नौजवान भारत सभा, मुंबई तर्फे “सलीम लंगडे पे मत रो” चित्रपटाचे स्क्रिनिंग आणि चर्चा !!

 नौजवान भारत सभेतर्फे शहीद भगतसिंह वाचनालय, मानखुर्द, मुंबई येथे दिनांक 21 जानेवारी रोजी सईद अख्तर मिर्झा दिग्दर्शित “सलीम लंगडे पे मत रो” चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात आले. देशातील वाढता धार्मिक उन्माद आणि त्यामागील राजकारणाबद्दल हा चित्रपट भाष्य करतो. 1989 साली प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटाची प्रासंगिकता आजही धडधडीत जाणवते. जातीधर्मांमध्ये द्वेष वाढवणे, आणि मंदिर मशिदीच्या मुद्द्यांना वापरून लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आज जोमाने सुरू आहे. चित्रपट उत्कृष्ट पद्धतीने दाखवतो की कसे कामगारांच्या मुलांना गुंडगिरीकडे नियोजनबद्ध पद्धतीने वळवले जाते. शाळांच्या वाढत्या फीज कामगारांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवतात आणि बेरोजगारीची टांगती तलवार सतत भविष्यावर…

“राम के नाम” डाक्यूमेंट्री स्क्रिनिंग

दि. 22 जानेवारी रोजी अहमदनगर येथे नौभास कडून आनंद पटवर्धन द्वारे दिग्दर्शित प्रसिद्ध डाक्यूमेंट्री “राम के नाम” चे स्क्रिनिंग करण्यात आले. देशात वाढत असलेल्या सांप्रदायिक तणावाच्या काळात जेव्हा राम मंदिर निर्माणाच्या निमित्ताने ‘प्राण प्रतिष्ठा’ करत असताना दुसरीकडे मात्र वाढती महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षणाचे बाजारीकरण व एकंदरीतच सर्वच बाजूने जनतेच्या लुटीला वाढवले जात आहे व जनतेला त्याच्या मुख्य मुद्यापासून भरकटवण्यासाठी धर्माचे राजकारण उभे केले जात आहे. तेव्हा ही डाक्यूमेंट्री 1980 ते 90 च्या दशकात धार्मिक फासीवादी ताकतींने बाबरी मशीद तोडत धार्मिक उन्माद पसरवत दंगलीचे जे राजकारण उभे केले ज्यात अडीच हजार…

नौजवान भारत सभा, महाराष्ट्र राज्य कमिटीची मासिक मीटिंग आज दिनांक 22/01/2024 रोजी पार पडली.

 या मीटिंग मध्ये मागील महिन्यातील नौभासच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. कमिटीमधील सदस्यांनी येणाऱ्या दोन महिन्यात भगतसिंग जन अधिकार यात्रेचे प्रचार अभियान चालवण्यावर विशेष भर देण्याचे मान्य केले. तसेच नौभासची सदस्यता संख्या वाढवण्यासाठी युवकांच्या समस्यांवर आधारित ऑनलाईन चर्चासत्र चालवण्याचा ठराव मीटिंग मध्ये पारित केला गेला. महाराष्ट्रातील नौभासच्या कामांचा रिपोर्ट वेळेवर वेबसाईट आणि सोशल मीडियावर पोस्ट केला जावा यासाठी काही सदस्यांना विशेष जबाबदारी या मीटिंग मध्ये देण्यात आली. एकंदरीत महाराष्टातील नौभास चे काम अधिक गतीपूर्वक चालू करण्याचे नियोजन राज्य कमिटीने या मासिक मीटिंग मध्ये आखले आहे.

