नौजवान भारत सभा, पुणे तर्फे गेल्या अनेक महिन्यांपासून अप्पर-सुप्पर बिबवेवाडी परिसरातील कामगार-कष्टकऱ्यांच्या वस्तींतील मुलांसाठी व तरुणांसाठी दर शनिवारी आणि रविवारी शहीद चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स क्लब राबविण्यात येत आहे.

या मार्फत त्यांमध्ये शिस्त, लोकशाही प्रगतीशील मूल्ये आणि सामुहिकता रुजविण्याचे काम चालू आहे. परंतु हे स्पोर्ट्स क्लब फक्त क्रीडाकलापांपुरते मर्यादित नसून एक व्यापक क्रांतिकारी ध्येय डोळ्यासमोर ठेऊन चालविल्या जात आहे. आजरोजी फॅशिस्टांच्या मांडीवर बसलेल्या भांडवली मीडिया, प्रसारमाध्यमे, तसेच माहितीवर्धनाची आणि मनोरंजनाची सर्व दृकश्राव्य माध्यमे यांतर्फे जनतेवर भांडवली संस्कृतीचा व राजकारणाचा सतत मारा होत आहे आणि जनतेमध्ये जातीधर्माचे विष पेरण्याचे काम होत आहे. तेव्हा या राजकारणाला हाणून पाडणे आणि जनतेमध्ये प्रगतीशील दृकश्राव्याचा प्रसार करणे अत्यंत महत्त्वाचे होऊन बसले आहे. म्हणून ह्या स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळांसोबतच क्रांतिकारकांचा वारसा पुढे घेऊन जाण्याच्या उद्दिष्टाने…

पहलगाम दहशतवादी हल्ला : काश्मीरमध्ये शांतता स्थापित करण्याचे सारे दावे खोटे!

पर्यटक आणि सामान्य नागरिकांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेच्या अकार्यक्षमतेसाठी जबाबदार कोण? पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा बहाणा करून देशाला धर्मवादाच्या आगीत झोकून देण्याचा संघपरिवाराचा डाव हाणून पाडा! साथींनो, 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या पर्यटनस्थळी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जखमी झाले. नौजवान भारत सभा या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करते. या हल्ल्यात भारतातील विविध राज्यांचे नागरिक आणि एक परदेशी नागरिकही ठार झाला आहे. हल्ल्याची जबाबदारी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ नावाच्या अतिरेकी गटाने घेतली आहे, जो पाकिस्तानी अतिरेकी संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंधित आहे, असे मानले जाते. हल्ल्यादरम्यान…

पहलगाम दहशतवादी हल्ला : काश्मीरमध्ये शांतता स्थापित करण्याचे सारे दावे खोटे! पर्यटक आणि सामान्य नागरिकांना संरक्षण देणाऱ्या यंत्रणेच्या अकार्यक्षमतेसाठी जबाबदार कोण?

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरसह संपूर्ण देशातील न्यायप्रिय जनता दुःखी आणि रागात आहे. पण एक विषारी गट आहे ज्याच्या चेहऱ्यावर या अमानुष कृत्यानंतरही धूर्त हास्य झळकत आहे. संघ परिवार आणि भाजपशी जोडलेल्या विविध लंपट गटांचे चेहरे या दिवसांत खुश दिसत आहेत. त्यांना मुस्लिमांवर हल्ला करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. विविध राज्यांतून काश्मीरी विद्यार्थी आणि मुस्लिम कामगारांवर हल्ल्यांच्या बातम्या येत आहेत. धर्माच्या नावाने होणाऱ्या संघी दहशतवादाच्या सर्व घटनांकडे डोळेझाक करून झोपण्याचे सोंग करणारा गोदी मीडिया या दहशतवादी हल्ल्याला धर्मवादी रंग देण्यात गुंतला आहे. भाजपने पाळलेला आयटी सेल विविध प्रकारच्या खोट्या बातम्या प्रसारित करण्यात रमला आहे. त्याद्वारे या हल्ल्याच्या विरोधात उभा राहिलेल्या प्रत्येक काश्मीरीला दहशतवादी ठरवण्यात आणि देशातील प्रत्येक मुस्लिमाला संशयाच्या चौकटीत ढकलण्यात येत आहे. पाकिस्तानचे भूत उभे करून प्रत्येक काश्मीरी आणि मुस्लिमाला हिंदुस्थानचा शत्रू ठरवून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. आम्ही देशातील प्रत्येक न्यायप्रिय विद्यार्थी, तरुण आणि सामान्य जनतेला आवाहन करतो की भाजप आणि संघ परिवाराच्या सापळ्यात अडकण्यापासून वाचले पाहिजे. यांच्या नेत्यांची मुले परदेशात शिकत आहेत आणि चांगल्या पदांवर स्थायिक झाली आहेत, पण बेरोजगारीचा मार सहन करणाऱ्या आपल्या भावंडांना आणि मुलामुलींना हे लोक नष्ट करण्यास मुळीच संकोच करणार नाहीत. म्हणून मित्रांनो, शिक्षण, रोजगार, आरोग्यसेवा आणि आवास यासारख्या आपल्या मूलभूत हक्कांसाठी एकत्र या; धर्मवादी फॅशिस्टांच्या प्रचाराला बळी पडून आपल्याच भावंडांशी वैर बाळगू नका. काश्मीरी आणि गरीब, स्थलांतरित मुस्लिमांवर हल्ले करणाऱ्या गुंडांचा आपल्या एकतेच्या बळावर सामना करा, कारण अन्यायाला मूकपणे पाहणे म्हणजे अन्यायात सहभागी होण्यासारखेच आहे.

