एन आर सी, सी ए ए चे अभियान चालवताना कार्यकर्त्यांना मुंबईत मानखुर्द मध्ये पोलिसांनी स्थानबद्ध केले, जनतेच्या दबावाखाली सुटका!
एन आर सी आणि सी ए ए कायद्याच्या विरोधात जनतेमध्ये प्रचार अभियान चालवताना मुंबईत गोवंडी येथे अनिल साठे, अविनाश आणि इतर तीन कार्यकर्त्यांना मानखुर्द पोलिसांनी पकडून स्थानबद्ध केले. हे त्या राज्यात झाले आहे जिथे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी चे सरकार आहे. लोकशाहीचा दिखावा करण्यात भाजप सह हे सर्व पक्ष एकच आहेत हे पुन्हा सिद्ध झाले.
सरकार च्या या लोकशाही विरोधी कृत्याचा नौभास तीव्र निषेध करत आहे. जनतेने सुदधा निर्भय होऊन या गरीब विरोधी कायद्याला निग्रहाने विरोध चालूच ठेवला पाहिजे हे आवाहन.
