पुण्यातील अप्पर बिबवेवाडी भागात शहीद भगतसिंग वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून शिक्षण सहायता केंद्र चालवले जाते. यामध्ये नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवला जातो. शिक्षण सहायता केंद्रामध्ये शिकणारी मुले-मुली ही कामगार कष्टकरी वर्गातून येणारी आहेत. शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाल्यामुळे कामगार कष्टकरी वर्गातून आलेल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही. घरातील परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खाजगी शाळेत पैसे भरून शिक्षण घेणे अवघड आहे व सरकारी शाळांची परिस्थिती अतिशय बिकट असून कोरोना महामारीमुळे जवळपास 2-3 वर्ष शाळा बंद असल्यामूळे कामगार कष्टकरी वर्गातून येणाऱ्या विद्यार्थांचे प्रचंड नुकसान झाले.अशा परिस्थितीत शिक्षण आणि रोजगाराच्या हक्काचा…
Category: Activities
आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली
आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला साथी रवि यांनी चंद्रशेखर आझादांचे कार्य, क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा, संघटनेची गरज यावर मांडणी केली. त्यानंतर साथी जय यांनी आजच्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारक विचारांची प्रासंगिकता यावर भाष्य केले. त्यानंतर निघालेल्या पदयात्रेमध्ये नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते, न्यायप्रिय जनता आणि शिक्षण सहाय्यता केंद्रातील मुले सहभागी झाली. घोषणा देत, भाषण करत, पत्रक वाटत पदयात्रा पार पडली. कार्यक्रमात नौभासाच्या सांस्कृतिक टीमने काही क्रांतिकारी गाणी सुद्धा सादर केली. जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता…
शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली.
आज शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त (23 जुलै) नौजवान भारत सभेतर्फे पुण्यातील दांडेकर पूल भागात अभिवादन कार्यक्रम करून पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला साथी रवि यांनी चंद्रशेखर आझादांचे कार्य, क्रांतिकारकांचा वैचारिक वारसा, संघटनेची गरज यावर मांडणी केली. त्यानंतर साथी जय यांनी आजच्या परिस्थितीमध्ये क्रांतिकारक विचारांची प्रासंगिकता यावर भाष्य केले. त्यानंतर निघालेल्या पदयात्रेमध्ये नौजवान भारत सभेचे कार्यकर्ते, न्यायप्रिय जनता आणि शिक्षण सहाय्यता केंद्रातील मुले सहभागी झाली. घोषणा देत, भाषण करत, पत्रक वाटत पदयात्रा पार पडली. कार्यक्रमात नौभासाच्या सांस्कृतिक टीमने काही क्रांतिकारी गाणी सुद्धा सादर केली. जीवनाच्या संघर्षात आणि रोजीरोटीच्या शोधात वणवण करता…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे नेहरू तारांगण येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागातील मुला – मुलींसाठी गेल्या काही काळापासून शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येत आहे, ज्यात आठवी ते बारावी व त्यापुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विषय शिकवले जातात. आपल्या सूर्यमालेतील ग्रह, त्यांची निर्मिती, पृथ्वी ची निर्मिती, आकाशातील विविध घटनांचा अभ्यास व त्यांची माहिती मुलांना व्हावी म्हणून वरळी, मुंबई येथील नेहरू तारांगण येथे सहलीचे आयोजन नौजवान भारत सभेतर्फे करण्यात आले. कामगार – कष्टकरी वस्त्यांमध्ये दोन वेळेची पोटाची खळगी भरण्यासाठी सगळे कुटुंब काही ना काही काम सतत करत असते. बहुतांश वेळी घरातील…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे नेहरू तारांगण येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन.
नौजवान भारत सभे तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागातील मुला – मुलींसाठी गेल्या काही काळापासून शहीद राजगुरू शिक्षण सहायता केंद्र चालवण्यात येत आहे, ज्यात आठवी ते बारावी व त्यापुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कला, विज्ञान, वाणिज्य शाखेतील विषय शिकवले जातात. आपल्या सूर्यमालेतील ग्रह, त्यांची निर्मिती, पृथ्वी ची निर्मिती, आकाशातील विविध घटनांचा अभ्यास व त्यांची माहिती मुलांना व्हावी म्हणून वरळी, मुंबई येथील नेहरू तारांगण येथे सहलीचे आयोजन नौजवान भारत सभेतर्फे करण्यात आले. कामगार – कष्टकरी वस्त्यांमध्ये दोन वेळेची पोटाची खळगी भरण्यासाठी सगळे कुटुंब काही ना काही काम सतत करत असते. बहुतांश वेळी घरातील…
दांडेकर पूल भागातील शहीद भगतसिंह वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून स्थानिक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर वर्ग घेण्यात येत आहेत
महिनाभराहून अधिक कालावधीपासून दांडेकर पूल भागातील शहीद भगतसिंह वाचनालयामध्ये नौजवान भारत सभेकडून स्थानिक विद्यार्थ्यांचे कॉम्प्युटर वर्ग घेण्यात येत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरबद्दल मूलभूत माहिती देण्याबरोबरच कॉम्प्युटर हाताळण्याबद्दल आणि टायपिंग तसेच संबंधित इतर कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. सर्व क्षेत्रांमध्ये कॉम्प्युटर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन होत असले तरीही बहुतांश शाळांमध्ये त्याच्या शिक्षणाबद्दल अजूनही तेवढी जागरूकता दिसून येत नाही आणि त्यातल्या त्यात आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या निम्न वर्गांतून आलेले विद्यार्थी ज्या शाळांमध्ये जातात, तिथे त्या प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध नसण्याची जवळपास शाश्वतीच असते. बाजारात उपलब्ध असलेले कॉम्प्युटर कोर्सेस सामान्य कामगार-कष्टकरी पार्श्वभूमीतून…
नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चालू राजकीय घडामोडींवर चर्चासत्र घेण्यात आले.
