चला, सावित्रीबाई फुलेंचा लढा पुढे नेवूयात , नव्या ज्ञानबंदीच्या विरोधात सर्वांना मोफत शिक्षणासाठी कटिबध्द्ध होवूयात…!
आज सावित्रीबाई फुलेंची जयंती. तब्बल 169 वर्षांपूर्वी ब्राम्हण्यवाद्यांशी वैर पत्करून, पुण्याच्या भिडे वाड्यात सावित्री-जोतिबांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. या घटनेला एक क्रांतिकारी महत्व आहे. पिढ्यान् पिढ्या शुद्रातीशूद्रांवर जे अनेकानेक प्रतिबंधां पैकी “ज्ञानबंदी”ने शुद्रातीशूद्र व स्त्रियांचं अतोनात नुकसान केलं आहे. या भूमिकेतून वंचितांसाठी शिक्षणाचा गंभीर प्रयत्न सावित्री-जोतिबा या दांपत्याने केला. हा मनुस्मृतीने कायदेशीर ठरवलेल्या ज्ञानबंदीच्या विरोधातला जोरदार विद्रोह होता. या संघर्षात प्रसंगी दगड, माती, शेणाचा मारा अंगावर झेलूनही न डगमगता दृढतेने सावित्रीबाई शिक्षणाचं हे महत्कार्य करतच राहिल्या.
इंग्रजांनी भारतात ज्या औपचारिक शिक्षणाची सुरुवात केली, त्याचा उद्देश “शरीरानं भारतीय पण मनानं इंग्रज”असणार्या कारकुनाची पैदास करणं हाच होता. जोतिबा–सावित्री यांनी मात्र सातत्यानं वैज्ञानिक व तार्किक शिक्षणाचा आग्रह धरला आणि प्रामुख्यानं प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीची व अग्रक्रमाची भूमिका घेतली.आज मात्र तर्कावर कुठेही न टिकणार्या ज्योतिषशास्त्राला अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा प्रयत्न होतोय. मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवातच अतार्किक आणि अवैज्ञानिक अशा पाठयक्रमांनी होताना आपण पहात आहोत .
जोतिबा-सावित्री शिक्षणाचं हे कार्य सुरू करताना आणि नंतरही प्रस्थापित राज्यसत्तेवर विसंबून राहिले नाहीत , मग तो मुलींच्या शाळेचा प्रयत्न असो, नाहीतर प्रौढ साक्षरतेचे प्रयत्न असोत ,स्वतः पुढाकार घेवून त्यांनी हे काम चालू ठेवलं . अडचणी व संकटांचा सामना अत्यंत धाडसानं आणि धीरानं केला . शिक्षणाच्या क्षेत्रात इतक क्रांतीकारी काम करणार्या सावीत्रीबाईंचा जन्मदिवसच खरा शिक्षक दिन होऊ शकतो पण विपर्यास असा आहे की एका अशा व्यक्तींचा जन्मदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातोय ज्यांच्यावर थिसीस चोरीचा आळ तर आहे शिवाय जो चातुर्वणाच समर्थन करतो.
आज मात्र स्वातंत्रानंतर राज्यसत्तेनं शिक्षणाच्या जबाबदारीपासून अजिबात हात वर केले आहेत आणि 1991 च्या खासगीकरण, उदारीकरणाच्या नीतीसाठी तर शिक्षणाला बाजारात आणून बसवलं आहे. सरकारी शाळांची दैन्यवस्था आणि वारेमाप खाजगी शिक्षण संस्था व विद्यापीठाच्या मनमानी कारभार व अतीव आर्थिक शोषणामुळं अगोदरच हातभर लांब असलेले शिक्षण सामान्य गरिबाच्या क्षमतेबाहेर गेलेय. आज तरी कुठलाही सामान्य माणूस आपल्या पाल्याला डाक्टर, इंजिनियर बनवण्याचं स्वप्न बघू शकत नाही, अशी अवस्था आहे. स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनतरही साक्षरतेचं प्रमाण 64 % च्या आसपासच पोहचलं आहे . आज पुन्हा उच्च शिक्षणाचे आणि एकूणच शिक्षणाचे दरवाजे पैसेवाल्यांसाठीच खुले आहेत .शिक्षणाची अत्यंत सृजनशील व आनंददायी क्रिया, शिक्षण माफीयांची खात्रीलायक सोन्याचं अंड देणारी कोंबडी झाली आहे .सक्तीचं शिक्षण, शिष्यवृत्या व आरक्षण एखाद्या बुजगावण्यागत उभी आहेत. आज पुन्हा एकदा कष्टकर्यांसाठी नव्यानं ज्ञानबंदी आहे. आजच्या प्रसंगी सावित्रीबाईंची आठवण करत असताना त्यांनी सुरू केलेल्या संघर्षाच काय झालंय? याचा विचार करावा लागेल व नव्यानं निर्माण झालेल्या ज्ञानबंदीला धुडकावण्यासाठी तमाम श्रमिकांच्या एकजूटीच आवाहन करत, सर्वाना मोफत शिक्षणासाठीचा संघर्ष पुढे न्यावा लागेल.
सावित्रीबाई स्वतः शिकल्या, सामाजिक प्रश्नांबाबत अतिशय क्रांतिकारी भूमिका तर घेतल्याच, पण जोतिबांच्या मृत्यूनंतरही मागे हटल्या नाहीत, तर अंतिम श्वासापर्यंत जनतेची सेवा करत राहिल्या,आणि अंतीही प्लेगच्या साथीत लोकांची सेवा करतानाच त्यांनी मरण स्वीकारले. त्यांच्या संघर्षाला क्रांतिकारी अभिवादन
ब्राम्हण्यवाद मुर्दाबाद ! भांडवलशाही मुर्दाबाद !
सर्वांना मोफत शिक्षण , सर्वांना काम !
इंकलाब झिंदाबाद !!
नौजवान भारत सभा
सिद्धार्थनगर ,अहमदनगर – 9156323976/8888350333/9657590491/9156824706
मानखुर्द, मुंबई – 9764594057, 9145332849, 9923547074