नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चालू राजकीय घडामोडींवर चर्चासत्र घेण्यात आले.

चर्चासत्रात भारत सरकारची ‘अग्निपथ’ योजना, शिवसेनेत पडलेली फूट आणि मानव अधिकार कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांना झालेली अटक ह्या मुद्द्यांवर मुख्यत्वे चर्चा केली गेली. अग्निपथ योजनेवर सरकारने गरीब कामगार घरांतून येणाऱ्या युवकांच्या भविष्याशी केलेली थट्टा यावर चर्चा केली गेली. अग्निपथ योजनेविरोधात अनेक ठिकाणी युवकांची आलेली प्रतिक्रिया ही बेरोजगारीच्या व्यापक प्रश्नाचाच एक भाग आहे. एकीकडे देशभरात सर्वच क्षेत्रांत जवळजवळ पूर्णपणे पसरलेले ठेकाकरण, रोजगाराची नसलेली हमी, दररोज नोकरीच्या आशेने दारोदारी भटकणारा युवक व दुसरीकडे अंबानी, अडाणी यांसारख्या सरकारचा ‘सिद्धहस्त’ प्राप्त झालेल्या भांडवलदारांची, नेत्या – मंत्र्यांची अहोरात्र वाढत जाणारी संपत्ती हेच दाखवून देते कुठलेही…

सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अग्निपथ योजनेविरोधात अभियान करण्यात आले.

अग्निपथ योजनेला फासीवादी मोदी सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या योजनांचे पुढचे पाऊल समजले पाहिजे. लष्कर आणि निमलष्करी दलात कंत्राटीकरण आणल्याने बेरोजगरीने त्रस्त युवकांचा असंतोष उफाळून आला आहे. आज देशातल्या सगळ्याच तरूणांसमोर रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा वेळेस सगळ्या तरुणांनी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या तरूणांना पाठिंबा दिला पाहिजे आणि रोजगाराच्या अधिकारासाठी संघटित झाले पाहिजे. नौजवान भारत सभा ही मागणी करत आहेत की: 1. ‘अग्निपथ’ योजनेला तात्काळ कचरापेटी दाखवावी कारण हा देशातील युवकांच्या रोजगाराच्या प्रमुख स्रोतावर हल्ला आहे आणि त्यांच्या ठेकेदारीकरणाची तयारी आहे. 2. सर्व सैनिकी आणि अर्धसैनिकी दलांमध्ये तसेच केंद्रीय सशस्त्र…

“अग्निपथ” मुद्द्यावर नौजवान भारत सभा आणि दिशा विद्यार्थी संघटना यांचे संयुक्त वक्तव्य: फॅसिस्ट मोदी सरकारचे नवीन फर्मान : आता ठेकेदारीने करावी लागेल “राष्ट्र-सेवा”

‘अग्निपथ’ हा लाखो विद्यार्थी आणि तरुणांच्या रोजगाराच्या हक्कावरचा हल्ला आहे, हे हुकूमशाही फर्मान तात्काळ रद्द करा! ‘अग्निपथ’ च्या विरोधातील युवकांचे बंड सामान्यपणे बेरोजगारीच्या विरोधातील युवकांच्या बंडाचा भाग आहे. बंधू-भगिनी आणि मित्र-मैत्रिणींनो! दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणारे मोदी सरकार असलेल्या नोकऱ्याही हिसकावून घेत आहे. विविध विभागांतील पक्क्या नोकऱ्या समाप्त करून कंत्राटी व करारावर आधारित नोकऱ्या सुरू केल्या जात आहेत. आता मोदी सरकारने ‘अग्निपथ’ योजनेंतर्गत देशाच्या लष्कर आणि निमलष्करी दलांच्या कंत्राटीकरणाची योजना सादर केली आहे. या अंतर्गत सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या मुला-मुलींच्या रोजगारावर थेट आघात होणार आहे. पहिली चार वर्षे सैन्यात…

अमर शहीद करतार सिंह सराभा जिंदाबाद!

