ओळखा, कोण खरा देशभक्त आहे आणि कोण देशद्रोही?

आज आपण हिटलरच्या अनुयायांचे खरे रूप ओळखले नाही आणि त्यांच्या विरोधात आवाज उठवला नाही, तर उद्या फार उशीर झालेला असेल. देशातील महागाई, बेरोजगारी आणि गरिबीची भीषण परिस्थिती पाहता, तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला न आलेल्या आपल्यापैकी प्रत्येकालाच आज ना उद्या आपल्या हक्कांसाठी आवाज उठवावा लागेल. अशा वेळी प्रत्येकालाच हे सरकार आणि त्याच्या संरक्षणाखाली काम करणाऱ्या गुंडांच्या टोळ्या देशद्रोही ठरवतील. विचार करावाच लागेल, आवाज उठवावाच लागेल. नाहीतर, फार उशीर झालेला असेल.

सांप्रदायिक फासीवाद्यांचे जनतेत फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडा

६७ वर्षांच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ज्यावेळी देशात आर्थिक संकट, महागाई, बेरोजगारी,भूकबळी आणि गरीबी वाढली त्याच वेळी दंगे कां भडकले? सांप्रदायिक शक्ती नेहमी तेव्हाच कां सक्रिय होतात ज्यावेळी देशातील जनतेमध्ये व्यवस्थेच्या विरोधात चीड निर्माण होते? नेहमी मंदिर आणि मशिदीचा आणि धर्मांतरणाचा मुद्दा तेव्हाच कां वर काढला जातो ज्यावेळी देशात एक राजकीय संकट निर्माण होते आणि व्यवस्था धोक्यात येते? मित्रांनो, जरा विचार करा! ६७ वर्षांमध्ये झालेल्या दंग्यांतून कधी आपल्याला काही मिळाले आहे का?गरीब कष्टकरी जनतेसाठी मंदिर मशिद बनणे वा न बनणे हा खरा मुद्दा आहे की महागाई, गरीबी आणि बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे? मित्रांनो, आपण किती काळ या निवडणुकांतील मदाऱ्यांना आपल्याला धर्म आणि जातीच्या नावाने गंडवण्याची संधी देत राहणार?

अहमदनगरमधील नृशंय दलित विरोधी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवा!

अहमदनगरमधील नृशंय दलित विरोधी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवा! दलित मुक्तीच्या महान परियोजनेला अस्मितावाद आणि प्रतीकवादाच्या खड्ड्यातून बाहेर काढा! अहमदनगरमध्ये २१ ऑक्टोबर रोजी एका दलित कुटुंबातील तीन लोकांची करण्यात आलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून विहिरीत फेकून देण्याच्या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेला हादरवून सोडले आहे. तमाम दलितवादी राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी या घटनेकडे एक ‘‘सुवर्णसंधी’’ म्हणून पाहत आहेत व दलितांच्या हिताच्या नावाखाली याचा पुरेपूर राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे भांडवली मिडिया नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा ही घटना दाबून टाकण्याचे काम करीत आहे किंवा ही घटना…