पोलिस, अधिकारी – जनतेचे सेवक नाहीत ! भांडवली सत्तेच्या हुकूमाचे गुलाम!

दिनांक 24 जून रोजी 133 आंबिलओढा वसाहतीवर बुलडोझर चालवला गेला. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. लोकांना विश्वासात न घेता पोलिसी बळाचा बापर करून काही घरं जमीनदोस्त करण्यात आली. जनतेच्या आंदोलनादरम्यान जनतेमधीलच काही लोकांकडून असे येत होते की पोलिसांची यात काही भुमिका नाही, मनपाची काही भुमिका नाही, सर्व दोष फक्त बिल्डरचा आहे, वगैरे. निश्चितपणे पोलिस किंवा मनपा अधिकारी स्वत:हून निर्णय येऊन घरे पाडण्याचे काम ना करत होते, ना करू शकतात. त्यांना असा अधिकारच नसतो आणि जर त्यांनी असे केले तर त्यांच्यावरच कारवाई होऊ शकते. परंतु वास्तवामध्ये आंदोलन करणाऱ्या…

गरीब कामगार-कष्टकऱ्यांची घरे तोडणाऱ्या बिल्डरधार्जिण्या पुणे-मनपाचा धिक्कार! जनतेच्या संघर्षामुळे तात्कालिक उसंत अनेकांचे संसार उध्वस्त झाल्यानंतर आंबिलओढा परिसरातील झोपडपट्टी उध्द्वस्तीकरणाला स्थगिती

आज 24 जून रोजी पहाटेपासून नागरिकांचा जगण्याच्या अधिकारासाठी चालू असलेल्या संघर्षामध्ये जवळपास 10 लोकांची घरे तोडली गेल्यानंतर कोर्टाचा ‘स्टे’ आल्यामुळे उध्वस्तीकरण थांबले आहे. कोणत्याही प्रकारे तात्कालिक आगाऊ सूचना न देता पुणे महानगरपालिकेने प्रचंड पोलिस फौजफाट्यासहित 133 दांडेकर पूल येथील घरे तोडणे चालू केले. यादरम्यान लोकांनी पाऊस आहे, करोना आहे अशामध्ये अचानक घरे उध्वस्त केल्यास आम्ही कसे जगायचे हा प्रश्न अनेकदा उपस्थित केला, परंतु पाशवी सत्तेला या प्रश्नांशी कधीच देणेघेणे नसते, कारण तसे असते तर त्यांनी घरे तोडण्याचा निर्णय घेतलाच नसता. अचानक झालेल्या कारवाईमुळे जनतेमध्ये अफरातफरीचे वातावरण तयार झाले होते. या…

नौभास आणि अखिल भारतीय जाती विरोधी मंच कडून नांदेड जिल्ह्यात झालेल्या जातीय अत्याचाराचा आणि दलितांवर टाकलेल्या बहिष्काराचा तीव्र निषेध.

दिनांक २७ एप्रिल रोजी, रोही पिंपळगाव नामक नांदेड जिल्ह्यातील गावात तब्बल ३० दलित कुटुंबांचा गावातील मनुवादी शोषकांकडून बहिष्कार करण्यात आला. बहिष्काराचे कारण की दोन दिवस पूर्वी गावात दलित युवकांनी आंबेडकर जयंतीनिमित्त रॅली काढत गावामध्ये घोषणा दिल्या. यातून मग २६ तारखेला सवर्ण जातीयवादी लोकांच्या एका गटाने रॅली काढणाऱ्या दलित युवकांपैकी काहींना फक्त रॅली काढल्याबद्दल व घोषणा दिल्याबद्दल मारहाण केली, शिवीगाळ केला आणि धमकावले देखील. याच कारणाने मारहाण झालेल्या दलित युवकांनी २७ तारखेला ‘ॲट्रॉसिटी ॲक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी सकाळी सकाळी पोलीस स्टेशन गाठल्यावर तेथे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, तिथल्या एस.पी.ने…

पुण्यातील दांडेकर पूल भागामध्ये 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त पत्रक वाटून भाषण देत अभियान करण्यात आले.

