महान जतिविरोधी योद्धा अय्यंकाली यांच्या 158व्या जन्मदिवसानिमित्त नौजवान भारत सभा आणि अखिल भारतीय जाति विरोधी मंचा तर्फे मुंबईतील मानखुर्द – गोवंडी भागात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अय्यंकाली यांनी दमन आणि अत्याचाराविरोधात स्वतः सडकेवर उतरून संघर्ष केला. आज जाती अंतासाठी अश्याच क्रांतिकारी जनांदोलनाची गरज आहे. चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्वांनी अय्यंकाली यांचा वारसा नेहमी लक्षात ठेवून जाति अंताविरोधात क्रांतिकारी लढा उभारण्याचा संकल्प केला.
महान अय्यंकाली यांच्या वारशाला लक्षात ठेवा! क्रांतिकारी जातिअंताच्या आंदोलनाला पुढे न्या!