Condemn the environmental destruction done to service capitalists !

In the midst of one of the worst heatwaves this country has ever faced, Maharastra government clears projects that will end up clearing about 1,800 hectares of forest land. Which will result in about 4,00,000 trees getting cut down. The clearing of forests in Thane, Palghar, Gadchiroli, and Yavatmal is not just about losing trees-it’s about dismantling entire ecosystems. This project which the government claims is to build four mega infrastructure projects, will irreversiblely damage the ecology of Maharastra. The locations of these projects are especially dangerous to the environmental…

नौजवान भारत सभा द्वारे ऍबी मार्टिनच्या डॉक्युमेंटरीची स्क्रीनिंग – गाझा फाइट्स फॉर फ्रीडम चे आयोजन

पॅलेस्टिनी जनतेवर चालू असलेल्या नरसंहारात दररोज झायनिस्ट वसाहतवादी इस्रायली राज्याकडून केलेल्या अमानुष अत्याचारांच्या नव्या गोष्टी रोज समोर येत आहेत. संपूर्ण जगभरात लोक या अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत आणि पॅलेस्टिनी जनतेच्या स्वातंत्र्य लढ्याशी एकजूट दाखवत आहेत. भारतातही पॅलेस्टाइनच्या समर्थनासाठी प्रयत्न होत आहेत, जरी बहुसंख्य जनता अजूनही इस्रायली राज्याच्या प्रचाराच्या प्रभावाखाली येत असली जो पश्चिमी मिडियामार्फत अधिक तीव्र केला जातो. यामुळेच पॅलेस्टाइनच्या मुक्तीच्या लढ्याचा इतिहास समजून घेणे, त्यावर अभ्यास करणे आणि संवाद साधणे अत्यंत आवश्यक झाले आहे — विशेषतः गाझा पट्टी आणि वेस्ट बँकेत राहणाऱ्या लोकांवर दशकानुदशके चाललेली हिंसक दडपशाही समजून घेण्यासाठी.…

नौजवान भारत सभा, मुंबईतर्फे आयोजित केले गेले जालियानवाला बाग हत्याकांडाच्या स्मरणार्थ सरदार उधम चित्रपटाचे स्क्रीनिंग!

106 वर्षांनंतर देखील जालियानवाला बाग हत्याकांड देशाच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. 13 एप्रिल,1919 रोजी ब्रिटीश औपनिवेशिक सरकारच्या आदेशानुसार ब्रिटीश भारतीय फौजेने स्त्री, पुरुष व लहान मुले सामील असलेल्या, रौलेट कायदा 1919, ह्या कठोर, काळ्या कायद्याला शांततामय पद्धतीने विरोध करणाऱ्या जमावावर बेछूट गोळीबार केला. सरकारी आकडेवारीनुसार यात 400 मृत्यू दर्शवले गेलेत तर स्वतंत्र अहवालानुसार मारले गेलेल्यांची संख्या 1200 वर असल्याचे कळले. हे हत्याकांड भारताच्या वसाहतिक इतिहासातील अनेक बर्बर घटनांमधील एक ठळक उदाहरण आहे. स्क्रीनिंगनंतर झालेल्या चर्चेत वसाहतिक काळातील आणि स्वातंत्र्योत्तर काळापासून आलेल्या वेगवेगळ्या सरकारांनी लागू केलेल्या जन विरोधी कायद्यांमधील साधर्म्याबद्दल…

वक्फ (सुधारणा) कायद्याला विरोध करा! मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या फॅशिस्टांच्या रणनीतीला हाणून पाडा!