कामगार दिनाचा इतिहास, आजची कामगार वर्गाची परिस्थिती, भगतसिंहाचे अपूर्ण स्वप्न, मागच्या एक वर्षापासून कोरोनामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या कामगार वर्गविरोधी धोरणांमुळे कामगार-कष्टकरी वर्ग सहन करत असलेल्या हालअपेष्टा यांवर भाष्य करण्यात आले. कोरोना संकटाचा सर्वाधिक मार पडला आहे तो कामगार-कष्टकरी वर्गावर. अगोदर अनियोजित, अमानवी लॉकडाऊनमध्ये मोदी सरकारने काहीही मदत न करता कंबरडे मोडले, बेरोजगार केले, उपासमार घडवली, कोट्यवधी कामगारांना शेकडो-हजारो किलोमीटर पायी चालवले. वर्षभर भांडवलदारांच्या नफ्याच्या चिंतेत गुंतलेल्या राज्य-केंद्र सरकारांनी आता दुसऱ्या लाटेसाठी ऑक्सिजन, औषधे, बेड, आयसीयू, लशीचे कारखाने वाढवलेच नाहीत. परिणामी आता काळ्याबाजारात लाखो-कोटी खर्चून सुद्धा इलाज दुर्लभ आहे. सर्वांना मोफत आणि…

23 मार्च भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त दांडेकर पूल परिसर, पुणे येथे “द लीजेंड ऑफ भगतसिंग” हा चित्रपट दाखवण्यात आला.

23 मार्च भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांच्या शहीद दिनानिमित्त दांडेकर पूल परिसर, पुणे येथे “द लीजेंड ऑफ भगतसिंग” हा चित्रपट दाखवण्यात आला. राजकुमार संतोषी दिग्दर्शित हा चित्रपट २००२ साली प्रकाशित झाला. चित्रपट “हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन” चे सहकारी सदस्यांसह व भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या समाजवादी क्रांतिकारक भगतसिंह यांच्या क्रांतिकारी जीवनावर प्रकाश टाकणारा आहे. चित्रपट आशयाच्या अंगाने तोकडा असल्याकारणाने प्रदर्शन सुरू होण्याच्या आधी नौभास चे कार्यकर्ते रवी यांनी HSRA व क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांचा इतिहास थोडक्यात मांडला. सिनेमा संपल्यावर कार्यक्रमाची सांगता “भांडवलशाही मुर्दाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, इंकलाब जिंदाबाद” अशा क्रांतिकारी ऐतिहासिक वारसा…

शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदान दिनानिमित्त नौभास, मुंबई तर्फे कार्यक्रम व रॅलीचे आयोजन

27 फेब्रुवारी शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या बलिदानाला आज 90 वर्षे पूर्ण झालीत. त्याच पार्श्वभूमीवर नौभास, स्त्री मुक्ती लीग, बिगुल मजदूर दस्ता, मुंबई तर्फे गोवंडीतील रफिक नगर भागात शहीद स्मृती अभियान व रॅली चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात ‘मेरा रंग दे बसंती चोला’, ‘लडाई जारी है’ ह्या क्रांतिकारी गीतांची प्रस्तुती करण्यात आली. चंद्रशेखर आझाद ह्यांच्या जीवनाबद्दल, तसेच क्रांतिकारकांच्या ‘स्वातंत्र्याच्या स्वप्नांबद्दल’ चर्चा करण्यात आली. त्यांनतर रफिक नगर भागात एक रॅली काढून पत्रकांचे वितरण करण्यात आले.

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनानिमित्त फिल्म स्क्रिनिंग चे आयोजन करण्यात आले.

नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनानिमित्त फिल्म स्क्रिनिंग चे आयोजन करण्यात आले. त्याअंतर्गत गोवंडी भागातील रफिक नगर मध्ये ‘द लेजन्ड ऑफ भगतसिंग’ हा चित्रपट दाखवण्यात आला. लहान मुलांपासून ते महिला व पुरुषांकडून चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाद्वारे फक्त नावे माहीत असलेल्या क्रांतिकरकांबद्दल अधिक माहिती मिळाल्याची तसेच भगतसिंग, चन्द्रशेखर आझाद व त्यांच्या क्रांतिकारी सहकाऱ्यांच्या स्वप्नातले स्वातंत्र्य आजही आपल्याला मिळाले नसल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी नोंदवली.

आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021, बुधवार, रोजी नौजवान भारत सभा (नौभास) आणि पुण्यातील इतर अनेक परिवर्तनशील संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी मिळून बालगंधर्व चौक, पुणे येथे सायंकाळी 6 वाजता, दिशा रवी तसेच इतर पर्यावरणवादी, मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दमनाविरोधात निदर्शने केली.

आज दिनांक 17 फेब्रुवारी 2021, बुधवार, रोजी नौजवान भारत सभा (नौभास) आणि पुण्यातील इतर अनेक परिवर्तनशील संघटनांनी आणि सामान्य नागरिकांनी मिळून बालगंधर्व चौक, पुणे येथे सायंकाळी 6 वाजता, दिशा रवी तसेच इतर पर्यावरणवादी, मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या दमनाविरोधात निदर्शने केली. दिशा रवी या पर्यावरण कार्यकर्त्या आहेत. शेतकरी आंदोलनासंदर्भात एक अभियान चालवण्यासाठी त्यांनी एक ‘टूलकीट’ बनवली होती. ही टूलकीट इंटरनेटवर उपलब्ध आहे. या टूलकीट मध्ये हिंसाचाराबद्दल अवाक्षरही नाही. सोशल मिडीय़ा अभियान चालवण्यासाठी अशाप्रकारच्या टूलकीट बनवण्याची पद्धत अनेक संघटना अवलंबत असतात. भाजपच्या सोशल मिडीया सेलचे कामही असेच चालते. तरीही दिशा रवी यांच्यावर त्या देशविरोधी…

सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विरोधकांचे दमन बंद करा ! दिशा ए रवी आणि तमाम समाजसेवक, पत्रकार आणि विचारवंतांची तात्काळ सुटका करा !

आपणास ठाऊकच असेल की दिशा ए रवी नावाच्या पर्यावरण कार्यकर्तीला दिल्ली पोलिसांनी शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ टूलकिटचा प्रचार केल्याप्रकरणी अटक केली आहे आणि पाच दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर, शेतकरी चळवळीच्या पाठिंब्यावर दबाव आणण्यासाठी तयार केलेल्या ‘टूलकिट’च्या आधारे दिशा रवीवर देशद्रोहासारखे गंभीर आरोप लावले गेले आहेत. या प्रकरणात वकील निकिता जेकब आणि सामाजिक कार्यकर्ते शांतनु यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत पोलिसांना हेच सांगता आले नाही की या ‘टूलकिट’मध्ये हिंसाचारासाठी चिथावणी कोठेदिली गेली आहे. ‘टूलकिट’ प्रत्यक्षात मार्गदर्शक तत्त्वे आणि योजनांचा एक संच आहे. एखाद्या विशिष्ट प्रसंगी…

मुंबई मध्ये ‘नौभास’ वार्षिक आढावा बैठक संपन्न…

दि. 7/02/21 रोजी नौजवान भारत सभेच्या मुंबई युनिट ची वार्षिक आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीची सुरवात ‘मेरा रंग दे बसंती चोला’ ह्या गीताने करण्यात आली. साथी अविनाश यांनी नौजवान भारत सभेची ओळख व मुंबईतील मागील वर्षभराच्या कामाची माहिती दिली. डॉ. पूजा यांनी देशभरातील नौभास च्या कामांचा आढावा मांडला. नौजवान भारत सभेच्या सर्व सदस्यांनी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या सर्व क्रांतिकारकांच्या विचारांवर काम करत जनतेच्या सर्व न्यायपूर्ण संघर्षांत त्यांच्यासोबत राहण्याची शपथ घेतली. त्यांनतर पुढील वर्षभरासाठी डॉ.पूजा, प्रज्ञा व अविनाश यांची कार्यकारिणी म्हणून निवड करण्यात आली. शशीप्रकाश यांची ‘अगर तुम युवा…