काही वर्षांपासून मशीदीच्या खाली मंदिरे “सापडण्याच्या” घटनांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. या घटनांचा धार्मिक आस्थेशी काहीही संबंध नाही. त्यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे जनतेला दंगलींच्या आगीमध्ये ढकलणे! भाजपा आणि संघ परिवाराचा एकंदरीत हिंदू लोकसंख्येच्या हिताशी काहीही संबंध नाही. त्यांचं एकच काम आहे आणि ते म्हणजे बहुसंख्यक गरीब हिंदू लोकांचे लक्ष त्यांच्या बिकट जीवनापासून हटवून, अल्पसंख्यक मुस्लिम समुदायाला त्यांचा शत्रू म्हणून दाखवणे! धर्माच्या नावावर लढणारी जनता आपलं जीवन नरक बनवणाऱ्या या भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध लढू शकत नाही. जनतेला एकमेकांशी लढवून भांडवलदारांची सेवा करणं हा भाजपच्या फॅशिस्ट राजकारणाचा सार आहे. फॅशिस्टांना त्यांच्या…
नौजवान भारत सभेतर्फे स्त्री मुक्तीचे पक्षधर आणि जाती-अंताचे योद्धे, ज्योतिराव फुलेंच्या स्मृतीदिनी क्रांतिकारी अभिवादन!
तब्बल 175 वर्षांपूर्वी मुलींची पहिली शाळा उघडण्याचा निर्णय ज्योतिराव फुलेंनी घेतला होता. विधवा विवाहाला समर्थन, विधवांचे केशोपन थांबविण्यासाठी न्हाव्यांचा संप, बाल विवाहाला विरोध, मुलांचे संगोपन, मुलींना शिक्षण अशा एक ना अनेक गोष्टींतून ज्योतिराव-सावित्रीबाईंचा स्त्री समतेचा, स्त्री स्वातंत्र्याचा दृष्टीकोन समोर येतो. स्त्री मुक्ती व जाती उच्चाटनाच्या ह्या दोन्ही ही संघर्षांमध्ये फुले दांपत्यानी महत्वाचे योगदान दिलेले आहे. सामाजिक परिवर्तनासाठी जोतीराव फुले कधीही सरकारकडे जोडे झिजवत बसले नाहीत. उपलब्ध साधनांसहीत त्यांनी आपल्या संघर्षास सुरुवात केली. सामाजिक प्रश्नांबाबतही फुले शेटजी आणि भटजी या दोघांना शत्रू म्हणून चिन्हीत करतात. आयुष्याच्या उत्तरार्धात ते ब्रिटीश शासनाच्या आणि…
स्वातंत्र्यलढ्यातील शूर योद्ध्या आणि क्रांतिकारी पक्ष ‘हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ च्या नेत्या दुर्गावती वोहरा यांना इंकलाबी सलाम
साँडर्स हत्या प्रकरणानंतर भगतसिंहाला पोलिस आणि गुप्तचरांच्या जाळ्यातून बाहेर काढण्यात दुर्गा भाभींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारताच्या क्रांतिकारी चळवळीच्या खंबीर समर्थक दुर्गा भाभी या भगवती चरण वोहरा यांच्या साथीदार होत्या. भगवती चरण वोहरा बॉम्बस्फोटात शहीद झाल्यानंतरही त्या क्रांतिकारी कार्यात सक्रिय सहभागी राहिल्या. दुर्गा भाभी यांनी सार्वजनिक संघर्षात अनेक वेळेस अत्याचार सहन केले आणि अनेक वेळेस तुरुंगावास ही भोगला पण त्या कधीच मागे सरल्या नाहीत! शहीदांचे जे स्वप्न अपुरे, याच शतकात होतील पुरे! याच शतकात नव्या वेगाने परिवर्तनाची लहर उठेल!! – नौजवान भारत सभा
शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानांतर्गत “काफिला-ए-इंकलाब” चे आयोजन!
शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या 117 व्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभेकडून देशभरात शहीद स्मृती संकल्प अभियान चालविण्यात आले होते. मुंबईत या अभियानाची सांगता काल “काफिला-ए-इंकलाब” रॅलीने झाली. मागील 10 दिवसांत शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियाना अंतर्गत भगतसिंह आणि त्यांच्या साथीदारांचे समाज परिवर्तनाचे विचार आजच्या विद्यार्थी-तरूण पिढीत रुजवण्याच्या हेतूने मानखुर्द-गोवंडी मधील शाळा महाविद्यालयांत विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आले. ज्यात शहीद-ए-आझम भगतसिंह यांच्या जीवनावर आधारित इंकलाब नावाचा माहितीपट, गाणी, नाटक सादरीकरण, पुस्तक प्रदर्शने लावण्यात आलीत. अभियानाच्या शेवटच्या दिवशी “काफिला-ए-इंकलाब” रॅली चे आयोजन करण्यात आले. रॅली मानखुर्दच्या कामगार वस्तीमधून काढण्यात आली. यादरम्यान “राजा का बाजा”…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “इंकलाब” माहितीपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!
“शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” अंतर्गत नौजवान भारत सभेतर्फे (नौभास) मानखुर्द-गोवंडी, मुंबई येथील महाविद्यालयात दिनांक 30 सप्टेंबर रोजी गौहर रझा दिग्दर्शित ‘इंकलाब’ माहितीपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. ह्या माहितीपटात भगतसिंह आणि त्यांच्या साथींचा क्रांतिकारी जीवनप्रवास आणि भारतीय स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान अस्तित्वात असलेले विविध वैचारिक पैलू दाखवण्यात आले आहे. स्क्रिनिंगनंतर विद्यार्थ्यांसोबत भगतसिंहांच्या विचारांबद्दल आणि त्यांच्या स्वप्नांचा समाज निर्माण करण्यासाठी आज आपण काय करू शकतो, ह्या विषयांवर चर्चा करण्यात आली. शेवटी नौभासच्या सांस्कृतिक पथकाने “मेरा रंग दे बसंती चोला” गीत प्रस्तुत केले आणि क्रांतिकारी साहित्याचा बुकस्टॉल सुद्धा लावण्यात आला. विद्यार्थ्यांचा ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.…
नौजवान भारत सभा, मुंबईने “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये आयोजित केले
शहीद भगतसिंह यांच्या 117 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने, नौजवान भारत सभा (मुंबई) “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” मुंबईतील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये आयोजित केले जात आहे. शहीद भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संदेश घेऊन, नौजवान भारत सभा, मुंबईने मानखुर्द मधील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गौहर रझा यांचा “इंकलाब” हा माहितीपट दाखवला. या माहितीपटात आपल्या क्रांतिकारकांचा क्रांतिकारी प्रवास आणि ब्रिटिश साम्राज्यवादाने त्रस्त असलेल्या भारतात समाजवाद निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न दाखव ले आहे. माहितीपटानंतर विद्यार्थ्यांशी देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा करण्यात आली, देशातील आजची ही परिस्थिती आपल्या क्रांतिकारकांनी जो समाज घडवण्यासाठी जीवन…
“धर्मवादाचे राजकारण आणि भगतसिंहांचा संदेश” ह्या विषयावर चर्चासत्र
शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियानांतर्गत 28 सप्टेंबर च्या पूर्वसंध्येला “धर्मवादाचे राजकारण आणि भगतसिंहांचा संदेश” ह्या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यामध्ये मुख्य मांडणी नौजवान भारत सभेचे साथी रवि, सुस्मित आणि राहुल ह्यांनी केली. सुरुवातीला साथी रवी यांनी 2014 पासून देशभरामध्ये धार्मिक द्वेषाच्या घटनांमध्ये झालेल्या वाढी बद्दल तथ्यात्मक मांडणी केली. परंतु फक्त फॅशिस्ट आरएसएस भाजप सरकारच्या काळातच नाही तर त्याच्या आधी सुद्धा काँग्रेस, शिवसेना, सपा, इत्यादींच्या काळातही संघ परिवारास मदत होतील असे दंगे भडकविण्यात आले. ह्या देशाचा भांडवलदार वर्ग आणि धर्मवादी शक्तींनी सत्ता…
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : पुणे, 28 सप्टेंबर 2024
मित्र-मैत्रिणींनो, शहीद भगतसिंह यांच्या 117व्या जन्मदिवस प्रीत्यर्थ नौजवान भारत सभा ( ) द्वारे पुण्यातील विविध भागांतील कामगार कष्टकऱ्यांच्या वस्त्यांमध्ये, शाळा महविद्यालयांमध्ये, सामाजिक ठिकाणी “शहीद भगतसिंह स्मृती संकल्प अभियान” आयोजित केल्या गेले आहे. त्याच अंतर्गत आज 28 सप्टेंबर रोजी नौजवान भारत सभेच्या कार्यकर्त्यांनी दापोडी, पुणे येथील शहीद भगतसिंहांच्या पुतळ्यास प्रभातसमयी भेट दिली आणि माल्यार्पण करून त्यांना क्रांतिकारी अभिवादन केले. सुरुवातीला नौजवान भारत सभेच्या साथी सुप्रीत यांनी भगतसिंहांच्या स्वप्नातील भारताविषयी वक्तव्य केले. त्यांनी ज्या समतामुलक समाजाची स्वप्ने बघितली त्याविषयी देखील मांडणी करण्यात आली. तद्नंतर साथी सुप्रीत यांनी वर्तमानात देशभरातील विविध समस्यांबद्दल बोलत…
शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान : अहमदनगर, 28 सप्टेंबर 2024
शहीद–ए–आजम भगत सिंह यांच्या 117 व्या जन्मदिवसानिमित्त देशभरामध्ये 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान आठवडाभर “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” चालविण्यात आले. या अभियाना दरम्यान देशभरातील वेगवेगळ्या शहरात विद्यार्थी आणि युवकांस हित तसेच समाजातील वेगवेगळ्या स्तरावर सांस्कृतिक, प्रबोधनपर अनेक कार्यक्रम करण्यात आले. ज्यात गाणे, नाटक, पुस्तक प्रदर्शने लावण्यात आली. अहमदनगर शहरात “शहीद भगतसिंह स्मृति संकल्प अभियान” मोठ्या उत्साहात पार पडला. शेवटच्या दिवशी शहरातील सिद्धार्थनगर भागातील कामगार वस्तीमध्ये “देशाला पुढे घेऊन जा!” हे नाटक सादर करण्यात आले तसेच सभा, क्रांतिकारी गीत, पत्रके वाटण्यात आली. शहीद–ए–आजम भगतसिंह…