वक्फ (सुधारणा) कायद्याच्या रूपात मुस्लिमांना लक्ष्य करण्याच्या फॅशिस्ट हल्ल्याचा नौजवान भारत सभा तीव्र विरोध करते. संसदेमध्ये ह्या विधेयकाच्या चर्चेच्या वेळी अमित शहा यांनी म्हटले की मुस्लिमांच्या धार्मिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारचा उद्देश नाहीये तर मुस्लिमांच्या धार्मिक आणि सामाजिक संस्थांचे व्यवस्थापन पारदर्शी व्हावे, भ्रष्टाचार संपावा यासाठी हे विधेयक आणले गेले आहे आणि या कायद्याचा फायदा गरीब मुस्लिमांना, महिलांना होणार आहे. या कायद्याचे समर्थन करताना “लोकशाहीकरण”, “धर्मनिरपेक्षता” यांसारख्या तत्वांचा आधार देण्यात येत आहे, पण खरे पाहता हा मुस्लिमांवर एक फॅशिस्ट हल्लाच आहे. या कायद्याबद्दल समजण्याआधी कुठल्या राजकीय वातावरणात हा कायदा पारित होत…

नौजवान भारत सभा, पुणे तर्फे गेल्या आठवड्यात सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्रीचा ऑस्कर जिंकणारी पहिली पॅलेस्टिनी फिल्म “नो अदर लँड” दाखवण्यात आली.

पॅलेस्टिनी कार्यकर्ता बासेल याद्रा, हमदान बल्लाल आणि इस्रायलच्या कार्यकर्त्यांनी मिळून ही डॉक्युमेंट्री बनवली आहे. या फिल्ममध्ये मासाफेर येता हा इस्रायल व्याप्त वेस्ट बँक मधील भाग इस्रायली सैन्याची जागा म्हणून घोषित केला जाते आणि त्यानंतर पॅलेस्टिनी नागरिकांना कशाप्रकारे त्यांच्या घरातून बेदखल केले जाते याचे चित्रण केले आहे. 2019 – 2023 या काळात या डॉक्युमेंट्रीचे चित्रण करण्यात आले आहे. या निर्णयाच्या विरोधात पॅलेस्टिनी कार्यकर्ते इस्रायलच्या कोर्टात 22 वर्षे लढा देतात आणि त्यानंतर कोर्टाकडून निर्णय येतो की मासाफेर येता हा भाग इस्रायलच्या सैन्याचा प्रशिक्षणासाठी वापरला जाईल. हा निर्णय लागू करण्यासाठी स्थानिक जनतेची घरे…

‘जोतीराव फुले: जीवन आणि राजकारण’ ह्या नौभास आणि दिशा विद्यार्थी संघटनेतर्फे मुंबई येथे आयोजित सत्रात जोतीराव फुलेंचा जीवनपट मांडण्यात आला.

काढलेली पहिली शाळा, दलित, महार, मातंग आणि मागास वर्गासाठी काढलेल्या शिक्षण संस्था, विधवा केशवपनाविरोधात घडवून आणलेला न्हाव्यांचा संप, ग्रंथालय स्थापना, घरातील पाण्याची विहीर सर्वांसाठी खुली करणे, दुष्काळात चालवलेले अन्न्छत्र, बालकाश्रम, बाल हत्या प्रतिबंधक गृह, बॉम्बे मिल हंड्स असोसिअशन, सत्यशोधक विवाह, सत्यशोधक समाजाची स्थापना, इत्यादी जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेली कामे यांच्या अनुषंगाने समाजात अस्तित्वमान जातीभेद, स्त्रियांना मिळणारी दुय्यमत्वाची वागणूक, अवैज्ञानिक दृष्टीकोन, कामगारांची पिळकवणूक, यांविरोधात उचलेले विद्रोही पाऊल आणि जनतेच्या बळावर उभे केलेली संस्थात्मक कामे यांवर चर्चा केली. सुरुवातीला ब्रिटीश सरकारचे प्रशंसक असलेले जोतीराव नंतर वसाहतवादी ब्रिटीश सरकारच्या…

जनता वसाहत, पुणे येथे नौजवान भारत सभा द्वारे संचालित शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन संपन्न!

थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन व चर्चा! दिनांक 11 एप्रिल रोजी जनता वसाहत, पुणे येथे जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त नवीन शहीद भगतसिंह वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर साथी अरुण यांनी थोडक्यात नौजवान भारत सभेचा इतिहास व भूमिका यावर वक्तव्य केले. नौजवान भारत सभा देशातील तरुणांच्या, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत त्यांना एकजूट करण्याचे काम करते, रोजगार, शिक्षण, महागाई, आरोग्य यासारख्या जनतेच्या मुद्द्यांवर संघर्ष करण्यासोबतच समाजात रूढ असलेल्या अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, जातीयवाद, धर्मांधता याला विरोध करत एका न्यायपूर्ण समाजाचे…