15 ऑक्टोबर रोजी आंबिल ओढा परिसरातील पुरग्रस्त नागरिकांचे आंदोलन

आंबिलओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समितीतर्फे, तसेच `नौजवान भारत सभे’च्या पाठिंब्याने आज 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. 25 सप्टेंबर रोजीच्या ढगफुटीनंतर आंबिलओढा परिसरामध्ये अनेकांची घरे वाहून गेली, घरांच्या भिंती पडल्या, घरात गाळ साचून सर्व वस्तूंचे नुकसान झाले , मुलांच्या वह्यापुस्तकांपासून ते अंथरूण-पांघरूण सगळे नष्ट झाले, हातावर पोट असलेल्या कष्टकरी जनतेची आयुष्याची कमाई उध्वस्त झाली परंतू 3 आठवड्यांनंतरही सरकारी मदत पोहोचलेली नाही. यामुळे संतप्त असलेल्या नागरिकांना शेवटी आंदोलनाचाच मार्ग धरावा लागला. यावेळी आचारसंहितेचे निमित्त सांगून मेगाफोन न वापरण्याचे आणि घोषणा न देण्याचा आग्रह…

नौजवान भारत सभेची पंजाब समिती आणि सिरसा टीम द्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान नोटाचे बटण दाबण्याचा प्रचार करणाऱ्या अभियानाबद्दल त्यांनी जाहीर केलेले खोटे वक्तव्य आणि नौभास ची भूमिका

नौजवान भारत सभेची पंजाब समिती आणि सिरसा टीम द्वारे हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान नोटाचे बटण दाबण्याचा प्रचार करणाऱ्या अभियानाबद्दल त्यांनी जाहीर केलेले खोटे वक्तव्य आणि नौभास ची भूमिका ——————————————————— सर्व प्रथम ही माहिती देणे आवश्यक आहे की यापुढे नौभासच्या केंद्रीय फेसबुक पेज ची लिंक पुढीलप्रमाणे असेल: https://www.facebook.com/naubhas/ जुने पेज: https://www.facebook.com/naujavanbharatsabha/ इथून पुढे नौजवान भारत सभेच्या सर्वसाधारण सभेचे प्रतिनिधित्व करत नाही. जुन्या पेजवरून टाकण्यात आलेल्या कुठल्याही साहित्यासाठी नौजवान भारत सभा जबाबदार असणार नाही. हे जुने फेसबुक पेज आता भाषिक अस्मितावाद आणि भांडवली-राष्ट्रवादी विचलन झालेल्या नौभासच्या पंजाब समितीच्या नियंत्रणात आहे. नौभासच्या पंजाब समितीचे…

दिनांक 26, 27 रोजी पुण्यातील आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग, नौजवान भारत सभा आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान आणि औषध उपचार केंद्र चालवण्यात आले

पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्या नंतर दिनांक 26, 27 रोजी पुण्यातील आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग, नौजवान भारत सभा आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले. आधीच ओढ्यालगत असलेली कामगार-कष्टकऱ्यांची नाजुक, कच्ची खुराडांसारखी घरं, आयुष्य भराच्या कंबरतोड़ मेहनतीतुन जमा केलेली, कर्ज उचलून आणि नंतर फेडण्यात पाठ मोडेस्तोवर केलेल्या मेहनतीतुन घेतलेल्या संसाराच्या चीज-वस्तु, कपड़े, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य, लहान मुलांची खेळनी, वह्या-पुस्तकं, दप्तरं, कोणी नुकताच छोटा धंदा चालू करण्यासाठी कर्जावर काढलेला माल,…

पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्यानंतर 27 सप्टेंबरला आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात नौजवान भारत सभा, प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले.

पुण्यात 25 सप्टेंबर ला झालेल्या ढगफुटीने दांडेकर पूल परिसर आणि अनेक वस्त्यांमध्ये प्रचंड नुकसान केले. त्यानंतर 27 सप्टेंबरला आपत्तिग्रस्त अम्बिल ओढा भागात नौजवान भारत सभा, प्रोग्रेसिव डॉक्टर्स लीग आणि भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षा कडून कंबर कसुन दिवसभर स्वच्छ्ता अभियान चालवण्यात आले. आधीच नाजुक, कच्ची खुराडयासारखी असलेली कामगार कष्टकऱ्यांची घरं, आयुष्य भराच्या कंबरतोड़ मेहनतीतून जमा केलेली, कर्ज उचलून आणि नंतर फेडण्यात पाठ मोडेस्तोवर केलेल्या मेहनतीतुन घेतलेल्या संसाराच्या चीज-वस्तु, कपड़े, टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक साहित्य, नुकताच छोटा धंदा चालू करण्यासाठी कर्जावर काढलेला माल, उदरनिर्वाहाचे साधन असं सगळ-सगळ उध्वस्त झाले आहे. लहान मुलांची खेळणी,…

भगतसिंह – न्यायालय एक थोतांड आहे! (सहा सहकाऱ्यांची घोषणा)

कायदा जोपर्यंत जनतेचे मानस म्‍हणजे तिच्‍या भावना प्रकट करतो, तोपर्यंतच कायद्याचे पावित्र्य टिकून राहते. तो जेव्‍हा शोषक समूहांच्‍या हातातला कागदाचा कपटा बनून जातो, तेव्‍हा त्‍याचे पावित्र्य आणि महत्‍त्‍व तो हरवून बसतो. न्‍याय द्यायचा तर प्रत्‍येक प्रकारच्‍या लाभांचा आणि हितसंबंधांचा खातमा करणे ही मूलभूत गोष्‍ट आहे. कायदा जसजसा सामाजिक गरजा भागवणे बंद करत जातो; तसतसा तो जुलूम आणि अन्‍याय वाढवण्‍याचे हत्‍यार बनत जातो. असे कायदे चालू ठेवणे याचा म्हणजे सार्वजनिक हितावर विशेष हितसंबंधांची ढोंगी जबरदस्‍ती आहे, दुसरे काहीही नाही,

दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द (मुंबई) याठिकाणी ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचाराचे खरे वारसदार कोण?’ या विषयाला घेऊन पूर्ण साठे नगर मध्ये अण्णाभाऊ यांच्या कविता, पोवाडे व साहित्यामधील परखड विचार पोस्टरच्या माध्यमातून ठीक – ठिकाणी लावण्यात आले

दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द (मुंबई) याठिकाणी ‘लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचाराचे खरे वारसदार कोण?’ या विषयाला घेऊन पूर्ण साठे नगर मध्ये अण्णाभाऊ यांच्या कविता, पोवाडे व साहित्यामधील परखड विचार पोस्टरच्या माध्यमातून ठीक – ठिकाणी लावण्यात आले. त्यामध्ये ‘ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून, दलित – श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. अशा प्रकारच्या वैज्ञानिक तर्कशील विवेकी व परंपरागत धार्मिक मूल्य मान्यता यांना छेद देणाऱ्या विचारांचा समावेश करण्यात आला तर, मुंबईत उंचावरी ! मलबार हिल इंद्रपुरी ! कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती ! परळात राहणारे ! रात्रंदिवस…

आज दि. ३० ऑगस्ट २०१९ रोजी साठेनगर, मानखुर्द, (मुंबई) याठिकाणी लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘वसा आणि वारसा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याच्या क्रांतिकारी विचारांचा’ या विषयाला घेऊन अभियान चालविण्यात आले.

आज घडीला अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वच निवडणूक बाज पक्ष आणि त्यांच्या बटीक बनलेल्या संघटना साजरी करता आहेत. साठे नगर मध्ये देखील विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल कडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. खरंतर अशा संघटना व अशा प्रकारच्या पक्षाकडून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे कार्यक्रम घेणे किंवा त्यांचे नाव घेणे देखील त्यांच्या विचाराचा व कर्तुत्वाचा अपमान आहे. असे म्हणावे लागेल कारण लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा लढा हा पूर्ण आयुष्य जातिव्यवस्था निर्मूलन झाले पाहिजे, गरीबी व श्रीमंती ही दरी पूर्णपणे संपून सर्वांना समान अधिकार व…

अय्यंकाली जयंती – महान अय्यंकाली यांच्या वारशाला लक्षात ठेवा! क्रांतिकारी जातिअंताच्या आंदोलनाला पुढे न्या!

अनेक जाती विरोधी व्यक्तीत्वांना खुद्द भारत सरकारनेच स्वातंत्र्यानंतर प्रचारित-प्रसारित केले आहे, पण अय्यंकालींना नाही. का? कारण अय्यंकाली मुलगामी पद्धतीने आणि झुंझार पद्धतीने रस्त्यांवर उतरून संघर्षांचा रस्ता स्विकारत होते, कारण अय्यंकाली सरकारच्या सदिच्छेवर किंवा समजदारीवर भरवसा करत नव्हते, उलट जनतेच्या पुढाकारावर भरवसा करत होते. सत्ताधारी वर्ग सुद्धा त्यांच्या जीवनकार्याच्या या बाजूवर गप्प बसून असतो आणि फक्त पूजा आणि सन्मानाच्या गप्पा करतो, कारण जर कष्टकरी दलित आणि दडपलेली जनता त्यांच्याबद्दल जाणेल, तर त्यांच्या मार्गाबद्दलही जाणेल आणि हे सध्याच्या भांडवली आणि जातीयवादी सत्तेला कधीच मान्य नसेल की त्यांच्या विरोधात मुलगामी संघर्षांच्या रस्त्याने जनतेने जावे आणि स्वत:च्या पुढाकारावर भरवसा निर्माण करावा. हेच कारण आहे की अय्यंकालींच्या वारशाला जनतेच्या शक्तीने लक्षात ठेवले पाहिजे. त्यांच्या स्मृतींना प्रगतीशील शक्तींनी जिवंत ठेवले पाहिजे. त्यांच्या आंदोलनाच्या रस्त्याला व्यापक कष्टकरी आणि दलित जनतेमध्ये आपल्याला घेऊन जावे लागेल.

शहीद राजगुरु यांच्या 111व्या जन्मदिना निमित्त कामगार कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींना वक्तृत्वाची संधी!

संघर्ष आणि निर्माण या दोहोंची सांगड घालत नौभास शहीद भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या विचारांमधील क्रांतीकारी परिवर्तनाचा प्रचार करत आहे.”जनतेची सेवा करा” हा नौजवान भारत सभेचा नारा आहे. नौजवान भारत सभा, पुणे युनिटद्वारे हा नारा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी 130, दांडेकर पूल वस्तीमध्ये शिक्षण सहायता केंद्र व ग्रंथालय चालवते आणि कामगार-कष्टकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे याचा नेहमी प्रयत्न करत असते. शहीद शिवराम राजगुरू यांच्या 111व्या जन्मदिना(24 ऑगस्ट) निमित्त वस्तीमध्ये 7 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी 25 ऑगस्ट, रविवार रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अनेक मुलांनी उत्साह दाखवत ‘भगत सिंह व…