नौजवान भारत सभेतर्फे अनेक क्रांतिकारकांना त्यांच्या शब्दांनी प्रेरणा देणाऱ्या, आशेचे कवी (poet of hope) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिध्द टर्किश कवी नाझिम हिकमत यांच्या 122 व्या जन्मदिवशी त्यांना आठवत काव्यवाचन आणि चर्चा आयोजित केली होती

महान मानवता प्रवास करते जहाजेच्या डेकवर रेल्वेच्या थर्ड क्लास डब्ब्यांमध्ये पक्क्या सडकेवर पायी महान मानवता. महान मानवता आठ वाजता कामावर जाते विसाव्या वर्षी लग्न करते चाळीशीपर्यंत मरून जाते महान मानवता पुरेशी भाकरी प्रत्येकासाठी असते महान मानवतेला सोडून भातासोबतही तेच साखरेसोबतही तेच कपड्यांसोबतही तेच पुस्तकांसोबतही तेच पुरेश्या वस्तू असतात सर्वांसाठी महान मानवतेला वगळता. महान मानवतेच्या अंगणात सावली नसते तिच्या वाटेवर दिवे नसतात तिच्या खिडकीला काचा नसतात पण महान मानवतेकडे आशा असते आशेविना तुम्ही जिवंत राहू शकत नाही! – नाझिम हिकमत नौजवान भारत सभेतर्फे अनेक क्रांतिकारकांना त्यांच्या शब्दांनी प्रेरणा देणाऱ्या, आशेचे कवी…

नौजवान भारत सभा, मुंबई द्वारा दि. 7 जनवरी, रविवार के दिन “फ़ासीवाद क्या है?” विषय पर चर्चा सत्र का आयोजन किया गया।

आज फासीवादी ताकतें सत्ता में बैठी है, तब फासीवाद को समझना हमारे लिए एक जरूरी कार्यभार बन जाता है। चर्चासत्र की शुरुआत में साथी अविनाश ने बताया कि एक चिंतक का कहना है कि ‘फासीवाद पर उन सबको चुप रहना चाहिए, जो पूंजीवाद के विषय में नही बोलते है’। ऐसे में हमें अपनी बात पूंजीवाद के विषय से शुरू करनी चाहिए। पूंजीवादी व्यवस्था, एक ऐसी व्यवस्था है जो निजी मालिकाने पर आधारित है, जिसके केंद्र में मालिक का मुनाफ़ा होता है। इस व्यवस्था में मालिकों का पूरा वर्ग आपस में…

9 जानेवारी 24 रोजी फातिमा शेख यांच्या जन्मदिननिमित नौजवान भारत सभा तर्फे ‘भांडवलशाहीने कामगार कष्टकरी जनतेवर नव्यारूपात लादलेली ज्ञानबंदी’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

चर्चासत्राची सुरवात ही “संघर्ष की राह पर” या क्रांतिकारी गीताने करण्यात आले. पुढे नौजवान भारत सभा चे कार्यकर्ता रवी यांनी मांडणी करताना मांडले की, देशातील अल्पसंख्याक भांडवलंदारांचा नफा वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने प्रत्येक क्षेत्रात खाजगीकरण केले आहे. शिक्षणासारख्या मुलभूत क्षेत्रात ही मोठ्याप्रमाणात खाजगीकरण करून सर्व सामान्य कामगार कष्टकरी जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. आज फक्त श्रीमंतांची मुलंच चांगले प्राथमिक शिक्षण, उच्चशिक्षण, तांत्रिक शिक्षण घेण्याचे स्वप्न बघू शकतात. पण सामान्य कामगार कष्टकरी वर्गातील मूल कसंबसं 8वी-10वी पर्यंत शिक्षण घेतात आणि पुढचे शिक्षण घेण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते…

3 जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मदिनानिमित्त

3 जानेवारी सावित्रीबाई फुले जन्मदिनानिमित्त सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य, सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या विचारांची प्रासंगिकता आणि पुरूषसत्ताक समाजामध्ये आज महिलांची स्थिती या मुद्द्यांना घेऊन अहमदनगर येथील सिद्धार्थनगर झोपडपट्टी भागामध्ये घरोघरी अभियान केले गेले आणि काही ठिकाणी लोकांना एकत्र करून चर्चासत्र सुद्धा घेण्यात आले.

