तरुणांना आवाहन / पीटर क्रोपोतकिन

मला माहीतीये, तुमच्‍या मनातला पहीला प्रश्‍न जो तुम्‍ही वारंवार स्‍वत:लाही विचारलेला आहे, अन् तो म्हणजे, “मी काय व्‍हायला पाहीजे?” खरंतर तारुण्‍यांत माण्‍सं असा विचार करतात की एखादी विद्या वा विज्ञानाचा अभ्‍यास केल्‍यानंतर, जे समाजाच्‍या योगदानांमुळं शक्य होतं, आपण आपली बुद्धी, आपली क्षमता आणि आपल्‍या ज्ञानाचा उपयोग अशा लोकांच्या अधिकारासाठी करायला हवा, जे आज विपन्नावस्‍थेत, दु:खांत आणि अज्ञानांत खितपत पडलेत. त्याच्यासाठी शिक्षण, नुस्तं कमाईच्‍या जोरावर आपल्‍या व्‍यक्‍तीगत लाभासाठी लूटीच्‍या हत्‍यारासारखा वापर करण्‍यांसाठी नक्‍कीच नसतं. मग जर कुणी असा विचार करत नसेल तर नक्‍कीच त्‍यांचा मेंदू विकृतीनें ग्रस्‍त आहे किंवा व्‍यसनांनी त्‍याला वेडा बनवलं असणार.

डॉ पायल तडवी जातीय छळ आणि आत्महत्या मुद्द्यावर नौजवान भारत सभा, पुणे तर्फे मंगळवार 28 मे रोजी दांडेकर पूल चौकात निदर्शने करण्यात आली.

 नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून या आंदोलनाला आपले समर्थन व्यक्त केले. जातीयवाद मुर्दाबाद, ब्राह्मणवाद मुर्दाबाद, डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस भाग पडणाऱ्या डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे, नायर हॉस्पिटल प्रशासन मुर्दाबाद अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

नौभास आयोजित पाच दिवसीय विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराची सांगता.

२३ ते २७ मे दरम्यान विद्यार्थी सर्जनशीलता शिबिराचे आयोजन शहरातील महाराष्ट्र बालक मंदिर,अहमदनगर येथे करण्यात आले होते.मागील वर्षीच्या तुलनेत नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट म्हणजे १२५ विद्यार्थी इतकी होती.सरासरी १०० विद्यार्थी संपूर्ण शिबिरा दरम्यान हजर राहिले. शिबिराच्या पहिल्या दिवशी चित्रकला विषयाबाबत प्रमोद तापकिरे यांनी मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांनीही स्वतःची कल्पकता वापरून सुंदर चित्रे रेखाटली. दुसर्या दिवशी शाडू माती पासून शिल्प बनवण्याच्या उपक्रमात विषयी विकास कांबळे यांच्या सहवासात विद्यार्थ्यांनी बनवलेली शिल्पे आश्चर्यचकित करून सोडणारी होती. तिसरा दिवस सहलीच्या धम्माल मज्जेचा होता. साईबन-कृषी पर्यटन केंद्रामध्ये ही सहल नेण्यात आली होती, जिथे बोटिंग पासून…

खूनी वेदांता, खूनी विकास! तुतिकोरिन (तुतुकुडी) येथील गोळीबाराची घटना आपल्या मानवीय अस्तित्वाला आव्हान आहे!

वेदांता ही लंडन मध्ये स्थित असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे आणि प्रदूषण करण्यासाठी जगभरात कुख्यात आहे. या कंपनी विरोधात हवा, पाणी आणि आसपासचे वातावरण प्रदूषित करण्याविरोधात झांबिया देशातील 2000 गावांनी सुध्दा केस ठोकली आहे. गोळीबारात मेलेले आणि प्रदूषणाने मेलेले सर्व लोक भारतीयच होते, पण त्यांच्यासाठी आता भाजपाई आणि संघी लोकांना भारतमाता आठवणार नाही कारण वेदांताची ‘देणगी’ यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे.

