मीटिंगमध्ये डॉ. निखिल यांनी नौभासची ओळख दिली आणि त्यासोबतच कामकरी जनतेच्या हक्क व अधिकारांसाठी, मोफत आणि दर्जेदार शिक्षण आणि सन्मानजनक रोजगाराच्या हक्कासाठी आणि फॅसिझमच्या विरोधात संघटित होण्याचे तरुणांना आवाहन केले. साथी अतुल यांनी नौभास अहमदनगर युनिटच्या मागील 5 वर्षातील कामांचा आढावा मांडला आणि साथी अविनाश यांनी नौभासच्या देशभरातील कामांचा संक्षिप्त आढावा मांडला. वार्षिक मीटिंगमध्ये दोन तरुणींना नविन सदस्यता देण्यात आली. त्यानंतर नौभास सदस्यानी साथी अतुल ह्याला एकमताने 2022 साठी समन्वयक म्हणून निवडून दिले. मीटिंगच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व उपस्थितांनी नौभासच्या एकंदरीत आतापर्यंतच्या कामातील सकारात्मक-नकारात्मक शिकवणी आणि पुढील कामाच्या विस्तारासाठी प्रस्ताव दिले…
Author: nbs_upload
नौजवान भारत सभेतर्फे आज “रशिया-युक्रेन युद्ध: कोणाची बाजू योग्य?” या विषयावर सामाजिक-राजकीय घडामोडींचे अभ्यासक प्रा. अभिजित अ. मी. यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
गॅस पाईपलाईन, गॅसचे साठे, तेलाचे साठे, पाण्याचा पुरवठा, संभाव्य सामरिक मोर्चेबांधणी, नाटो आणि रशिया दोघांची विस्तारवादी महत्वकांक्षा आणि या सर्वांमागे असलेले भांडवली आर्थिक संकट ही भौतिक कारणे या युद्धामागे आहेत आणि “लोकशाही”, मैत्री, देशप्रेम हे फक्त प्रसारमाध्यमांद्वारे जनतेसाठी दिखाव्याचे मुद्दे आहेत. हे युद्ध साम्राज्यवादी गटांमधील स्पर्धेचा परिणाम असून रशियन आणि अमेरिकन साम्राज्यवादी गटांच्या आपसातील स्पर्धेत युक्रेन होरपळून निघत आहे. भांडवली प्रसारमाध्यमे त्यांच्या विशिष्ट भांडवली हितसंबंधी गटांच्या बाजूने मांडत कोणी रशियन साम्राज्यवादाला तर कोणी अमेरिकन साम्राज्यवादाला दोषी मानत आहेत, जेव्हा की दोन्ही गट साम्राज्यवादीच आहेत. युक्रेनच्या राजकारणातही कामगार-कष्टकरी वर्गांच्या बाजू कमजोर…
27 फेब्रुवारी, चंद्रशेखर आझाद ह्यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने
कष्टकरी साथींनो आणि तरुण मित्रांनो, जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता करता स्वातंत्र्यानंतरच्या पिढ्यांनी खूप काही बघितलं, जाणलं आणि भोगलं आहे. त्यांनी जनतेच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांच्या सर्वोच्च बलिदानासोबत भांडवलधार्जिण्या पुढाऱ्यांचे तडजोडी देखील बघितल्या आहेत. त्यांनी सत्तासूख आणि निहीत स्वार्थासाठी होणारं देशाचं धार्मिक विभाजन आणि धार्मिक दंगली सुद्धा बघितल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर स्वतःच्या जमिनीवरून उध्वस्त होणारे शेतकरी व मजूर बघितले आहेत. रोजगाराच्या शोधात वणवण भटकणारे तरुण बघितले आहेत. देशात भरपूर खाद्यान्न असतानासुद्धा भूक आणि कुपोषणाने होणारे मृत्यु बघितले आहेत. देशातील कष्टकरी जनतेची आजची पिढीसुद्धा त्याच समस्या, अडचणी व संघर्षांमध्ये गुंतलेली आहे…
27 फेब्रुवारी हा ‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ (HSRA) चे आर्मी कमांडर इन चीफ शहीद चंद्रशेखर आझाद यांचा शहादत दिवस.
काल चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदान (२७ फेब्रुवारी) दिनानिमित्त नौजवान भारत सभेच्या सिद्धार्थनगर,अहमदनगर येथील शहीद भगतसिंह वाचनालयात कार्यक्रम घेण्यात आला.
साथी अतुलने चंद्रशेखर आझाद यांच्या जिवन कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. चंद्रशेखर आझाद,भगतसिंह व त्यांच्या इतर साथीदारांनी ज्या धर्मनिरपेक्ष व समतापूर्ण समाजाचे स्वप्न पाहिले होते व त्याच साठी अतिशय कमी वयात देशासाठी बलिदान दिले होते ते स्वप्न आजही पूर्ण झालेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७५ वर्ष पूर्ण झाली तरीही आज आपण पाहतोय की बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतेय, महागाईने कळस गाठलाय, शिक्षणाचे खाजगीकरण वाढत आहे, कामगार कष्टकऱ्यांची अवस्था पूर्वीपेक्षा आणखीनच दयनीय होत आहे, धार्मिक तेढ वाढत आहे. शहिदांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. याची जाणीव करून…
27 फेब्रुवारी हा ‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ (HSRA) चे आर्मी कमांडर इन चीफ शहीद चंद्रशेखर आझाद यांचा शहादत दिवस.