भगतसिंग जन अधिकार यात्रा मुंबईमध्ये

“मुंबई, असे शहर जे कधीही झोपत नाही.” अशीच काहीशी ओळख आहे या शहराची आणि मुंबईत पोहोचलेल्या भगतसिंग जनअधिकार यात्रेतील यात्रेकरूंना असेच वाटले. कोणताही आजार, थकवा आणि निराशा ही भगतसिंग जन अधिकार यात्रेच्या क्रांतिकारी हिमतीला मोडू शकली नाही. दररोज सरासरी 15 किलोमीटर चालल्यानंतर, यात्रेकरू शहीद भगतसिंग आणि एक चांगले जग निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इतर क्रांतिकारकांकडून मिळालेली मशाल पुढे नेण्याच्या नव्या संकल्पाने दररोज जागे होतात. मागील आठवड्यात मानखुर्द, गोवंडी, दादर, ठाणे मार्गे यात्रा काढली गेली. ही यात्रा जिकडे जाईल तिचे आपली एक विशिष्ट छाप सोडत आहे. याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर देशव्यापी…

भगतसिंह जन अधिकार यात्रा, आज सोळाव्या दिवसाची जल्लोषात सुरूवात!!

भगतसिंह जन अधिकार यात्रा, आज सोळाव्या दिवसाची जल्लोषात सुरूवात!! बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, धर्मवाद आणि कष्टकरी जनतेच्या लुटीच्या विरोधात! रोजगार, शिक्षण, आरोग्यव्यवस्था, आवास आणि झुंझार जन-एकजुटीसाठी! भगतसिंह जनअधिकार यात्रेचा दुसरा टप्पा प्रचंड उत्साहात आणि क्रांतिकारी जोशात निरंतर सुरू आहे. बंगळुरू येथून सुरू झालेली भगतसिंह जन अधिकार यात्रा आज 25 डिसेंबर रोजी ऐतिहासिक पुणे शहरात पोहोचली. आज यात्रेचा सोळावा दिवस. ही यात्रा आठ हजार किलोमीटरचा प्रवास करीत आणि 80 जिल्ह्यांमधून जात 3 मार्चला दिल्लीत पोहोचेल. आज पदयात्रेची सुरूवात अप्पर डेपो भागातून झाली, चैत्रबन, वीआयटी चौक, महेश सोसायटी, वीआयटी शाळा या मार्गावरून पदयात्रा…

भगतसिंह जनअधिकार पदयात्रा:15 वा दिवस

भगतसिंह जनअधिकार पदयात्रेची आज दिनांक 24 डिसेंबर रोजी 15 व्या दिवशी शहीद भगतसिंह उद्यान, पत्रकार चौक, अहमदनगर येथून “शहीद भगतसिंह अमर रहे”, “इंकलाब झिंदाबाद”च्या नाऱ्यांनी, अनेक विद्यार्थी – तरुणांचे आदर्श आलेल्या शहीदे आझम भगतसिंह यांच्या पुतळ्याला अभिवादन करत जोरदार सुरवात झाली! महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, धर्मवाद यांच्या विरोधात तसेच शिक्षण, रोजगार, आरोग्य, आवासाच्या जनतेच्या मूलभूत अधिकारांसाठी निघालेली यात्रा पुढे अप्पू हत्ती चौक, छबुराव लांडगे चौक, कोंडी मामा चौकापर्यंत जोरदार घोषणा, क्रांतीकारी गीतांच्या गजरात पुढे गेली. भगतसिंह जनअधिकार पदयात्रेच्या सांस्कृतिक टोळीने सामान्य जनतेचा दिवसेंदिवस खिसा कापणाऱ्या महागाईला गीतात सादर प्रस्तुत करणारं गीत…