साथींनो! एकोणवीस वर्षाच्या वयात शहीद होणारे गदर पार्टीचे नायक करतार सिंह सराभा यांचा 24 मे हा जन्मदिवस आहे. करतार सिंह सराभा यांचा जन्म 24 मे 1896 रोजी पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यातील सराभा गावात झाला होता. लुधियाना येथून मॅट्रिक पास केल्यानंतर इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी ते सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका येथे गेले होते. अमेरिकेमध्ये लाला लाला हरदयाल, मुहम्मद बरकतउल्ला, सोहन सिंह भकना इत्यादी देशप्रेमींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ‘हिंदी असोसिएशन ऑफ पॅसिफिक कोस्ट’ नावाच्या पार्टीची स्थापना केली होती. पार्टीद्वारे ‘हिंदुस्तान गदर’ नावाचे वृत्तपत्र काढले जात होते, त्यामुळे पार्टी गदर पार्टीच्या नावाने ओळखली जाऊ लागली.…

शहीद सुखदेव यांच्या जन्मदिनानिमित्ताने (15 मे)

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ‘सुखदेव’ असे नाव आहे जे केवळ देशभक्तीच नव्हे तर धाडस आणि बलिदानाचे सुद्धा प्रतीक आहे. 23 मार्च 1931 या दिवशी सुखदेव यांना त्यांचे दोन क्रांतिकारी साथी भगतसिंह आणि राजगुरू यांच्यासोबत फाशी देण्यात आली होती. बलिदानाच्या इतक्या वर्षानंतर सुद्धा हे शहीद जनतेच्या हृदयात अजूनही जिवंत आहेत. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना इंग्रज सरकारने 23 मार्च 1931 रोजी लाहोर षडयंत्र खटल्यामध्ये फाशी दिली होती. या वीरांना फाशी देऊन इंग्रज सरकार या भ्रमात होते की भारताची जनता या कारवाईने भयभीत होईल आणि स्वातंत्र्याच्या भावनेला विसरून जाऊन विद्रोह करणार नाही. परंतु…

राहुल सांकृत्यायन यांच्या स्मृतिदिनी (14 एप्रिल) नौजवान भारत सभेतर्फे ‘राहुल सांकृत्यायन साहित्य वाचन दिवस व चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते.

राहुल सांकृत्यायन यांच्या स्मृतिदिनी (14 एप्रिल) नौजवान भारत सभेतर्फे ‘राहुल सांकृत्यायन साहित्य वाचन दिवस व चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते. ह्यात राहुल सांकृत्यायन यांनी लिहिलेले विविध साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले होते ज्यात तुम्हारी क्षय, दिमागी गुलामी, भागो नही दुनिया को बदलो, घुमक्कड शास्त्र, वोल्गा ते गंगा, साम्यवाद ही क्यों, स्तालिन जीवनी, इत्यादी पुस्तकांचा समावेश होता. सहभागी सर्वांनी वेगवेगळे लेख वाचून शेवटी घेण्यात आलेल्या चर्चा सत्रात आपले वाचतांना आलेले अनुभव, मत मांडले.

महा विद्रोही राहुल सांकृतायान यांच्या जन्मदिवस (9 एप्रिल) व स्मृतिदिनािमित्त (14 एप्रिल) नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चर्चा सत्र घेण्यात आले.

चर्चा सत्रात प्रथमत राहुल सांकृतायान यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला व नंतर त्यांनी लिहिलेला ‘ तुमच्या समाजाचा ह्रास’ हा लेख वाचून त्यावर चर्चा करण्यात आली. आज घराघरात परिचित असावी अशी ही व्यक्ती असून देखील भांडवली व्यवस्थेसाठी त्यांचे विचार घातक असल्याने भांडवली विचारधारेचा प्रचार प्रसार करणाऱ्या संपूर्ण प्रणालीने त्यांना घराघरात पोहचू दिले नाही. आज समाजात धार्मिक, जातीय द्वेष पसरवण्याचे काम युद्धस्तरावर होत असतांना, तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली असतांना, श्रीमंत – गरीब दरी दिवसेंदिवस वाढत असतांना, गरीब – कष्टकरी जनतेचे अतोनात हाल होत असतांना राहुल सांकृतायान यांचे विचार समाजाला…

काल दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त फुलेवाडा, पुणे येथे नौजवान भारत सभे तर्फे बुकस्टॉलचे आयोजन करण्यात आले.

