Category: Statements
अय्यंकाली: एक प्रेरणादायी जातिविरोधी लढवय्या!
18 जून हा केरळच्या त्रावणकोरमधील बंडखोर आणि निर्भय योद्धा अय्यंकाली (1863–1941) यांचा स्मृतिदिवस आहे. जाती अत्याचाराविरुद्ध दलित प्रतिकाराची मशाल त्यांनी त्या काळात पेटवली होती, जेव्हा जातीय शोषणाचा मुद्दा अजून देशाच्या अजेंड्यावरदेखील नव्हता. ‘अस्पृश्य’ ठरवण्यात आलेल्या पुलायर समाजात जन्मलेल्या अय्यंकालींनी दलितांना आदराची वागणूक मिळावी म्हणून भीक मागितली नाही; त्यांनी ती लढून मिळवली. 1893 साली अय्यंकालींनी जातीप्रथेने ग्रासलेल्या केरळमध्ये त्या काळातील सर्वात क्रांतिकारी बंड उभारले. त्या वेळी दलितांना सार्वजनिक रस्त्यांचा वापर करण्यासही मनाई होती, बैलगाडी बाळगणे तर दूरच. पण अय्यंकालींनी वरच्या जातींना राखून ठेवलेले वस्त्र—धोतर, अँगवस्त्र आणि पगडी घातली, पांढऱ्या बैलांची एक…
नौजवान भारत सभेतर्फे फ्रीडम फ्लोटिलाच्या कार्यकर्त्यांवरील हल्ला आणि अटकेचा तीव्र निषेध !!
वर्णद्वेषी इजरायल मुर्दाबाद! मानवसंहार मुर्दाबाद!! मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या दीड वर्षांपासून इस्रायलद्वारे पॅलेस्टाईनमध्ये मानवसंहार सुरू आहे. ह्यात आतापर्यंत 61,709 लोक मारले गेले आहेत, ज्यामध्ये 17492 मुले आहेत. त्यासोबत लाखो लोक जखमी झाले आहेत. मागील चार महिन्यांपासून इस्रायलने गाझा पट्टीची संपूर्ण नाकेबंदी केली असून, तिथे पाणी, अन्न आणि इतर मानवीय मदतीचा प्रवेश पूर्णपणे रोखण्यात आला आहे. यामुळे गाझामध्ये एक मानवनिर्मित दुष्काळ निर्माण झाला आहे. इस्रायल अन्नाचा वापर “युद्धातील शस्त्र” म्हणून करत आहे. हा वेढा तोडण्यासाठी फ्रीडम फ्लोटिलाचे ‘मॅडलीन’ जहाज जगभरातील विविध देशांतील कार्यकर्त्यांना घेऊन निघाले होते. हे जहाज…
NAUJAWAN BHARAT SABHA STRONGLY DENOUNCES THE ATTACK AND DETENTION OF FREEDOM FLOTILLA ACTIVISTS!
DOWN WITH ISRAELI APARTHEID! DOWN WITH GENOCIDE! Friends, As we all know, for the past year and a half, there has been an ongoing genocide in Palestine being perpetrated by Israel killing 61709 people. Out of this, 17492 were children and lakhs of others were injured. For the past 4 months Israel has imposed a complete blockade of Gaza not allowing even water, food and other humanitarian aid to enter. This has created a man made famine in Gaza. Israel has been using “food as a weapon of war”. To…
नौजवान भारत सभा, पुण्यातील कर्वेनगरमध्ये इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टिन (Indian People in Solidarity with Palestine) आणि बीडीएस इंडिया (BDS India) च्या कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते.
10 मे रोजी, कर्वेनगरमधील डॉमिनोजच्या एका शाखेसमोर ‘इंडियन पीपल इन सॉलिडॅरिटी विथ पॅलेस्टिन’ आणि ‘बीडीएस इंडिया’ शी संलग्न असलेल्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी गाझा येथील नरसंहाराविरोधात आणि झायोनिस्ट इस्त्रायलला थेट किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या कंपन्यांच्या बहिष्कारासाठी शांततेत जनजागृती मोहीम राबवली. यावेळी त्यांनी माहितीपत्रके वाटली व लोकांना गाझावरील युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले. डॉमिनोजसारख्या कंपन्यांच्या इस्त्रायलमध्ये शेकडो शाखा असून त्या केवळ रॉयल्टीमधून नफा कमावत नाहीत, तर अनेक वेळा इस्त्रायली लष्कर (IDF) आणि त्यांकडून पॅलेस्टिनची जमीन बळकवण्याला उघडपणे समर्थनही देतात. हे संपूर्ण आंदोलन हे शांततापूर्ण असून केवळ गाझामधील नरसंहाराचा निषेध करणारे आहे, हे…
देशातील कष्टकरी जनतेला युद्ध नको आम्हाला हवे चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि चांगले राहणीमान ! युद्धाच्या उन्मादात फसून आपण सत्ताधारी वर्गाला त्यांच्या दुष्ट हेतूंमध्ये यशस्वी होऊ देता कामा नये!
