‘आमची मुंबई आमची बेस्ट’ या बॅनरखाली, अलिकडच्या काळात झालेल्या भाडेवाढी आणि बेस्टच्या सुरू असलेल्या खाजगीकरणाविरोधात, वडाळा बस डेपो येथे विविध विद्यार्थी आणि युवक संघटना, नागरी समाज गट, वैयक्तिक प्रवासी आणि कामगार संघटनांसह नौजवान भारत सभेने आयोजित केलेल्या निदर्शनाच्या बातमीची वृत्तपत्रांमधील प्रसिद्धी. Press coverage of the protest organized by Naujawan Bharat Sabha, along with various student and youth organizations, civil society groups, individual commuters, and trade unions, at the Wadala BEST depot under the banner of ‘Aamchi Mumbai Aamchi BEST’, against the recent fare hikes and the ongoing privatization of BEST.
Category: Uncategorized
वक्फ (सुधारणा) कायद्याला विरोध करा! मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या फॅशिस्टांच्या रणनीतीला हाणून पाडा!
वक्फ (सुधारणा) कायद्याच्या रूपात मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या फॅशिस्ट हल्ल्याचा नौजवान भारत सभा तीव्र विरोध करते. संसदेमध्ये ह्या विधेयकाच्या चर्चेच्या वेळी अमित शहा यांनी म्हटले की मुस्लिमांच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारचा उद्देश नाहीये तर मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांचे व्यवस्थापन पारदर्शी व्हावे, भ्रष्टाचार संपावा यासाठी हे विधेयक आणले गेले आहे आणि या कायद्याचा फायदा गरीब मुस्लिमांना, महिलांना होणार आहे. या कायद्याचे समर्थन करताना “लोकशाहीकरण”, “धर्मनिरपेक्षता” यांसारख्या तत्वांचा आधार देण्यात येत आहे, पण खरे पाहता हा मुस्लिमांवर एक फॅशिस्ट हल्लाच आहे. या कायद्याबद्दल समजण्याआधी कुठल्या राजकीय वातावरणात हा कायदा पारित होत…
नौजवान भारत सभा, पुणे तर्फे गेल्या आठवड्यात सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा ऑस्कर जिंकणारी पहिली पॅलेस्टिनी फिल्म “नो अदर लँड” दाखवण्यात आली.
पॅलेस्टिनी कार्यकर्ता बासेल याद्रा, हमदान बल्लाल आणि इस्रायलच्या कार्यकर्त्यांनी मिळून ही डॉक्युमेंट्री बनवली आहे. या फिल्ममध्ये मासाफेर येता हा इस्रायल व्याप्त वेस्ट बँक मधील भाग इस्रायली सैन्याची जागा म्हणून घोषित केला जाते आणि त्यानंतर पॅलेस्टिनी नागरिकांना कशाप्रकारे त्यांच्या घरातून बेदखल केले जाते याचे चित्रण केले आहे. 2019 – 2023 या काळात या डॉक्युमेंट्रीचे चित्रण करण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात पॅलेस्टिनी कार्यकर्ते इस्रायलच्या कोर्टात 22 वर्षे लढा देतात आणि त्यानंतर कोर्टाकडून निर्णय येतो की मासाफेर येता हा भाग इस्रायलच्या सैन्याचा प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. हा निर्णय लागू करण्यासाठी स्थानिक जनतेची घरे…
नौजवान भारत सभा, पुणे तर्फे सुरू असलेला आझाद स्पोर्ट्स क्लब निरंतर सुरू
तुम्हाला माहितीच आहे की, गेल्या 2 महिन्यापासून पुण्याच्या सुप्पर, बिबवेवाडी भागात शहीद आझाद स्पोर्ट्स क्लब नियमितपणे सुरू आहे. यामध्ये सध्या मुलांना बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट शिकवले जात आहे. स्पोर्ट्स क्लबमधून वस्तीतील मुलांच्या शारीरिक सोबतच मानसिक स्वास्थ्य यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. म्हणूनच खेळांसोबतच मुलांना विविध प्रकारचे साहित्य, विज्ञान, कला यावरची पुस्तके वाचण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. खेळ खेळताना मुलांशी विविध विषयांवर गप्पा गोष्टी होत असतात. मुलांना वेगवेगळया विषयांबद्दल खूप कुतूहल असते हे यामध्ये दिसून आले. म्हणूनच मुलांना मागील आठवड्यात स्पोर्ट क्लब नौभास तर्फे संचालित वाचनालयावर आणून विविध विषयांवरची पुस्तके वाचण्यासाठी…
काकोरी ऍक्शन मधील क्रांतिकारकांच्या शहादत दिनानिमित्त मुंबईच्या मानखुर्द – गोवंडी भागात पोस्टरिंग
आज फॅशिस्ट ताकती देशभरात सांप्रदायिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच संभळपासून अजमेरपर्यंत मंदिर-मशिदीचे राजकारण करत, भाजप आणि संघ परिवार जनतेला त्यांच्या खऱ्या मुद्द्यांपासून दूर भटकवण्याचे काम करत आहेत. या प्रतिक्रियावादी शक्ती समाजाला द्वेष आणि रक्तपाताच्या दलदलीत ढकलण्याचा कट रचत आहेत. मानखुर्द मध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशचा झेंडा बनवून धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशा काळात जनतेची एकी मजबूत करणे हा अत्यंत महत्त्वाचा कार्यभार बनला आहे, जेणेकरून आपण आपले खरे मुद्दे म्हणजेच शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि आवास यावर एकत्र येऊन त्यांना साध्य करण्याच्या लढ्याला पुढे घेऊन…
