*नौजवान भारत सभा(नौभास) आणि आंबिलओढा नागरिक संघर्ष समिती तर्फे आयोजित* *दांडेकर पूल परिसर झोपडपट्टीवासीयांचे आवासाच्या अधिकाराकरिता “एकता आंदोलन”*

___________________ 133 दांडेकर पूल येथील झोपडपट्टी पाडण्याच्या कारवाईनंतर सचेतन झालेल्या विविध झोपडपट्ट्यांमधील नागरिकांनी, आज एकता दर्शवत आणि घरांच्या, विस्थापनाच्या, एस.आर.ए.च्या संदर्भात चालू असलेल्या अन्यायाला, लपवालपवीला, दडपशाहीला समोर आणत दांडेकर पूल चौक येथे आज आज 11 ऑगस्ट रोजी, सकाळी 10:30 वाजता आंदोलन केले. यावेळी 133 दांडेकर पूल, 52 चाळ, 214 दांडेकर पूल, पानमळा वसाहत, शाहू वसाहत, हनुमान नगर या वसाहतींमधील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नौजवान भारत सभेचे निखिल एकडे यांनी सूत्रसंचालन केले. नौजवान भारत सभेतर्फे समन्वयक रवी पुर्णे, 133 दांडेकर पूल येथील हनुमंत फडके, पानमळा येथील किशोर…

आंबिल ओढा नागरिक संघर्ष समिती आणि नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी आज दांडेकर पूल भागातील पानमळा, बावन्न चाळ आणि रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये एस. आर. ए‌. च्या प्रश्नाबद्दल कामगार कष्टकरी जनतेमध्ये भाषण देत आणि पत्रकं वाटत अभियान राबविले

आंबिल ओढा नागरिक संघर्ष समिती आणि नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी आज दांडेकर पूल भागातील पानमळा, बावन्न चाळ आणि रमाबाई आंबेडकर वसाहतीमध्ये एस. आर. ए‌. च्या प्रश्नाबद्दल कामगार कष्टकरी जनतेमध्ये भाषण देत आणि पत्रकं वाटत अभियान राबविले. बुधवारी, ११ तारखेला सकाळी १० वाजता आयोजित घराच्या हक्कासाठी दांडेकर पूल परिसरातील नागरिकांच्या एकता प्रदर्शन आंदोलनात परिसरातील कामगार कष्टकरी बंधूंनी आणि भगिनींनी सामिल व्हावं म्हणून देखील प्रचार केला गेला त्याच बरोबर जागोजागी पोस्टर लावण्यात आले. या अभियानांत आंबिल ओढा वस्ती मधील नागरिक देखील सक्रिय सहभागी झाले होते. समिती व नौभास आपल्या कामगार कष्टकरी सहकाऱ्यांना…

9 ऑगस्ट रोजी काकोरी ऍक्शन प्लॅन दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बिबवेवाडीच्या सुप्पर येथील दुर्गामाता गार्डन येथे नौजवान भारत सभेकडून चर्चासत्र आयोजित करण्यात आले

काल, 9 ऑगस्ट रोजी काकोरी ऍक्शन प्लॅन दिन व ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने बिबवेवाडीच्या सुप्पर येथील दुर्गामाता गार्डन येथे नौजवान भारत सभेकडून चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. काकोरी ऍक्शन प्लॅन व हिंदुस्तान रिपब्लिकन आर्मीच्या क्रांतिकारी वारश्यावर चर्चा झाली. शहीद क्रांतिकारकांचे शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट आजही पूर्ण झालेले नाही, व आज देखील तरुणांना ह्याच उद्दिष्टाने संघटित होण्याची गरज आहे. तसेच आजच्या सर्वांगीण कोंडीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ऑगस्ट क्रांती सारख्या कामगार-कष्टकऱ्यांच्या जनऊठावातून प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा कामगार-कष्टकऱ्यांना एकजूट करावे लागेल असे नौजवान भारत सभेचे साथी सुस्मित ह्यांनी मांडले. ह्यानंतर साथी निमिष…

रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी नौजवान भारत सभेने शहीद भगतसिंह वाचनालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली

रविवार दि. 1 ऑगस्ट रोजी नौजवान भारत सभेने शहीद भगतसिंह वाचनालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली. अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर साथी सूरज यांनी अण्णाभाऊंच्या कार्याचा आढावा घेत चळवळीतील त्यांच्या साहित्याचे महत्व सांगितले. तसेच त्यांच्या जीवन कार्याची समीक्षा करत योग्य कार्यदिशा काय असली पाहिजे यावर चर्चा घडवून आणली.

