हमें तुम्हारा नाम लेना है कि वे लोग ले रहे हैं खूब तुम्हारा नाम जिन्हें ख़तरा है लोगों तक पहुँचने से तुम्हारा नाम अपने सही अर्थों में। इसलिए सुनिश्चित ऐतिहासिक अर्थों का सन्धान करते हुए हमें फिर थकी हुई नींद में डूबे घरों तक जाना है लेकर तुम्हारा नाम । कई बार हमें विचारों को कोई नाम देना होता है या कोई संकेत-चिह्न और हम माँगते हैं इतिहास से ऐसा ही कोई नाम और उसे लोगों तक विचार के रूप में लेकर जाते हैं। • शशिप्रकाश
Author: nbs_upload
शहीद दिनानिमित्त नौजवान भारत सभा, पुणे युनिट ची वार्षिक बैठक आणि पदयात्रा संपन्न
आज 23 मार्च शहीद दिवसानिमित्त नौजवान भारत सभेची वार्षिक बैठक पार पडली. गेल्या वर्षभरातील पुणे तसेच देशभरातील नौजवान भारत सभेच्या कामांचा आढावा, नवीन कार्यकारिणीची निवड तसेच पुढील कामांच्या नियोजनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना यासाठी ही बैठक झाली. मीटिंगच्या सुरुवातीला साथी स्वप्नजा यांनी शहीद दिनानिमत्त प्रास्ताविक केले आणि जोरदार घोषणा देत मीटिंगची सुरुवात करण्यात आली. साथी सुस्मित यांनी पुण्यातील नौजवान भारत सभेचा वर्षभरातील अहवाल सादर केला. यामध्ये वर्षभरात पार पाडलेली चर्चासत्रे, अभियाने, बुक स्टॉल्स, नौभास द्वारे आंदोलनातील सहभाग, भगतसिंह जनअधिकार यात्रेमधील सहभाग, शिक्षण सहायता केंद्र, फिरते वाचनालय इत्यादी कामांचा संक्षिप्त आढावा मांडण्यात आला.…
23 मार्च, शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या 93 व्या शहीद दिनानिमित्त
शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांचे स्वप्न अपुरे! कष्टकरी आणि नवयुवक करतील पुरे!! साथींनो, आज आपण एका अशा काळात जगत आहोत जेव्हा फासीवादी शक्तींचा हल्ला निरंतर वाढत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूला सामान्य जनता नरकासमान परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मजबूर आहे. लोकांनी संघटीत होऊ नये यासाठी कट्टरपंथ, सांप्रदायिकता आणि अंधराष्ट्रवादाचे जहर लोकांच्या डोक्यात भरले जात आहे. तर्क, प्रगतिशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या मूल्यांवर संघटीत हल्ले सुरु आहेत. अशा काळात भगतसिंह यांच्या शब्दात “क्रांतीचे चैतन्य जागे करण्यासाठी जेणेकरून मानवतेच्या आत्म्यात खळबळ पैदा होईल” आम्ही शहीद भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या 92…
भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 23 मार्च ला येणाऱ्या 93 व्या शहादत दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या वतीने आचार्य महाविद्यालय (चेंबूर) समोर क्रांतिकारी साहित्याचा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला.
विद्यार्थी व तरुणांना समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठीच्या संघर्षात सहभागी होण्याचे आवाहन करत आज भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांच्या 23 मार्च ला येणाऱ्या 93 व्या शहादत दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या वतीने आचार्य महाविद्यालय (चेंबूर) समोर क्रांतिकारी साहित्याचा पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला. भगतसिंहाने विद्यार्थी आणि तरुणांना आवाहन केले होते की त्यांनी क्रांती चा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायला हवा. हे लक्षात घेऊन नौजवान भारत सभेचे सदस्य भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे समाज परिवर्तनाचे मूळ विचार युवकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी मानखुर्द गोवंडी च्या भागात सातत्याने क्रांतिकारी साहित्य असलेल्या पुस्तकांचा स्टॉल लावतात. आजवर आपल्या देशातील…
धर्माच्या नावावर जनतेला विभागण्याचा फॅसिस्ट भाजपचा डाव हाणून पाडा! जनविरोधी सीएए कायद्याविरोधात एकजूट होत जनआंदोलन उभे करा!! CAA NPR NRC रद्द करा!
सीएए कायद्याविरोधात देशात परत एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, दिल्ली सोबतच देशात ठिकठिकाणी विरोध प्रदर्शने सुरु झाली आहेत. नेहमीप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आंदोलकांचे निर्घृणपणे दमन करत आहे. आंदोलन करणाऱ्यांना केवळ डिटेनच नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. राज्यसत्तेचे जनताविरोधी चरित्र पुन्हा एकदा समोर येत आहे. मोदी सरकार निवडणुका तोंडाशी असताना जेव्हा इलेक्टोरल बॉण्ड्स च्या घोटाळ्यात अडकले आहे तेव्हा त्यांनी काही दिवसांपूर्वी 11 मार्च रोजी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू करण्याबाबत अधिसूचना प्रसारित केली आहे, आणि सीएए कायद्यावर राजकारण…
७ मार्च रोजी साठे नगर, मानखुर्द येथे नौजवान भारत सभा (नौभास) चे सहयोग अभियान चालवण्यात आले.
