नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे काल दिनांक 23 मार्च रोजी शहीद स्मृती संकल्प अभियानाचे रॅली काढून समापन! 23 मार्च, शहीद दिवस, हा तो दिवस आहे ज्या दिवशी भगतसिंह, सुखदेव राजगुरू देशासाठी शहीद झाले होते. त्याच्या स्मरणार्थ अणि त्यांचा क्रांतिकारी वारसा आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी नौजवान भारत सभा, मुंबई ने शहीद स्मृती संकल्प अभियान यशस्वीरीत्या पार पाडले. ही रॅली मानखुर्द च्या कामगार वस्त्यांमधून काढण्यात आली. रॅलीची सुरवात पीएमजीपीच्या बाजारातून झाली. सुरवातीलाच क्रांतिकारी घोषणांनी पीएमजीपी चा बाजार दणाणून निघाला. रॅलीदरम्यान पत्रके, भाषण अणि क्रांतिकारी गीते गायली गेली. आपल्या भाषणातून नौभासच्या सदस्यांनी भगतसिंह…
Category: भगतसिंह
शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिवसानिमित्त – स्मृती संकल्प अभियानाचे आयोजन अहिल्यानगर
शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिवसानिमित्त – स्मृती संकल्प अभियानाचे आयोजन अहिल्यानगर नौजवान भारत सभाच्या वतीने शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहादत दिनानिमित्त (23 मार्च) तीन दिवसीय “शहीद स्मृती संकल्प अभियान” आयोजित करण्यात आले. हे अभियान शहरातील विविध भागांत राबवण्यात आले, ज्यामध्ये ‘बाईचीच चूक’ या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. या पथनाट्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानाच्या माध्यमातून शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या बलिदानाचा इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे योगदान तसेच त्यांच्या क्रांतिकारी विचारधारेचा वारसा लोकांपर्यंत पोहोचवला गेला. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य हे केवळ ब्रिटिश सत्तेपासून मुक्ती नव्हते, तर त्यांचा…
शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त – चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम
शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त – चर्चासत्र व सांस्कृतिक कार्यक्रम दि. 23 मार्च, अहिल्यानगर – नौजवान भारत सभेच्या वतीने शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या शहादत दिनानिमित्त सिद्धार्थनगर येथे चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात “भगतसिंह तू जिंदा है” आणि “आरे नौजवान” या क्रांतिकारी गीतांनी करण्यात आली. त्यानंतर साथी सायली हिने कार्यक्रमाच्या उद्देशाची आणि भूमिका स्पष्ट करत प्रास्ताविक केले. कार्यक्रमादरम्यान “बाईचीच चू क” या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर साथी अतुल यांनी “शहीदांचा वैचारिक वारसा आणि आजच्या काळातील प्रासंगिकता” या…
23 मार्च शहीद दिवसानिमित्त दिशा विद्यार्थी संघटना व नौजवान भारत सभेतर्फे पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन!
शहीद क्रांतिकारकांचा क्रांतिकारी वारसा जिंदाबाद! शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू अमर रहे! 23 मार्च शहीद दिवसानिमित्त दिशा विद्यार्थी संघटना व नौजवान भारत सभेतर्फे पुण्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे व रॅलीचे आयोजन! आज 23 मार्च. आजच्याच दिवशी ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेने भारतीय क्रांतीचे अग्रदूत असणाऱ्या भगतसिंह, सुखदेव व राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांना फाशी देऊन भारतीय क्रांतिकारी आंदोलनाची अपरिमित हानी केली होती. जगभरातील क्रांतिकारी आंदोलनातून आणि रशियात झालेल्या महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीतून प्रेरणा घेत या क्रांतिकारकांनी भारतीय जनतेला ब्रिटिश साम्राज्यवादी सत्तेच्या आणि भांडवलशाहीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. मात्र भारतीय जनतेला ब्रिटिश गुलामीतून…
शहीद दिनानिमित्त