चर्चासत्राचे आयोजन

अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार, तालिबानची वाढती पकड आणि साम्राज्यवादी स्पर्धेत अफगाणी जनतेची दुरावस्था… दि.25/7/ 2021 रोजी नौभास (मुंबई) च्या वतीने वरील विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तालिबान या धार्मिक कट्टरवादी संघटनेची अफगाणिस्तान वरील वाढती पकड त्या अगोदर अमेरिकेची माघार ही घटना जागतिक राजकारणावरील प्रभाव टाकणारी आहे. अफगाणिस्तानला गेल्या कित्येक वर्षांपासून साम्राज्यवादी हस्तक्षेप आणि अंतर्गत यादवी युद्धाने पोखरून टाकले आहे. अशात अफगाणी जनतेला नाममात्र लोकशाहीने जे थोडेफार अधिकार मिळाले होते ते सुद्धा अतिशय निर्घृणपणे चिरडण्यास साम्राज्यवादाने आणि धार्मिक कट्टरवादी संघटांनी धुमाकूळ घातला आहे. या सर्व घटनेला समजून साम्राज्यवादी आणि धार्मिक कट्टरवादी…

अफगाणिस्तानातून अमेरिकेची माघार, तालिबानची वाढती पकड आणि साम्राज्यवादी स्पर्धेत अफगाणी जनतेची दुरावस्था चर्चासत्राचे आयोजन

दि.25/7/ 2021 रोजी नौभास (मुंबई) च्या वतीने वरील विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. तालिबान या धार्मिक कट्टरवादी संघटनेची अफगाणिस्तान वरील वाढती पकड त्या अगोदर अमेरिकेची माघार ही घटना जागतिक राजकारणावरील प्रभाव टाकणारी आहे. अफगाणिस्तानला गेल्या कित्येक वर्षांपासून साम्राज्यवादी हस्तक्षेप आणि अंतर्गत यादवी युद्धाने पोखरून टाकले आहे. अशात अफगाणी जनतेला नाममात्र लोकशाहीने जे थोडेफार अधिकार मिळाले होते ते सुद्धा अतिशय निर्घृणपणे चिरडण्यास साम्राज्यवादाने आणि धार्मिक कट्टरवादी संघटांनी धुमाकूळ घातला आहे. या सर्व घटनेला समजून साम्राज्यवादी आणि धार्मिक कट्टरवादी तालिबानने गेल्या कित्येक वर्षांपासून अफगाणिस्तानला युद्धाने मैदान बनवले आहे. यात जनतेचे अधिकार…

24 जून रोजी महानगरपालिका, राज्यसरकार आणि पोलीस प्रशासन यांनी मिळून आंबीलओढा वसाहतीतील जनतेवर अमानुष कारवाई केली

24 जून रोजी महानगरपालिका, राज्यसरकार आणि पोलीस प्रशासन यांनी मिळून आंबीलओढा वसाहतीतील जनतेवर अमानुष कारवाई केली. त्या दिवसानंतर नौजवान भारत सभा सर्व कामगार-कष्टकऱ्यांना घराच्या हक्कासाठी एकजूट बनवण्याचे आवाहन करत आहे. एस.आर.ए. चा कायदा शहरातील सर्व मध्यवर्ती भागांमध्ये लागू करून आडव्या झोपडपट्ट्या उभ्या करून मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे धोरण आता राज्य सरकार वेगाने पुढे रेटत आहे. आज ही आग बाजूच्या वस्तीमध्ये लागली असली तरी त्याचा वणवा अपल्यापर्यंतही पोहोचणार आहे आणि त्यासाठी वस्तीपातळीवर समित्या बनवून एकजूट करण्याचे आवाहन नौभासचे कार्यकर्ते दांडेकर पूल भागातील वस्त्यांमध्ये जाऊन करत आहेत. या अभियानामध्ये आंबीलओढ्यातील जनता…

आंबिलओढ्यातली घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे !

__________________ ✊ आंबिलओढ्यातली घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे ! ✊ विना भेदभाव, प्रत्येकाला घरकुल मिळालेच पाहिजे! ✊ आवासाचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार! नौजवान भारत सभा, पुणे द्वारे प्रसारित कष्टकरी कामगार बंधु आणि भगिनींनो, दिनांक 24 जून रोजी 133 आंबिलओढा वसाहतीवर पोलिसी बळाचा वापर करत बुलडोझर चालवला गेला. या कारवाईने सर्व कामगार-कष्ट्कऱ्यांनी समजणे आवश्यक आहे की काल ते जात्यात होते, तर बाकीचे सुपात आहेत! तेव्हा आपल्यावर परिस्थिती येण्याअगोदर वेळीच सावध होणे, आणि योग्यरित्या संघटीत होणे आवश्यक आहे! भल्या पहाटे मनपा प्रशासन बुलडोझर घेऊन पोलिसांच्या ताफ्यासोबत वस्तीमध्ये दाखल झाले कारवाई सुरू…

आंबिलओढ्यातली घरे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे! विना भेदभाव, प्रत्येकाला घरकुल मिळालेच पाहिजे! आवासाचा अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार!

नौजवान भारत सभा, पुणे द्वारे प्रसारित कष्टकरी कामगार बंधु आणि भगिनींनो, दिनांक 24 जून रोजी 133 आंबिलओढा वसाहतीवर पोलिसी बळाचा वापर करत बुलडोझर चालवला गेला. या कारवाईने सर्व कामगार-कष्ट्कऱ्यांनी समजणे आवश्यक आहे की काल ते जात्यात होते, तर बाकीचे सुपात आहेत! तेव्हा आपल्यावर परिस्थिती येण्याअगोदर वेळीच सावध होणे, आणि योग्यरित्या संघटीत होणे आवश्यक आहे! भल्या पहाटे मनपा प्रशासन बुलडोझर घेऊन पोलिसांच्या ताफ्यासोबत वस्तीमध्ये दाखल झाले कारवाई सुरू झाली. घरं तोडण्याबद्दल मनपाच्या आदेशाची मागणी केली असता कुठलाही लेखी आदेश दाखवण्यात आला नाही. मनपा प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांना मुबंई उच्च न्यायालयाच्या कोरोना…