फुलेवाड्यात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले वास्तव्यास होते. याच ठिकाणी ज्योतिराव फुले सत्यशोधक समाजाच्या बैठका घेत असत, म्हणून या जागेचे विशेष महत्व आहे. ज्योतिराव फुल्यांनी पुण्याच्याच भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. विधवा विवाहाला समर्थन, विधवांचे केशवपन थांबविण्‍यासाठी न्हाव्यांचा संप, बाल विवाहाला विरोध, मुलांचे संगोपन अशा एक ना अनेक गोष्‍टींतून ज्योतीराव-सावित्रीबाईंचा स्‍त्री समतेचा, स्‍त्री स्‍वातंत्र्याचा दृष्‍टीकोन सुद्धा समोर येतो. स्‍त्री मुक्‍ती व जातीय उच्‍चाटनाच्‍या संघर्षांमध्‍ये फुल्‍यांनी महत्‍वाचे योगदान दिलेले आहे. बुकस्टॉलला विद्यार्थी युवकांनी व जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. बुकस्टॉलवरील भगतसिंहांचे जाती धर्माचे झगडे सोडा, क्रांतिकारी कार्यक्रमाचा मसुदा, मी…

शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला 22 मार्च रोजी पुण्याच्या सुपर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंह वाचनालयाचे तसेच शिक्षण सहायता केंद्राची सुरवात करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरवात साथी सुस्मितने शहीदांच्या अभिवादनाने केली. भगतसिंह आणि त्यांचे साथीदार ज्या इंकलाबचे स्वप्न पाहत होते ते स्वप्न आजही अपूर्ण आहे. आजच्या तरुणांना शहीदांपासून प्रेरणा घेत आजच्या समाजातील अंधकारमय वातावरणात निराश होऊन न जाता तरुणांमध्ये, कामगार कष्टकऱ्यांमध्ये क्रांतीची चेतना पेटवली पाहिजे. आपल्या संकल्पांमध्ये शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे विचार आजही जिवंत आहेत आणि आपल्या पुढच्या वाटचालीत नेहमीच आपल्याला प्रेरणा देत राहतील. साथी भीमाने वस्तीतल्या तरुणांची भीषण परिस्थिती मांडली. कामगार कष्टकरी पार्श्वभूमीतून येणाऱ्या तरुणांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी नसल्याने आजचा तरुण व्यसन, गुंडगिरी आणि आत्महत्यांना बळी पडत आहे. तरुणांच्या भविष्यात अंधाराशिवाय…

नौजवान भारत सभेचे(नौभास) पहिले महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न काल, 23 मार्च 2022 रोजी, शहीद दिनाच्या निमित्ताने नौजवान भारत सभेचे पहिले महाराष्ट्र राज्य संमेलन पुणे येथे संपन्न झाले.

यावेळी मुंबई, पुणे, अहमदनगर आणि राज्याच्या इतर भागातून आलेल्या नौभासच्या सदस्यांनी मिळून आजवरच्या कार्याचा आढावा घेतला, राज्य कार्यकारणीची निवड केली, तत्कालीन पुढील कामांकरिता महत्वाचे ठराव पारित केले; तसेच खुल्या सत्रामध्ये व्याख्याने, क्रांतिकारी गीत व सडक नाटक सादरीकरण केले व शहीद अभिवादन फेरी काढली. नौजवान भारत सभेच्या घटनेनुसार झालेल्या या पहिल्या राज्यसंमेलनाची सुरूवात नौजवान भारत सभेचा झेंडा उभारून आणि शहीदांना क्रांतिकारी अभिवादन करून झाली. यानंतर पुणे समन्वयक रवि यांनी आजवरच्या नौभासच्या राज्यातील कामांचा आढावा मांडला. यावेळी देशपातळीवर झालेले भगतसिंह रोजगार हमी कायद्याकरिताचे (बसनेगा) आंदोलन, प्रदूषणकारी बायोवेस्ट प्रकल्पापासून ते पुरग्रस्तांकरिता आणि झोपडपट्टी…