नौजवान भारत सभा व इतर सहयोगी संघटनां तरफे जारी पत्रक

बलात्काऱ्यांच्या समर्थनात आंदोलने: न्यायाची नवीन संघी, भाजपाई व्याख्या! देशातील महिलांवरील वाढत्या अपरांधांविरोधात एकजूट व्हा! फासीवाद नष्ट करा! पितृसत्ता मुर्दाबाद ! संघी गुंड मुर्दाबाद! मार्ग मुक्तीचा घडवावा लागेल, जगायचं तर लढावं लागेल! साथींनो, गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या दोन अत्यंत निंदनीय घटना समोर आल्या आहेत. कठुआ, जम्मु-काश्मिर येथे आठ वर्षांच्या मुलीवर सहा लोकांनी सात दिवस सामुहिक बलात्कार केला आणि नंतर तीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी सुद्धा या कामात बलात्काऱ्यांना साथ दिली. उन्नाव, उत्तर प्रदेश येथे भाजपचे आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून एका महिलेचा बलात्कार केला आणि विरोध केला म्हणून तिच्या वडिलांना मारहाण…

बलात्काऱ्यांच्या समर्थनात आंदोलने: न्यायाची नवीन संघी, भाजपाई व्याख्या!

भाजप अशा एका पक्षाच्या रुपात समोर आली आहे जिच्यामध्ये सर्व पक्षांमधील गुंड, मवाली, हत्यारे आणि बलात्कारी येऊन शरण घेत आहेत. या देशाचे प्रधान सेवक उर्फ चौकीदाराने नुकतेच आपली छप्पन इंचाची छाती फुलवत म्हटले आहे की कमळाचे फूल देशात सगळीकडे पसरत आहे पण खरेतर हे फूल महिला, दलित, अल्पसंख्यांक आणि मजूरांच्या रक्ताने सिंचित आहे. एका बाजूला भयंकर बेरोजगारी आणि दुसरीकडे अशा घटना दाखवतात की सर्व देशामध्ये फासीवादाचे संकट गडद होत आहे. गोरक्षा, लव्ह-जिहाद, भारत माता की जय, राम मंदिराचे फासीवादी राजकारण फक्त आणि फक्त सामान्य जनतेला विभागण्यासाठी आणि आपापसात लढवण्यासाठी केले जात आहे. त्यांची देशाची व्याख्या म्हणजे फक्त कागदावर बनलेला एक नकाशा आहे. वाढत्या निरंकुश स्त्री-विरोधी अपराधांवरून हे जाहीर आहे की संघी लोकांच्या देशाच्या व्याख्येमध्ये महिलांचे स्थान फक्त एका भोगवस्तूचे आहे. भांडवली व्यवस्था आणि पितृसत्तेमुळे आपला समाज ज्या स्त्री विरोधी मानसिकतेने ग्रसित आहे, त्याच्यामुळे फासीवादाच्या या काळात स्त्रियांवर हल्ले अजूनच पाशवी आणि कृर होत चालले आहेत.

नौजवान भारत सभा, महाराष्ट्राच्या वतीने 2 एप्रिलच्या भारत बंदच्या निमित्ताने काढलेले पत्रक

मित्रहो, जर तुम्ही मानवतेच्या बाजूने असाल, जर तुम्ही मेहनत करणारे मजूर असाल किंवा साफ मनाचे बेरोजगार युवक असाल जे सर्व अडचणी असूनही आपल्या आसपासच्या लोकांच्या वेदनेने दुःखी होतात आणि काही करण्याचा विचार करतात, तर हे पत्रक तुमच्यासाठी आहे. तुम्हाला माहितच आहे की *देशभरात आजकाल जनतेच्या विविध हिश्श्यांच्या संरक्षणासाठी बनलेले कायदे कमजोर करण्याचा काळ चालू आहे.* काही कायदे सरळ संसदेत बदलले जात आहेत तर काही कोर्टाद्वारे आदेश घेऊन बदलवले जात आहेत. मोदी सरकार *’व्यापार करण्याच्या सुलभतेच्या’ नावाने विविध श्रम कायदे शिथिल करण्याची योजना बऱ्याच काळापासून बनवत आहे आणि या योजनेचा मसुदा…

जनतेसाठी बनवलेल्या कायद्यांना दुरुपयोगाच्या बहाण्याने कमजोर करण्याचे षडयंत्र ओळखा

