आम्हा तरुणांना निरोगी शरीर आणि स्वस्थ मन असण्याचा हक्क नाहीये का? सगळीकडे असे म्हटल्या जाते की भविष्य तरुणांच्या हातात आहे, पण आज जेव्हा आपण आपल्या आजुबाजूची परिस्थिती पाहतो तर दिसते की आपले तरुण आधीपेक्षा जास्त निराश, गोंधळलेले आणि एकाकी झाले आहेत. आज आपण एका सडक्या समाजात राहतोय. सार्वजनिक शिक्षणाची ढासळलेली गुणवत्ता आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तरुणांवर, विशेषतः कष्टकरी जनतेतून आलेल्या तरुणांवर आज खूप वाईट परिणाम झाला आहे. शिक्षण अर्ध्यातच लवकर सोडणे आणि नोकरी करणे आज एक सामान्य गोष्ट झाली आहे. ही ढासळत चाललेली सडकी समाजव्यवस्था तरुणांचे भविष्य गोंधळात टाकत आहे. हा…
