28 सप्टेंबर, भगतसिंह जन्मदिवसानिमित्त मागील काही आठवड्यांपासून ‘नौजवान भारत सभा’ तर्फे शहरातील विविध भागात सदस्यता अभियान राबवले जात आहे. भगतसिंहांच्या विचारांचा वारसा आज प्रत्येक तरुण तरुणींपर्यंत पोचला पाहिजे, भगतसिंहांचे देशाला, समाजाला बदलण्याचे, व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न अजूनही पूर्ण झाले नाही, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या तरुण वर्गाने घेतली पाहिजे. जॉब करणारे, महाविद्यालयात शिक्षण घेणारे, बेरोजगार अशा तरूण तरुणींसोबत संवाद साधून, आजच्या जिवंत प्रश्र्नांबद्दल माहिती दिली जात आहे तसेच शिक्षण, रोजगाराच्या अधिकारासाठी संघटित होऊन लढावे लागेल, त्यासाठी नौभास सोबत जोडून घेण्याचे आवाहन केले जात आहे.
पुणे संपर्क: 8956840785
