अहमदनगरमधील नृशंय दलित विरोधी अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवा! दलित मुक्तीच्या महान परियोजनेला अस्मितावाद आणि प्रतीकवादाच्या खड्ड्यातून बाहेर काढा! अहमदनगरमध्ये २१ ऑक्टोबर रोजी एका दलित कुटुंबातील तीन लोकांची करण्यात आलेली निर्घृण हत्या आणि त्यानंतर त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे करून विहिरीत फेकून देण्याच्या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेला हादरवून सोडले आहे. तमाम दलितवादी राजकीय पक्ष आपल्या स्वार्थासाठी या घटनेकडे एक ‘‘सुवर्णसंधी’’ म्हणून पाहत आहेत व दलितांच्या हिताच्या नावाखाली याचा पुरेपूर राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे भांडवली मिडिया नेहमीप्रमाणे यावेळीसुद्धा ही घटना दाबून टाकण्याचे काम करीत आहे किंवा ही घटना…