अभियानात लोकांना आपल्या शहिदांच्या स्वप्नांची आठवण करून दिली गेली. भगत सिंह, सुखदेव, राजगुरू, ज्या स्वातंत्र्यासाठी लढले होते ते आज ही आपल्याला मिळाले नाहीये. शिक्षणाचे बाजारीकरण आज कामगार कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षणापासून दूर करत आहे. बेरोजगारी ची अवस्था इतकी वाईट आहे की आज ३२ कोटी तरुण बेरोजगार आहेत. आणि अशा मुद्द्यांवर युवकांनी सत्तेत बसलेल्या धनदांडग्यांना जाब विचारू नये म्हणून त्यांच्यात जाति धर्माची भांडण लावली जात आहेत. अभियानात नौजवान भारत सभेच्या विविध क्रांतीकारी सुधार कामांबद्दल लोकांना सांगितले गेले जसे की शहिद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र, शहिद सुखदेव फिरते वाचनालय, त्याच सोबत सध्या दहावीच्या…
भगतसिंह जनअधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या शेवटी आयोजित आंदोलनाला थांबवण्याच्या प्रयत्नात दिल्ली पोलिसांनी त्याला आणखी यशस्वी बनवले.
काल ३ मार्च ला जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे गेल्या तीन महिन्यांपासून चालु असलेल्या भगतसिंह जनअधिकार यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शेवट होणार होता. ही यात्रा 10 डिसेंबर 2023 पासून सुरू होती आणि 13 राज्य, 85 जिल्हे आणि 8500 किलोमिटर चा प्रवास पार करून 26 फेब्रुवारी 2024 ला दिल्लीत पोहोचली होती आणि तेव्हापासून दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात चालु होती. यात्रेचा भाग म्हणून बवाना इण्डस्ट्रियल एरिया, ट्रॉनिका सिटी इण्डस्ट्रियल एरिया, करावलनगर, खजूरी इत्यादी भागातील कामगारांनी संप पुकारला होता. तसेच 12 राज्यांमधून कामगार, स्त्रिया, विद्यार्थी तरुण आज दिल्लीला पोहोचले होते. सकाळी 11 वाजता कामगार, स्त्रिया, विद्यार्थी…
27 फेब्रुवारी, चंद्रशेखर आझाद ह्यांच्या बलिदानदिनाच्या निमित्ताने
साथींनो, 93 वर्षांपूर्वी म्हणजेच 27 फेब्रुवारी 1931 रोजी इंग्रजांशी लढतांना चंद्रशेखर आझाद शहीद झाले. शहिद चंद्रशेखर आझाद यांनी ज्या स्वप्नासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले ते आजही पूर्ण झालेले नाही. भांडवलशाही-सम्राज्यशाही आणि सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध लढणाऱ्या योद्धांमध्ये चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्यप्रदेश मधील भाबरा गावात झाला. एका अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला असल्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची संधीही मिळाली नव्हती. अगदी बालपणापासूनच चंद्रशेखर आझाद हे स्वातंत्र्य चळवळीतील आंदोलनांमध्ये सहभाग घेत. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी 1921 मध्ये सुरू असलेल्या असहकार…
नौजवान भारत सभेच्या शिक्षण सहायता केंद्राकडून जनता वसाहत येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 12 दिवसांच्या गणिताच्या क्रॅश कोर्सचे आयोजन.
साथींनो, मागच्या 7-8 महिन्यांपासून जनता वसाहत येथे नौजवान भारत सभेकडून 8वी, 9वी, 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमित शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येते. ज्यात गणित, इंग्रजी, विज्ञान हे विषय शिकवले जातात. वैज्ञानिक प्रयोग, मुव्ही स्क्रिनिंगसारखे उपक्रम देखील जनतेच्या आर्थिक सहयोगातून दाखवले जातात. 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरु होत आहेत, विद्यार्थी आणि पालकांकडून गणित विषयाचा क्रॅश कोर्स घ्यावा ही मागणी येत होती. त्यासाठी मागच्या 12, 13 फेब्रुवारीला वस्तीमध्ये घरोघरी जाऊन क्लाससाठी 10 वीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी अभियान चालवले आणि 14 फेब्रुवारीपासून 12 दिवसांचा गणिताचा क्रॅश कोर्स चालू केला आहे. शिक्षण सहायता केंद्र आणि यासारखे उपक्रम…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरात ‘द लेजंड ऑफ भगतसिंह’ चित्रपट दाखवला गेला.
केंद्रातील फॅसिस्ट मोदी सरकार दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा भव्य देखावा करण्याच्या फक्त दोन दिवस आधी 24 जानेवारी रोजी मुबई, मानखुर्द, साठे नगर मधील तब्बल 1200 हून अधिक घरे असलेल्या वस्तीवर महाराष्ट्रातील भाजप – शिंदे सरकार द्वारे बुलडोझर चालवला गेला. नौजवान भारत सभा सक्रियपणे या भागात कार्यरत आहे आणि वस्तीतील लोकांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या घराच्या हक्कासाठी लढत आहे. भगतसिंहाचे शब्द – “दिल्लीतील गोऱ्या सरकारच्या जागी भुरे सरकार” साठे नगरमधील प्रत्येकाच्या कानात दुमदुमत आहेत. सर्वांना घरे देण्याचे आश्वासन देत सत्तेत आलेल्या फॅसिस्ट सरकारने गेल्या 10 वर्षांत देशातील कामगार कष्टकरी जनतेलाच विस्थापित करण्याचे…