हमें तुम्हारा नाम लेना है कि वे लोग ले रहे हैं खूब तुम्हारा नाम जिन्हें ख़तरा है लोगों तक पहुँचने से तुम्हारा नाम अपने सही अर्थों में। इसलिए सुनिश्चित ऐतिहासिक अर्थों का सन्धान करते हुए हमें फिर थकी हुई नींद में डूबे घरों तक जाना है लेकर तुम्हारा नाम । कई बार हमें विचारों को कोई नाम देना होता है या कोई संकेत-चिह्न और हम माँगते हैं इतिहास से ऐसा ही कोई नाम और उसे लोगों तक विचार के रूप में लेकर जाते हैं। • शशिप्रकाश
शहीद दिनानिमित्त नौजवान भारत सभा, पुणे युनिट ची वार्षिक बैठक आणि पदयात्रा संपन्न
आज 23 मार्च शहीद दिवसानिमित्त नौजवान भारत सभेची वार्षिक बैठक पार पडली. गेल्या वर्षभरातील पुणे तसेच देशभरातील नौजवान भारत सभेच्या कामांचा आढावा, नवीन कार्यकारिणीची निवड तसेच पुढील कामांच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना यासाठी ही बैठक झाली. मीटिंगच्या सुरुवातीला साथी स्वप्नजा यांनी शहीद दिनानिमत्त प्रास्ताविक केले आणि जोरदार घोषणा देत मीटिंगची सुरुवात करण्यात आली. साथी सुस्मित यांनी पुण्यातील नौजवान भारत सभेचा वर्षभरातील अहवाल सादर केला. यामध्ये वर्षभरात पार पाडलेली चर्चासत्रे, अभियाने, बुक स्टॉल्स, नौभास द्वारे आंदोलनातील सहभाग, भगतसिंह जनअधिकार यात्रेमधील सहभाग, शिक्षण सहायता केंद्र, फिरते वाचनालय इत्यादी कामांचा संक्षिप्त आढावा मांडण्यात आला.…
शहीद भगतसिंह यांच्या 116 व्या जन्मदिवसानिमित्त क्रांतिकारी अभिवादन!
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी आणि फक्त तेवढ्यावरच न थांबता एका माणसाचे दुसऱ्या माणसाकडून शोषण होणार नाही असा समतामूलक न्याय्य समाज निर्माण करण्यासाठी जो क्रांतिकारक वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हसत-हसत फासावर गेला त्या महान क्रांतिकारक भगतसिंह यांचा आज 116 वा जन्मदिवस आहे. भगतसिंह म्हणाले होते “…आम्ही हे सांगू इच्छितो की युद्ध पेटले आहे, आणि बलिष्ठ जोपर्यंत भारतीय जनता आणि श्रमिकांच्या उत्पन्नाच्या साधनावर आपला एकाधिकार टिकवून ठेवतील, तोपर्यंत हे युद्ध सुरूच राहील. मग ते ब्रिटिश भांडवलदार असोत, ब्रिटिश शासक असोत व पूर्ण…
23 मार्च, शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 92 व्या शहीद दिनानिमित्त
शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92…
भगतसिंहांपासून धर्मांधांना धोका का वाटतो?
अलीकडेच संगरूरमधून नवनिर्वाचित अकाली दलाचे (अमृतसर) खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी पुन्हा एकदा भगतसिंह यांच्याविरोधात विषारी कुत्साप्रचार सुरू केला आहे. भगतसिंह हे निष्पापांचे खुनी आणि दहशतवादी होते, असे मान यांचे म्हणणे आहे आणि त्यांनी त्यांची तुलना जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी केली आणि भिंद्रनवाले हे समाजाचे शहीद असल्याचे वर्णन केले. सिमरनजीत मान यांच्या राजकारणाचा मूळ अजेंडा धार्मिक कट्टरता हा आहे. ते प्रामुख्याने शीख धर्माच्या अस्मितेचे राजकारण करतात आणि ते खलिस्तानचे समर्थक आहेत. फक्त त्यांचे म्हणणे आहे की खलिस्तान “कायदेशीरपणे” निर्माण झाला पाहिजे. सिमरनजीत मान यांनी तोंड उघडताच हरियाणात धार्मिक अस्मितेचे प्रतिगामी राजकारण…
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या विचारसरणीला घाबरणारे आता त्यांच्या शहादतीशी संबंधित अफवा पसरवत आहेत!
या तीन शहीदांना 7 ऑक्टोबर 1930 रोजी फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि 23 मार्च 1931 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. या शहीदांना 14 फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात आली, असा खोटा प्रचार संघी निंदक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहेत! एकीकडे ते या शहीदांशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे व्हॅलेंटाइन डेला आपला विरोध सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतात! भारतीय फॅसिस्टांचे हा गोबेल्स शैलीचे मिथ्या-प्रचार उघड व्हायला हवा! ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा! नौजवान भारत सभा
