नौजवान भारत सभा द्वारा संचालित ‘आज़ाद स्पोर्ट्स क्लब’

नौजवान भारत सभा द्वारा संचालित ‘आज़ाद स्पोर्ट्स क्लब’ शुरू किया गया है। जिसके तहत पिछले कुछ महीनों से मानखुर्द-गोवंडी की बस्तियों में रहने वाले बच्चें और नौजवान भारत सभा के साथी, रोज सुबह व्यायाम व फुटबाल खेलने जाते है। मानखुर्द- गोवंडी जैसी बस्तियों में कोई भी अच्छा खेल का मैदान नहीं है। यहां एक छोटा सा पार्क है, जहां कई बच्चे एक साथ खेलते है। कभी-कभी तो पता ही नही चलता किसकी गेंद किसके पास चली गई है। खेल बच्चों के शारीरिक और मानसिक विकास के लिए बेहद आवश्यक होता…

आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात नौजवान भारत सभेच्या वतीने दिल्लीगेट, अहमदनगर येथे निदर्शने

आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात नौजवान भारत सभेच्या वतीने दिल्लीगेट, अहमदनगर येथे निदर्शने 23 एप्रिल पासून दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांद्वारे 28 मे रोजी अमानवीय पद्धतींनी मोडून काढण्यात आले. या घटनेचा निषेध म्हणून देशव्यापी निदर्शने करण्यात येत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून अहमदनगर मध्ये 31 मे रोजी नौभास तर्फे आंदोलन केले गेले. भाजपचा गुंड खासदार व कुस्ती संघाचा अध्यक्ष ब्रुजभूषण सिंह याच्यावर आतापर्यंत असंख्य महिला कुस्ती पहिलवानांनी लैंगिक शोषण करण्याचा आरोप केला आहे. ज्यात एका अल्पवयीन मुलीचा देखील आरोप ब्रुजभूषण वर आहे. त्याच्या…

आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात दादर (मुंबई) मध्ये निदर्शने

आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात दादर (मुंबई) मध्ये निदर्शने 29 मे ला मानखुर्द-गोवंडी मधिल निदर्शनानंतर काल 30 मे ला दादर रेल्वे स्थानकासमोर कुस्ती पहिलवानांच्या पोलिसी दमणा विरोधात निदर्शने करण्यात आली. मागील दीड महिन्यापासून शांततापूर्ण मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांद्वारे 28 मे रोजी अमानवीय पद्धतींनी मोडून काढण्यात आले. या घटनेचा विरोध म्हणून दादर येथे निदर्शने आयोजित करण्यात आली होती. यात स्त्री मुक्ती लीग, नौजवान भारत सभा, आणि दिशा विद्यार्थी संघटना व अन्य प्रगतिशील संघटनांनी सहभाग घेतला होता. भाजपच्या गुंड खासदार ब्रुजभूषण सिंह याच्या विरोधात महिला कुस्ती पहिलवानांनी लैंगिक…

आंदोलनरत कुस्ती पहिलवानांवर झालेल्या पोलिसी दमना विरोधात मानखुर्द–गोवंडी (मुंबई) मध्ये निदर्शने

कुस्ती पहिलवानांचे गेले 35 दिवस शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेले आंदोलन काल दिल्ली पोलिसांनी अत्यंत अमानवीय रीतीने मोडून काढले. भाजप सरकारचा मंत्री ब्रुजभूषण यांच्यावर महिला कुस्ती पहिलवानांचे लैंगिक शोषण करण्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या कुस्ती खेळाडूंना भर रस्त्यात फरफटत, जबरदस्तीने पकडुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्या आंदोलनाची जागा उध्वस्त करून साऱ्या समर्थनकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी हुसकावून लावले आणि आंदोलनं संपवण्याचा प्रयत्न केला. ही सारी घटना तेव्हा घडली जेव्हा भाजप सरकार नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यात मग्न होते. संसंद भवनाला लोकशाहीचे मंदिर म्हणत कुस्ती पहिलवानांच्या लोकशाही अधिकाराचे हनन करणाऱ्या भाजप…

शहीद सुखदेव यांच्या जन्मदिनानिमित्ताने (15 मे)

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘सुखदेव’ असे नाव आहे जे केवळ देशभक्तीच नव्हे तर धाडस आणि बलिदानाचे सुद्धा प्रतीक आहे. 23 मार्च 1931 या दिवशी सुखदेव यांना त्यांचे दोन क्रांतिकारी साथी भगतसिंह आणि राजगुरू यांच्यासोबत फाशी देण्यात आली होती. बलिदानाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा हे शहीद जनतेच्या हृदयात अजूनही जिवंत आहेत. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारने 23 मार्च 1931 रोजी लाहोर षडयंत्र खटल्यामध्ये फाशी दिली होती. या वीरांना फाशी देऊन इंग्रज सरकार या भ्रमात होते की भारताची जनता या कारवाईने भयभीत होईल आणि स्वातंत्र्याच्या भावनेला विसरून जाऊन विद्रोह करणार नाही. परंतु…

महाराष्ट्रातून नौजवान भारत सभा, दिशा विद्यार्थी संघटना आणि स्त्री मुक्ती लीग चे कुस्ती पहिलवानांच्या आंदोलनाला समर्थन.

