोर आली आहे जिच्यामध्ये सर्व पक्षांमधील गुंड, मवाली, हत्यारे आणि बलात्कारी येऊन शरण घेत आहेत. या देशाचे प्रधान सेवक उर्फ चौकीदाराने नुकतेच आपली छप्पन इंचाची छाती फुलवत म्हटले आहे की कमळाचे फूल देशात सगळीकडे पसरत आहे पण खरेतर हे फूल महिला, दलित, अल्पसंख्यांक आणि मजूरांच्या रक्ताने सिंचित आहे. एका बाजूला भयंकर बेरोजगारी आणि दुसरीकडे अशा घटना दाखवतात की सर्व देशामध्ये फासीवादाचे संकट गडद होत आहे. गोरक्षा, लव्ह-जिहाद, भारत माता की जय, राम मंदिराचे फासीवादी राजकारण फक्त आणि फक्त सामान्य जनतेला विभागण्यासाठी आणि आपापसात लढवण्यासाठी केले जात आहे. त्यांची देशाची व्याख्या म्हणजे फक्त कागदावर बनलेला एक नकाशा आहे. वाढत्या निरंकुश स्त्री-विरोधी अपराधांवरून हे जाहीर आहे की संघी लोकांच्या देशाच्या व्याख्येमध्ये महिलांचे स्थान फक्त एका भोगवस्तूचे आहे. भांडवली व्यवस्था आणि पितृसत्तेमुळे आपला समाज ज्या स्त्री विरोधी मानसिकतेने ग्रसित आहे, त्याच्यामुळे फासीवादाच्या या काळात स्त्रियांवर हल्ले अजूनच पाशवी आणि कृर होत चालले आहेत.