‘औरंगजेब’ च्या नकली मुद्द्यावरून हिंदू-मुस्लीम द्वेष भडकवून जनतेला दंगलखोर गर्दी बनवण्याच्या संघी प्रयत्नांना हाणून पाडा!

‘औरंगजेब’ च्या नकली मुद्द्यावरून हिंदू-मुस्लीम द्वेष भडकवून जनतेला दंगलखोर गर्दी बनवण्याच्या संघी प्रयत्नांना हाणून पाडा! जाती-धर्माचे झगडे सोडा, खऱ्या लढाईशी नाते जोडा! – नौजवान भारत सभा मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) परिवारातील ‘बजरंग दल’, ‘विश्व हिंदू परिषद’ आणि ‘पतित पावन संघटना’ या फॅशिस्ट संघटनांनी मुघल सम्राट औरंगजेब याची खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर येथील कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये आंदोलन केले. नागपूर येथे झालेल्या आंदोलनात “मुस्लीम समाजाला पवित्र अशी चादर जाळली” या अफवेनंतर तिथे दंगल भडकली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “छावा” चित्रपटाच्या यशाच्या लाटेवर स्वार होऊन पुन्हा एकदा…

नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे सुरू असलेल्या शहीद स्मृती संकल्प अभियानांतर्गत साठे नगर मधील खाडी आणि डब्बा कंपनी भागात रॅली काढून तसेच पत्रके वाटून क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यात आला.

नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे सुरू असलेल्या शहीद स्मृती संकल्प अभियानांतर्गत साठे नगर मधील खाडी आणि डब्बा कंपनी भागात रॅली काढून तसेच पत्रके वाटून क्रांतिकारकांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात खाडी भागातून केली गेली आणि समापन डब्बा कंपनी येथील वस्त्यांमध्ये करण्यात आले. ह्या त्याच वस्त्या आहेत जिथे नौभास अनेक वर्षांपासून स्थानिक तसेच राजकीय मुद्द्यांवर इथे राहणाऱ्या कष्टकरी जनतेसोबत मिळून संघर्षात सामील आहेत. विविध अभियानांमार्फत, क्रांतिकारी सुधारकार्याद्वारे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेले आहेत. कट्टर, फॅशिस्ट, संधीसाधू शक्तींद्वारे क्रांतिकारकांच्या वारश्यावर धूळ आणि राख पसरवण्याच्या प्रयत्नांविरोधात भाषण आणि घोषणा देत एकदा…

शहीद स्मृती संकल्प अभियान अंतर्गत वस्तीतील तरुणांसोबत बैठक

🟥शहीद स्मृती संकल्प अभियान अंतर्गत वस्तीतील तरुणांसोबत बैठक🟥 19 मार्च रोजी संध्याकाळी नौजवान भारत सभेतर्फे पुणे शहरात वस्तीतील तरुणांसोबत बैठक झाली. ह्या बैठकीमध्ये शहीद भगतसिंहांचे विचार आणि आजच्या संदर्भात त्याची प्रासंगिकता यावर चर्चा झाली. त्यामध्ये सुरुवातीला साथी सुस्मित यांनी भगतसिहांच्या राजकीय कार्यावर प्रकाश टाकत त्याची आजच्या काळात प्रासंगिकता काय आहे आणि त्यासोबत नौजवान भारत सभेची भूमिका काय आहे हे मांडले. यानंतर बैठकीला उपस्थित सर्वांनी सध्याच्या कष्टकरी जनतेच्या परिस्थितीवर भाष्य केले.संतोष यांनी आपले कामाचे अनुभव आणि मालक व ठेकेदारांसोबत चालणारा संघर्ष यांची उदाहरणे दिली, त्यामधून कामगारांचे बांधकाम क्षेत्रात शोषण कसे होते…

शहीद भगतसिंह, सुखदेव और राजगुरु की शहादत दिवस (23 मार्च) के अवसर पर मुम्बई में नौजवान भारत सभा की तरफ़ से ‘शहीद स्मृति संकल्प अभियान’ चलाया जा रहा है।