27 फेब्रुवारी हा ‘हिन्दुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन एसोसिएशन’ (HSRA) चे आर्मी कमांडर इन चीफ शहीद चंद्रशेखर आझाद यांचा शहादत दिवस. समाजवादाचे स्वप्न उराशी बाळगून देशात क्रांती घडवून आणण्याचा उद्देशाने साम्राज्यवादी इंग्रज सत्तेविरुद्ध लढताना या क्रांतिकारकाने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. पुण्यातील दांडेकर पूल भागात सर्व्हे क्र. 214 येथे नौजवान भारत सभेतर्फे चंद्रशेखर आझाद यांना शहादत दिवसानिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी साथी रवि यांनी चंद्रशेखर आझाद यांच्याविषयी बोलत असताना त्यांचे आयुष्य, स्वभाव, क्रांतिकारी कारवायांमधील सहभाग याबद्दल महिती दिली आणि क्रांतिकारकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांना संघटित होण्याचे आवाहन…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे दिल्ली स्टेट अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्स युनियन च्या संपाला पाठिंबा
दिल्लीत आपल्या मानधन, पक्का रोजगार, इत्यादी मागण्यांना घेऊन अंगणवाडी कर्मचारी महिला मागील 19 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे साथी सिमरन यांनी मांडले की भगतसिंहांच्या स्वप्नातील स्वातंत्र्य ते आहे ज्यात सर्व कारखाने, शेती – बागा, संपत्ती निर्माणाची साधने यांवर कामगार कष्टकऱ्यांची सामूहिक मालकी असेल. अंगणवाडी महिलांचा हा क्रांतिकारी लढा त्याच स्वप्नपूर्तीच्या मार्गातील एक मैलाचा दगड आहे. कामगार – कष्टकऱ्यांच्या न्याय्य लढ्यासोबत उभे राहणे नौजवान भारत सभा आपले कर्तव्य मानते. ज्या एकजुटतेचे प्रदर्शन करत संघर्षरत महिला हा संप चालवत आहेत त्याची दखल संपूर्ण देशभरात घेतली जात आहे. केजरीवाल…
आज महान क्रांतिकारी, जर्मन नाटककार आणि कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांचा जन्मदिवस.
आज महान क्रांतिकारी, जर्मन नाटककार आणि कवी बेर्टोल्ट ब्रेख्त यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ब्रेख्त यांचं एक उध्दरण सादर करत आहोत. “सर्वात भिकार निरक्षर कुणाला म्हणावं तर राजकीय निरक्षराला. तो ऐकत नाही, बोलत नाही, राजकीय प्रक्रियेत सहभागी होत नाही. त्याला कळत नाही की जगण्याची किंमत, डाळीचे भाव, मासळीचे दर, पिठामिठाची किंमत, घरभाडं, जोड्यांची किंमत, औषधांच्या किमती सारं काही राजकीय निर्णयांवरून ठरतं. आपल्या राजकीय अजाणतेपणाचा त्याला अभिमान सुद्धा वाटतो आणि छाती फुगवून तो सांगत रहातो की मी राजकारणाचा द्वेष करतो. त्या राजकीय बेअक्कल माणसाला हे कळत नाही की त्याच्या राजकीय अज्ञानातूनच जन्माला येते…
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या विचारसरणीला घाबरणारे आता त्यांच्या शहादतीशी संबंधित अफवा पसरवत आहेत!
या तीन शहीदांना 7 ऑक्टोबर 1930 रोजी फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि 23 मार्च 1931 रोजी त्यांना फाशी देण्यात आली. या शहीदांना 14 फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात आली, असा खोटा प्रचार संघी निंदक गेल्या काही वर्षांपासून सातत्याने करत आहेत! एकीकडे ते या शहीदांशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतात, तर दुसरीकडे व्हॅलेंटाइन डेला आपला विरोध सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतात! भारतीय फॅसिस्टांचे हा गोबेल्स शैलीचे मिथ्या-प्रचार उघड व्हायला हवा! ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा! नौजवान भारत सभा
पुण्याच्या दांडेकर पूल भागात नौजवान भारत सभेद्वारे संचालित शिक्षण सहायता केंद्रामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी व आत्मरक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहे.
पुण्याच्या दांडेकर पूल भागात नौजवान भारत सभेद्वारे संचालित शिक्षण सहायता केंद्रामध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी व आत्मरक्षणाचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. आठवी, नववी व दहावीच्या वर्गांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग चालवले जात आहेत. शिक्षणाचे काम करत असताना हे लक्षात आले आहे की विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास खूप मागे राहिला आहे. आधीच शिक्षणाची दुरावस्था आहे आणि त्यात कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. गरीब विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे बाहेर शिकवणी वर्ग लावू शकत नाही, सरकारी शाळांची अवस्था वाईट आहे आणि खाजगी शाळांमध्ये तेच लोक शिक्षण घेऊ शकतात जे लाखांमध्ये फी भरू शकतात.…