बेरोजगारीचे संकट अधिकाधिक गडद होत असताना कामगारांना युद्धग्रस्त प्रदेशांमध्ये रोजगाराच्या संधी शोधण्यास भाग पाडले जात आहे
इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष सुरू असतानाही हरियाणा आणि उत्तर प्रदेश या उत्तर भारतीय राज्यांमध्ये इस्रायलमध्ये नोकऱ्यांसाठी जाऊ इच्छिणाऱ्या कुशल कामगारांच्या लांब रांगा दिसल्या. प्रत्येक राज्याने सुतार, लोहार, टाईल बसविणारे आणि प्लास्टर करणारे अशा 10,000 हून अधिक काम करणाऱ्यांसाठी जागा जाहीर केल्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशातील 28,237 हून अधिक कामगारांनी भरती प्रक्रियेत भाग घेतला ज्यापैकी 1,069 कामगार इस्रायलमधील पदांसाठी नियुक्त केले गेले आहेत. इस्रायलमध्ये उच्च पगाराच्या ‘ब्लू कॉलर’ नोकऱ्या देऊ ह्या आश्वासनामुळे उत्तर प्रदेशातील शेकडो मजूर लखनऊमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेबाहेर (ITI) रांग लावून उभे आहेत. वाढत्या बेरोजगारी आणि गगनचुंबी महागाईमुळे आरोग्यसेवा, शिक्षण आणि मूलभूत…
शहीद राजेंद्र नाथ लाहिडी यांना शहादत दिनानिमित्त क्रांतिकारी सलाम
हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन चे सदस्य आणि काकोरी ऍक्शन मधील शहीद राजेंद्र नाथ लाहिडी (29 जून 1901 – 17 डिसेंबर 1927) ह्यांना त्यांच्या शहादत दिनानिमित्त आमचा क्रांतिकारी सलाम
Down with the Anti-student Modi government!! Down with the system that plays with the future of students and youths!!
Naujawan Bharat Sabha participated in the protest demonstration organized at Mumbai University by Disha students organisation against recent paper leaks in the UGC-NET, NEET examinations. The protest was attended by students and youths coming from different fields of education and professions in solidarity with the students whose futures have been played with and against the anti-student character of the present Fascist Modi government. Members of Naujawan Bharat Sabha, while talking to students saw a greal deal of frustration, anger and disappointment in them. The students were appealed to join the…
क्रांतिकारी शहीद रामप्रसाद बिस्मिल यांना विनम्र अभिवादन!
11 जून हा क्रांतिकारी रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्मदिवस. अखेरच्या श्वासापर्यंत बिस्मिल यांनी फक्त ब्रिटिश वसाहतवाद्यांविरोधात लढा दिला नाही तर भारतात खऱ्या अर्थाने समतेवर आधारित समाज स्थापन करण्याचासुद्धा प्रयत्न केला. त्यांचा जन्म 1897 मध्ये शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश येथे झाला. लहानग्या बिस्मिलने घरीच अभ्यास सुरू केला आणि मग नंतर एका मौलवीकडून उर्दू भाषेचे शिक्षण घेतले. बिस्मिल, राम, अग्यात या नावाने त्यांनी हिंदी आणि उर्दूमध्ये कविता लिहिल्या. ‘मेरा रंग दे बसंती’ हे गीत त्यांचीच प्रसिद्ध रचना आहे. बिस्मिल लहान वयातच आर्यसमाजी झाले. त्यानंतर त्यांचे शिक्षक, सोमदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ब्रिटिश राजवटीविरूद्ध स्वातंत्र्यलढ्यात सहभागी…
लेखणीचे सैनिक आणि झुंझार पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी ह्यांच्या जयंतीनिमित्त सादर आहेत त्यांची काही निवडक उद्धरणे
लेखणीचे सैनिक आणि झुंझार पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी ह्यांच्या जयंतीनिमित्त सादर आहेत त्यांची काही निवडक उद्धरणे ‘मी हिंदू-मुस्लिम संघर्षाचे मूळ कारण निवडणुक, इत्यादीला समजतो आणि कौन्सिलमध्ये गेल्यानंतर व्यक्ती देश आणि जनतेच्या कामाचे उरत नाहीत.’ ‘काही लोक हिंदू राष्ट्र – हिंदु राष्ट्र’ हा जयघोष करतात. आम्ही नाही म्हटले तर आम्हाला माफ करा. आपण यावर भर देऊयात की ते एक मोठी चूक करत आहेत आणि त्यांना अद्याप राष्ट्र या शब्दाचा अर्थ समजलेला नाही. आम्ही भविष्यवेत्ते नाही, पण ही अवस्था आपल्याला सांगते आहे की यापुढे जगात हिंदू राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही.’ ‘ते…