शहीद भगतसिंह, सुखदेव और राजगुरु की शहादत दिवस (23 मार्च) के अवसर पर मुम्बई में नौजवान भारत सभा की तरफ़ से ‘शहीद स्मृति संकल्प अभियान’ चलाया जा रहा है। मानखुर्द-गोवंडी, मुम्बई की मज़दूर बस्तियों व अन्य इलाकों में पुस्तक प्रदर्शनी, फिल्म स्क्रीनिंग, प्रचार अभियान आदि के माध्यम से नौजवानों और आम मेहनतकश आबादी के बीच क्रान्तिकारियों की विरासत को लेकर जाने का काम किया जा रहा है। कल मानखुर्द के लाल्लूभाई कंपाउंड के पास पुस्तक प्रदर्शनी आयोजित की गई। इसमें युवाओं ने क्रान्तिकारियों की किताबों के बारे में जानने की…

नौजवान भारत सभे तर्फे अप्पर, बिबवेवाडी, पुणे भागातील तरुण कामगारांसोबत चर्चेचे आयोजन

नौजवान भारत सभेकडून 23 मार्च शहीद दिनानिमित्त सदस्यता अभियान राबवले जात आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी 16 मार्च रोजी तरुण कामगारांसोबत चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरू सारख्या क्रांतिकारकांनी केलेली देशाच्या स्वातंत्र्याची व्याख्या मांडली गेली. फक्त ब्रिटिशांना या देशातून घालवणे एवढेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट नव्हते तर एक असा समातमूलक समाज निर्माण करणे, जिथे कुठल्याही प्रकारचे शोषण नसेल, जिथे स्त्री-पुरुष भेद नसतील, जिथे जातीय-धार्मिक भेद नसतील, हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते. या देशात कामगार-कष्टकऱ्यांचे राज्य आले पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. भारताला स्वातंत्र्य मिळून 77 वर्षे…

♦️नौजवान भारत सभा, पुणे तर्फे राबवल्या जाणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानातून जनतेला क्रांतिकारकांच्या विचारांची ओळख♦️

♦️नौजवान भारत सभा, पुणे तर्फे राबवल्या जाणाऱ्या शहीद स्मृती संकल्प अभियानातून जनतेला क्रांतिकारकांच्या विचारांची ओळख♦️ 23 मार्च, शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरू यांचे क्रांतिकारी विचार, त्यांची प्रासंगिकता, त्यांच्या स्वप्नातील भारत व आजचा भारत यात असलेलं जमीन-आसमानाचं अंतर आणि ते भरून काढण्याची दिशा, ह्याचा विद्यार्थी-तरुणांत आणि कष्टकरी जनतेत प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने नौजवान भारत सभा तर्फे पुणे शहराच्या विविध भागांत विभिन्न स्वरूपांची अभियाने राबवली जात आहेत. पोस्टर प्रदर्शने, भेटीगाठी, बैठका अशा अनेकविध अभियानांतून भेटलेल्या तरुणांनी बेरोजगारी, ढासळलेली शिक्षण व्यवस्था, महागाई, असुरक्षा अशा अनेक नैराश्यमयी गोष्टी आणि हे देणाऱ्या भांडवली व्यवस्थेविरुद्ध…

नौजवान भारत सभे तर्फे सुप्पर, बिबवेवाडी, पुणे येथे सुरू असलेला शहीद आझाद स्पोर्ट्स क्लब निरंतर सुरू