भाजप सरकारचा मंत्री बृजभूषण शरण सिंग च्या विरोधात गेले 20 दिवस कुस्ती पहिलवानांचे आंदोलन सुरू आहे. बृजभुषण वर महिला कुस्ती खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप कुस्ती खेळाडूंनी लावला आहे आणि सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर बृजभुषण वर FIR झाली आहे. परंतू FIR केल्याचा बऱ्याच दिवसांनंतर सुद्धा दिल्ली पोलीस पुढील कारवाई करण्यास टाळत आहेत. आज नौजवान भारत सभा, महाराष्ट्र टीमने दिशा विद्यार्थी संघटना आणि स्त्री मुक्ती लीग सोबत दिल्ली च्या जंतर -मंतर मैदानात जाऊन पहिलवानांच्या संघर्षाचे समर्थन केले. भाषणात सांगितले गेले की मुंबई-पुण्यात त्यांच्या समर्थनात मोर्चे काढले गेले आहेत आणि सामान्य जनतेचा चांगला…

23 मार्च, शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 92 व्या शहीद दिनानिमित्त

शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92…

गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्याच्या विविध भागांमध्ये “नौजवान भारत सभा” तर्फे बसनेगा (Bhagat Singh National Employment Guarantee Act) अभियान राबविण्यात येत आहे.

 या अभियानांतर्गत शिक्षण आणि रोजगाराच्या मूलभूत अधिकारासाठी तरुणांनी संघटित झाले पाहिजे यासाठी विद्यार्थी–तरुणांना आवाहन केले जात आहे. बसनेगा अभियानाला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाती-धर्माच्या मुद्द्यांपेक्षा शिक्षण आणि बेरोजगारी हेच तरुणांसाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रकर्षाने जाणवले. अनेक तरुणांनी बसनेगाचे पत्रक वाचून बसनेगाच्या मागण्यांशी सहमती दर्शवली आणि “नौजवान भारत सभा” सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. बसनेगा अभियानाची गरज का? आजच्या भांडवली व्यवस्थेत शिक्षण—जे माणसाच्या आणि एकूणच समाजाच्या प्रगतीसाठी मूलभूत गोष्ट आहे—पैसेवाल्यांची मक्तेदारी बनले आहे. बहुतांश कामगार–कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर या व्यवस्थेने शिक्षणबंदी लादली आहे. अर्ध्यातून शाळा सोडण्याचे प्रमाण प्रचंड…

नौजवान भारत सभा द्वारा संचालित शहीद राजगुरू शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों को भायखला प्राणी संग्रहालय ले जाया गया।

नौजवान भारत सभा द्वारा संचालित शहीद राजगुरू शिक्षा सहायता केन्द्र के बच्चों को पिछले रविवार मुम्बई में स्थित भायखला प्राणी संग्रहालय ले जाया गया। जहां पर बच्चों ने हाथी, चीता, शेर, हिरण और दरियाई घोड़ा देखा।साथ साथ पक्षियों की अलग प्रजातियां भी अपने अलग अलग रूप और रंगों की वजह से बच्चों के लिए आकर्षक का केन्द्र बनी रही। पानी के कछुओं के साथ सूखी, मिट्टी पर रहने वाले कछुओं, कबूतर, तोता, कोयल, तितलियां, सारस, पेंग्विन और जिनको सिर्फ किताबों के पन्नों में पढ़ा और देखा था। आज अपनी आंखों…

नौजवान भारत सभेने ‘गैर सरकारी संघटना (एनजीओ) खरोखरच सामाजिक बदल घडवून आणू शकतात का?’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते.

ह्या विषयावर बारकाईने अभ्यास आणि ऐतिहासिक विश्लेषण आवश्यक आहे कारण एनजीओ सामान्यत: लोकांमध्ये “उत्तम समाज कार्य” करत आहेत असे भासवत असते. चर्चा सत्राची सुरुवात एनजीओच्या संख्येमध्ये होत असलेल्या प्रचंड वाढीच्या काही आकडेवारीने झाली. संपूर्ण जगात एनजीओ ची संख्या एवढी आहे कि जर सर्व एनजीओ मिळून एक देश बनला तर तो जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. भारतातील एनजीओची संख्या एकूण असलेल्या शाळांच्या दुप्पट आणि सरकारी रुग्णालयांच्या 250 पट जास्त आहे. मग प्रश्न उद्भवतो की या गैर सरकारी संघटनांच्या स्फोटक प्रसारानंतर आणि त्यांच्या “उत्कृष्ट कार्यानंतर”, मानव विकास निर्देशांकाचा विचार करता भारत…