देशातील कायदे दोन प्रकारचे असतात. एक ते कायदे जे देशातील जनतेच्या एका घटकाच्या किंवा सर्व घटकांच्या हक्क अधिकाराशी संबंधित असतात. (उदाहरणार्थ महिलांवरील अत्याचाराविरुद्ध बनलेले कायदे, मजुरांच्या हक्क अधिकारांसाठी बनलेले कायदे, दलितांवरील अत्याचार थांबवण्यासाठी बनवलेले कायदे) आणि दुसरे ते कायदे असतात जे जनतेचे दमन-शोषण करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाला ताकद देतात. (जसे पोलिसांना एन्काऊंटर करण्याची सूट देणे, फौजेला काही भागांमध्ये विशेषाधिकार देऊन एन्काऊंटर आणि अटक करण्याची परवानगी देणे). आपल्या देशातील सरकार मग ते काँग्रेसचे असो किंवा भाजपचे, अगदी स्पष्टपणे भांडवलदारांच्या हितांचे प्रतिनिधित्व करते. त्यांच्या हितासाठी एका बाजूला ही सरकारे मजुरांच्या अधिकारांना सतत कमी करत आहे आणि दुसरीकडे सरकारचे दमन करण्याचे अधिकार वाढवत आहे.

सामाजिक शांतता व सौहार्द जपा , खरा शत्रू ओळखा .

मित्रांनो, सावध रहा, सांप्रदायिक, धर्मांध शक्‍ती देश, देव व धर्मांच्‍या नावाखाली आपली माथी भडकवायला येतील, त्‍यांना तिथचं रोखा. आपल्‍या आजच्‍या दारिद्रयाला आरक्षण, अट्रोसिटी एक्‍ट, विशिष्‍ट जात-उपजात, एक विशिष्ट धर्म जबाबदार आहे असां खोटा प्रचार करतील, बळी पडू नका. कधी परप्रांतीय म्‍हणून, कधी परका म्‍हणून काबाडकष्‍ट करणाऱ्यांमध्‍ये बेकी निर्माण करतील, फसू नका. हे पक्‍कं लक्षात ठेवा — आपल्‍या दु:ख, दारिद्र व दैन्याच्‍या मुळाशी भांडवलशाही व्‍यवस्‍थेचं अर्थशास्‍त्र आहे. नफ्याचं आणि राजकीय सत्तेचं समिकरण आहे. अस्मितेचे राजकारण हे नेहमीच आपल्या खऱ्या प्रश्नांच्या लढाईला कमजोर करत असते. हे विसरले नाही पाहिजे की आज जे धार्मिक-जातीय विद्वेषाचे वातावरण तयार केले जात आहे तो देशातील भांडवलदार वर्गाचा पाठिंबा असलेल्या जातीयवादी शक्तींचा खेळ आहे. हा पाठिंबा आहे म्हणूनच या जातीयवादी शक्तींमध्ये इतकी हिंमत आली आहे.

मनुस्मृती दहन (25 डिसेंबर 1927) च्या 89 व्या वर्षपूर्ती निमित्त

जातीअंताच्या आंदोलनाला प्रतीकवाद, सुधारवाद आणि अर्ज-विनंत्या करण्याच्या पुढे घेवून जाण्याचा संकल्प करा! मित्रहो , आजपासून 89 वर्षापूर्वी महाडमध्ये कष्टकरी दलितांनी एका महान विद्रोहाला सुरुवात केली होती. ज्याची सुरुवात 19-20 मार्च 1927 च्या बहिष्कृत सम्मेलनातून झाली, पण वस्तुतः या सम्मेलनाचा विचार आर.बी.मोरेनी (जे पुढे जाऊन काॅम्रेड आर बी मोरे या नावाने ओळखले गेले) मे 1924 मध्ये मांडला. या सम्मेलनात डा.आंबेडकरांना त्याच्या अॅकडमिक उपलब्धीसाठी सम्मानीत करण्याची योजना केली होती. तीन वर्षाच्या जय्यत तयारी नंतर 19-20 मार्च 1927 ला महाड मध्ये हे सम्मेलन झाले. सम्मेलन संपण्याच्या ठीक अगोदर अनंत विनायक भाई चित्रे च्या…