IIPS, TISS मधील विद्यार्थी, नौजावन भारत सभाच्या कार्यकर्त्यांसह इतर सहयोगी संघटनांनी या मध्ये सहभाग घेतला होता. ‘नौभास’ कडून अविनाशने म्हणणे मांडत असताना सांगितले की, आज संसदेत या विधायकला मंजुरी देण्यात आली आहे हे सर्व आरएसएस च्या विचारा अंतर्गत करण्यात येत आहे. यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत जे हिंदू, सिख, इसाई, जैन, पारसी जे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशावरून भारतात येवून राहत आहेत. त्यांना भारतीय नागरिकत्व दिल जाईल पण, या मध्ये मुस्लिम धर्मियांना जाणीवपूर्वक धर्माच्या आधारावर वगळण्यात आले आहे. काय जे मुस्लिम स्वतःच नागरिकत्व सिध्द करू शकले नाहीत काय त्यांना डीटेन्शन सेंटर…
Category: Protest
वाढत्या महिला आत्याचारा च्या घटना च्या विरोधात ” नौजवान भारत सभेने ” केले प्रतीकात्मक पितृसत्ताक व्यवस्थेचे दहन.
वाढत्या महिला आत्याचारा च्या घटना च्या विरोधात ” नौजवान भारत सभेने ” केले प्रतीकात्मक पितृसत्ताक व्यवस्थेचे दहन. अहमदनगर : दि. ८/१२/२०१९ अहमदनगर सहित संपूर्ण देशभरात वाढ झालेल्या महिला विरोधी अपराधाच्या निषेधार्थ प्रतीकात्मक मनुवादी,भांडवली पितृसत्ताक व्यवस्थेचा पुतळा सिद्धार्थनगर भागातील अण्णाभाऊ साठे चौकात सायंकाळी पाच वाजता दहन करण्यात आला.या कार्यक्रमाला विभागातील महिलां सहित नौजवान भारत सभेच्या अनेक कार्यकर्त्यांनी व शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी नौजवान भारत सभेचे संदीप सकट यांनी हैदराबाद येथील पशुवैद्यक युवती वर झालेल्या बलात्कार व हत्येचा तीव्र शब्दात निषेध केला व सोबतच ज्या चार आरोपींना पोलिसांनी चकमकीत वस्तुतः खोट्या…
अत्याचाराच्या विरोधात मानखुर्द मधील महिला रस्त्यावर…
जब तक स्त्रिया तंग रहेंगी, तब तक जारी जंग रहेंगी। पुरुषसत्ताक मानसिकता व स्त्रियांवरील अन्याय – दिनांक ०५/१२/२०१९ रोजी पि एम जी पी कॉलेनी, साठे नगर, ते लल्लुभाई कंपाऊंड संविधान चौक, मानखुर्द (मुंबई) या ठिकाणी प्रियंका रेड्डी यांना न्याय मिळण्यासाठी व महिला विरोधी अन्याय अत्याचाराच्या वाढत्या घटनाच्या विरोधात मध्ये निषेध रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रलीमध्ये ‘नौजवान भारत सभा’ व इतर सहयोगी संघटनांनी एकत्रित सहभाग घेतला होता
दिनांक ४/१२/२०१९ रोजी साठे नगर, मानखुर्द (मुंबई) मध्ये हैदराबाद येथील २७ वर्षीय महिला डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्या सामूहिक बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ रॅली चे आयोजन करण्यात आले होते
. आज महिलांना दुहेरी गुलामीच्या बंधनात बांधून ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जाचे समजले जाते. एकीकडे महिला पुरुषांची गुलामी करत चूल आणि मुल या चार भिंतीच्या आत जीवन जगत आहेत. तर दुसरीकडे तथाकथित आधुनिक म्हणवली जाणारी भांडवली व्यवस्था वस्तू त्यांना वर्तमानपत्रे, चित्रपट, गाणे, जाहिराती इत्यादी मध्ये एखाद्या विक्रीय वस्तू सारखे सादर करत आहे. दोन्ही बाजूंनी स्त्री स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजातील बरोबरीची घटक म्हणून न स्वीकारता पुरुषांच्या अधिकाराची किंवा उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. हीच स्त्री विरोधी मानसिकता आणि महिलांना उपभोगाची वस्तू बनवून सादर करण्याची मानसिकता पुढे चालून अशा…
16 नोव्हेंबर रोजी पुण्यात पूरग्रस्तांचे आंदोलन.