चर्चासत्रात भारत सरकारची ‘अग्निपथ’ योजना, शिवसेनेत पडलेली फूट आणि मानव अधिकार कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांना झालेली अटक ह्या मुद्द्यांवर मुख्यत्वे चर्चा केली गेली. अग्निपथ योजनेवर सरकारने गरीब कामगार घरांतून येणाऱ्या युवकांच्या भविष्याशी केलेली थट्टा यावर चर्चा केली गेली. अग्निपथ योजनेविरोधात अनेक ठिकाणी युवकांची आलेली प्रतिक्रिया ही बेरोजगारीच्या व्यापक प्रश्नाचाच एक भाग आहे. एकीकडे देशभरात सर्वच क्षेत्रांत जवळजवळ पूर्णपणे पसरलेले ठेकाकरण, रोजगाराची नसलेली हमी, दररोज नोकरीच्या आशेने दारोदारी भटकणारा युवक व दुसरीकडे अंबानी, अडाणी यांसारख्या सरकारचा ‘सिद्धहस्त’ प्राप्त झालेल्या भांडवलदारांची, नेत्या – मंत्र्यांची अहोरात्र वाढत जाणारी संपत्ती हेच दाखवून देते कुठलेही…
सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अग्निपथ योजनेविरोधात अभियान करण्यात आले.
अग्निपथ योजनेला फासीवादी मोदी सरकारच्या खाजगीकरण, कंत्राटीकरणाच्या योजनांचे पुढचे पाऊल समजले पाहिजे. लष्कर आणि निमलष्करी दलात कंत्राटीकरण आणल्याने बेरोजगरीने त्रस्त युवकांचा असंतोष उफाळून आला आहे. आज देशातल्या सगळ्याच तरूणांसमोर रोजगाराचा प्रश्न आ वासून उभा आहे. अशा वेळेस सगळ्या तरुणांनी अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करणाऱ्या तरूणांना पाठिंबा दिला पाहिजे आणि रोजगाराच्या अधिकारासाठी संघटित झाले पाहिजे. नौजवान भारत सभा ही मागणी करत आहेत की: 1. ‘अग्निपथ’ योजनेला तात्काळ कचरापेटी दाखवावी कारण हा देशातील युवकांच्या रोजगाराच्या प्रमुख स्रोतावर हल्ला आहे आणि त्यांच्या ठेकेदारीकरणाची तयारी आहे. 2. सर्व सैनिकी आणि अर्धसैनिकी दलांमध्ये तसेच केंद्रीय सशस्त्र…
राहुल सांकृत्यायन यांच्या स्मृतिदिनी (14 एप्रिल) नौजवान भारत सभेतर्फे ‘राहुल सांकृत्यायन साहित्य वाचन दिवस व चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते.
राहुल सांकृत्यायन यांच्या स्मृतिदिनी (14 एप्रिल) नौजवान भारत सभेतर्फे ‘राहुल सांकृत्यायन साहित्य वाचन दिवस व चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते. ह्यात राहुल सांकृत्यायन यांनी लिहिलेले विविध साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले होते ज्यात तुम्हारी क्षय, दिमागी गुलामी, भागो नही दुनिया को बदलो, घुमक्कड शास्त्र, वोल्गा ते गंगा, साम्यवाद ही क्यों, स्तालिन जीवनी, इत्यादी पुस्तकांचा समावेश होता. सहभागी सर्वांनी वेगवेगळे लेख वाचून शेवटी घेण्यात आलेल्या चर्चा सत्रात आपले वाचतांना आलेले अनुभव, मत मांडले.
महा विद्रोही राहुल सांकृतायान यांच्या जन्मदिवस (9 एप्रिल) व स्मृतिदिनािमित्त (14 एप्रिल) नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे चर्चा सत्र घेण्यात आले.
चर्चा सत्रात प्रथमत राहुल सांकृतायान यांच्या जीवन प्रवासाचा थोडक्यात परिचय करून देण्यात आला व नंतर त्यांनी लिहिलेला ‘ तुमच्या समाजाचा ह्रास’ हा लेख वाचून त्यावर चर्चा करण्यात आली. आज घराघरात परिचित असावी अशी ही व्यक्ती असून देखील भांडवली व्यवस्थेसाठी त्यांचे विचार घातक असल्याने भांडवली विचारधारेचा प्रचार प्रसार करणाऱ्या संपूर्ण प्रणालीने त्यांना घराघरात पोहचू दिले नाही. आज समाजात धार्मिक, जातीय द्वेष पसरवण्याचे काम युद्धस्तरावर होत असतांना, तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली असतांना, श्रीमंत – गरीब दरी दिवसेंदिवस वाढत असतांना, गरीब – कष्टकरी जनतेचे अतोनात हाल होत असतांना राहुल सांकृतायान यांचे विचार समाजाला…