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, एकमेकांना आव्हान दिल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये 6-7 मे च्या रात्री युद्धाच्या झडपा सुरू झाल्या. भारतीय सैन्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील काही दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर, पाकिस्तानी सैन्याने त्याला नागरी क्षेत्रावरील हल्ला म्हणून भारताच्या सीमावर्ती राज्यांमधील काही शहरांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आणि शेकडो लोक उद्ध्वस्त झाले. यानंतर, भारताकडूनही प्रतिहल्लाची चर्चा आहे आणि लाहोरची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केल्याच्या बातम्या आहेत. सध्या सर्वत्र युद्ध उन्माद आणि अंधराष्ट्रवादाचे वारे वाहत आहेत. अफवांचा बाजार गरम आहे…
पहलगाम दहशतवादी हल्ला : काश्मीरमध्ये शांतता स्थापित करण्याचे सारे दावे खोटे!
पर्यटक आणि सामान्य नागरिकांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेच्या अकार्यक्षमतेसाठी जबाबदार कोण? पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा बहाणा करून देशाला धर्मवादाच्या आगीत झोकून देण्याचा संघपरिवाराचा डाव हाणून पाडा! साथींनो, 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. नौजवान भारत सभा या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करते. या हल्ल्यात भारतातील विविध राज्यांचे नागरिक आणि एक परदेशी नागरिकही ठार झाला आहे. हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ नावाच्या अतिरेकी गटाने घेतली आहे, जो पाकिस्तानी अतिरेकी संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे, असे मानले जाते. हल्ल्यादरम्यान…
Condemn the environmental destruction done to service capitalists !
In the midst of one of the worst heatwaves this country has ever faced, Maharastra government clears projects that will end up clearing about 1,800 hectares of forest land. Which will result in about 4,00,000 trees getting cut down. The clearing of forests in Thane, Palghar, Gadchiroli, and Yavatmal is not just about losing trees-it’s about dismantling entire ecosystems. This project which the government claims is to build four mega infrastructure projects, will irreversiblely damage the ecology of Maharastra. The locations of these projects are especially dangerous to the environmental…
‘औरंगजेब’ च्या नकली मुद्द्यावरून हिंदू-मुस्लीम द्वेष भडकवून जनतेला दंगलखोर गर्दी बनवण्याच्या संघी प्रयत्नांना हाणून पाडा!
‘औरंगजेब’ च्या नकली मुद्द्यावरून हिंदू-मुस्लीम द्वेष भडकवून जनतेला दंगलखोर गर्दी बनवण्याच्या संघी प्रयत्नांना हाणून पाडा! जाती-धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा! – नौजवान भारत सभा मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) परिवारातील ‘बजरंग दल’, ‘विश्व हिंदू परिषद’ आणि ‘पतित पावन संघटना’ या फॅशिस्ट संघटनांनी मुघल सम्राट औरंगजेब याची खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर येथील कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये आंदोलन केले. नागपूर येथे झालेल्या आंदोलनात “मुस्लीम समाजाला पवित्र अशी चादर जाळली” या अफवेनंतर तिथे दंगल भडकली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “छावा” चित्रपटाच्या यशाच्या लाटेवर स्वार होऊन पुन्हा एकदा…
जामिया युनिवर्सिटी प्रशासनाच्या विद्यार्थी विरोधी कारवाईचा तीव्र निषेध!!
जामिया प्रशासनाने त्याचे विद्यार्थी विरोधी चरित्र पुन्हा उघडपणे सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांवर शारीरिक हल्ला केल्यानंतर प्रशासनाने जामिया मिलिया इस्लामिया परिसरात १७ विद्यार्थ्यांची नावे, पत्ते, संपर्क आणि इतर वैयक्तिक तपशील असलेली एक सूची मुख्य प्रवेशद्वार, कायदा संकुल प्रवेशद्वार आणि इतर परिसरात सार्वजनिकपणे लावली आहे. हे विद्यार्थी सोमवारपासून कॅम्पस लोकशाहीवर हल्ला करणाऱ्या फाशिस्ट जामिया प्रशासनाविरोधात निदर्शने करत होते आणि त्यांना काल स्थानबद्ध करून नंतर निलंबित करण्यात आले. ही घटना विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेचा भंग असून त्यांची सुरक्षितता धोक्यात आणते. यामध्ये काही तरुण विद्यार्थिनीही आहेत ज्यांचे फोन नंबरसुद्धा सार्वजनिक करण्यात आले आहेत. जामिया प्रशासन या…