हलगर्जी प्रशासनाला हलवले ! शनिवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नौजवान भारत सभा आणि आंबिलओढा परिसर पूरग्रस्त नागरिक संघर्ष समिती, पुणे तर्फे अतिरिक्त नुकसान भरपाई, थकीत असलेली रु. 15,000 ची मदत, पंचनामे, वीज बील माफी, शैक्षणिक सामान भरपाई, उपजीविका नुकसान भरापाइ, घरभाडे, इत्यादी प्रश्नांवर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले गेले. आंबिल ओढा परिसरातील 129 दांडेकर पूल, 130 दांडेकर पूल, 133 दांडेकर पूल, 134 दांडेकर पूल, 214 दांडेकर पूल, आंबेडकर वसाहत, टांगेवाला कॉलनी, राजेंद्रनगर , अण्णाभाऊ साठे वसाह्त, येथील शेकडो नागरिक आजच्या आंदोलनामध्ये सामील झाले होते. यापूर्वी…
अतिरिक्त नुकसान भरपाई करिता विविध वसाहतींमधील नागरिक एकजूट
अतिरिक्त नुकसान भरपाई करिता विविध वसाहतींमधील नागरिक एकजूट दिनांक 3 नोव्हेंबार रोजी आंबिल ओढा (पुणे) परिसरातील *129 दांडेकर पूल, 130 दांडेकर पूल, 133 दांडेकर पूल, 134 दांडेकर पूल, 214 दांडेकर पूल, आंबेडकर वसाहत, टांगेवाला कॉलनी, राजेंद्रनगर , अण्णाभाऊ साठे वसाह्त,* येथील 200 पेक्षा जास्त पूरग्रस्त नागरिकांनी मिळून, नौजवान भारत सभेच्या समन्वयाने एकत्र येऊन, निळू फुले सभागृह (साने गुरुजी शाळा परिसर) येथे आंबिल ओढा पुरग्रस्त नागरिक संघर्ष समिती स्थापन केली आहे. सरकार देऊ करत असलेली रु. *15,000 मदत ही अत्यंत अपुरी आहे* आणि उपजिवीका, जीवनावश्यक वस्तू, रोजगार, घर, मुलांचे शालेय साहित्य,…
15 ऑक्टोबर रोजी आंबिल ओढा परिसरातील पुरग्रस्त नागरिकांचे आंदोलन
आंबिलओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समितीतर्फे, तसेच `नौजवान भारत सभे’च्या पाठिंब्याने आज 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. 25 सप्टेंबर रोजीच्या ढगफुटीनंतर आंबिलओढा परिसरामध्ये अनेकांची घरे वाहून गेली, घरांच्या भिंती पडल्या, घरात गाळ साचून सर्व वस्तूंचे नुकसान झाले , मुलांच्या वह्यापुस्तकांपासून ते अंथरूण-पांघरूण सगळे नष्ट झाले, हातावर पोट असलेल्या कष्टकरी जनतेची आयुष्याची कमाई उध्वस्त झाली परंतू 3 आठवड्यांनंतरही सरकारी मदत पोहोचलेली नाही. यामुळे संतप्त असलेल्या नागरिकांना शेवटी आंदोलनाचाच मार्ग धरावा लागला. यावेळी आचारसंहितेचे निमित्त सांगून मेगाफोन न वापरण्याचे आणि घोषणा न देण्याचा आग्रह…
डॉ पायल तडवी जातीय छळ आणि आत्महत्या मुद्द्यावर नौजवान भारत सभा, पुणे तर्फे मंगळवार 28 मे रोजी दांडेकर पूल चौकात निदर्शने करण्यात आली.
नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून या आंदोलनाला आपले समर्थन व्यक्त केले. जातीयवाद मुर्दाबाद, ब्राह्मणवाद मुर्दाबाद, डॉक्टर पायल तडवी यांना आत्महत्येस भाग पडणाऱ्या डॉक्टरांना शिक्षा झालीच पाहिजे, नायर हॉस्पिटल प्रशासन मुर्दाबाद अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.
निंबोडी(अहमदनगर) शाळेतील 3 मूलांच्या प्रशासकिय हत्येचा जाहीर निषेध व जिल्हाधिकारीना निवेदन (नौजवान भारत सभा व दिशा विद्यार्थी संघटनेचे आवाहन)
निंबोडी दुर्घटनेतील प्रभावित विद्यार्थी व पालकांना न्याय मिळावा म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे निदर्शने करण्यात आली.हा एक अपघात नसून प्रशासकीय हत्या असल्याचे यावेळी मांडण्यात आले.ही घटना व या पूर्वीच्या बिहार मधील मध्यान्ह भोजन विषबाधा,कुभकोणम, केरळमधील जळीतकांड, दिल्लीतील सरकारी शाळाची दुरावस्था,देशातल्या कुपोषणात मरणारी ५०००बालके यांच्या संबंधातून न पहाता, केवळ दुर्दैव, अपघात म्हणून पहाणं म्हणजे अजून एका घटनेची वाट बघणं होय.सरकारची असणारी उदासीनता, दुर्लक्ष, अनास्था व बेजबाबदारपणा अशा घटनांना आवतन देत असतो.ओढा किंवा नदी जवळ शाळा असणं हे कारण कधीच नसतं, समुद्रात पुलं बांधता येण्याच्या जमान्यात हे हास्यास्पद कारणं देता येत…
बीआरडी मेडिकल कॉलेज हत्याकाण्ड के विरोध में आज नौजवान भारत सभा व बिगुल मजदूर दस्ता द्वारा मुम्बई के दादर स्टेशन पर प्रदर्शन
गोरखपुर के बीआरडी मेडिकल कॉलेज में एक हफ्ते पहले हुए मासुमों के सरकारी हत्याकाण्ड के विरोध में आज नौजवान भारत सभा व बिगुल मजदूर दस्ता द्वारा मुम्बई के दादर स्टेशन पर प्रदर्शन किया गया। प्रदर्शन के दौरान सैंकड़ों की संख्या में मराठी व हिन्दी पर्चे बांटे गये। 70 बच्चों की मौत हुई, कौन है इसका जिम्मेदार, योगी सरकार योगी सरकार : शिक्षा, स्वास्थ्य सबका अधिकार, बन्द करो इसका व्यापार जैसे नारे लगाते हुए नौजवान भारत सभा के कार्यकर्ताओं ने लोगों के बीच इस घटना की असलियत रखी व स्वास्थ्य के…