नौजवान भारत सभे तर्फे सुप्पर, बिबवेवाडी, पुणे येथे सुरू असलेला शहीद आझाद स्पोर्ट्स क्लब निरंतर सुरू गेल्या महिनाभर सुरू असलेल्या आझाद स्पोर्ट क्लब मध्ये आतापर्यंत बॅडमिंटन आणि फुटबॉल शिकवले गेले होते. त्यामुळे या आठवड्यात जेव्हा क्रिकेट खेळणार असे सांगितल्यावर मुलांमध्ये खूप उत्सुकता होती. ह्या आठवड्यात मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात आले. बॉलिंग, बॅटिंग आणि क्रिकेट खेळाचे नियम शिकवण्यात आले. ह्या नंतर दोन संघांमध्ये विभागून एक क्रिकेटचा सामना खेळला गेला. सामना अतिशय रंगतदार झाला आणि मुलांना खेळायला मजा आली. तरीही मुलांनी दुसऱ्या दिवशी फुटबॉल खेळला जावा असा आग्रह धरला. आपल्या देशात क्रिकेट…

♦️16 मार्च को रविवार के दिन नौजवान भारत सभा,मुम्बई की मासिक इकाई बैठक सम्पन्न हुई, और शाम में ‘इंकलाब’ डॉक्यूमेंट्री की स्क्रीनिंग की गयी।♦️

नौजवान भारत सभा, मुम्बई द्वारा मासिक इकाई बैठक में अबतक के कामों की समीक्षा की गयी और 23 मार्च को क्रान्तिकारियों के शहादत दिवस पर ‘शहीद स्मृति संकल्प अभियान’ के तहत विभिन्न कार्यक्रमों की योजना बनायी गयी। शाम में क्रान्तिकारियों के जीवन संघर्ष और कुर्बानियों को जानने-समझने के लिए गौहर रज़ा द्वारा निर्देशित डॉक्यूमेंट्री ‘इंकलाब’ दिखायी गयी। डॉक्यूमेंट्री पर चर्चा के दौरान अलग-अलग साथियों ने अपने विचार रखे। शशांक ने डाक्यूमेंट्री के बारे में रखते हुए कहा कि 23 मार्च,1931 को अंग्रेज सरकार द्वारा भगतसिंह, राजगुरु और सुखदेव को फाँसी…

♦️नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित ‘शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रात’ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले.♦️

मित्र-मैत्रिणींनो, नौजवान भारत सभा, मुंबई द्वारे संचालित शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्रामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे अभ्यास वर्ग सुरू आहेत. आगामी बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहेत. यात हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, मराठी इत्यादी विषयांसाठी अतिरिक्त शिकवणी वर्गांचा समावेश आहे. यामध्ये शंका निरसन सत्र, सराव परीक्षा घेणे आणि इतर महत्त्वाचे विषय पुन्हा शिकवले जात आहेत. आम्ही मानतो की सर्वांना निःशुल्क, समान आणि दर्जेदार शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे; परंतु सरकार शिक्षणक्षेत्रातील आपल्या जबाबदारी फेटाळून देत आहे. आजच्या नफेखोर भांडवली व्यवस्थेमध्ये शिक्षणाला…

गेल्या चार आठवड्यापासून सुप्पर, बिबवेवाडी, पुणे येथे सुरू असलेल्या शहीद आझाद स्पोर्ट्स क्लबमध्ये शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतिदिनानिमित्त ( 27 फेब्रुवारी) मुलांना शहीद आझाद यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबद्दल माहिती देण्यात आली.

  चंद्रशेखर आझाद! भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या क्रांतिकारी आंदोलनातील असे नाव जे आजही अतिशय आदराने घेतले जाते, जे अजूनही कोणी विसरले नाही आणि विसरणे ही शक्य नाही! असे नाव ज्याने शोषणाविरुद्ध लढणाऱ्या आणि समतामुलक, न्याय्य समाजाचे स्वप्न बघणाऱ्या कित्येकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे, आणि आजही करत आहे. चंद्रशेखर आझाद खऱ्या अर्थाने भारताच्या क्रांतिकारी आंदोलनातील असा एक चकाकता तारा आहे, ज्याचा प्रकाश आजच्या घोर निराशेच्या काळात सुद्धा साम्राज्यवादी-भांडवली शोषणाविरुद्ध, हर प्रकारच्या असमानतेविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशेचा किरण देण्याचे काम करत आहे. चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कमालीची गरिबी, अशिक्षितता, धार्मिक कट्टरतेच्या वातावरणात झाला.…