सावित्रीबाई फुलेंचा वारसा जिंदाबाद! सर्वांना समान आणि मोफत शिक्षणाच्या हक्कासाठी पुढे या! आज आपण अशा वेळी सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करत आहोत, जेव्हा दलित आणि कामगार कष्टकरी लोकसंख्येतील बहुसंख्य विद्यार्थी-तरुण शिक्षणाच्या हक्कापासून वंचित आहेत. तसेच शिक्षण व्यवस्थेच्या सतत चाललेल्या खाजगीकरणामुळे सामान्य घरातील मुले शिक्षणाच्या क्षेत्रातून बाहेर ढकलली जात आहेत. 1991 मध्ये सुरू झालेल्या या खाजगीकरणाच्या धोरणाचा कळस मोदी सरकारच्या कार्यकाळात पाहायला मिळत आहे. नव्या शैक्षणिक धोरणांतर्गत शिक्षण हे केवळ श्रीमंतांच्या मुलांपुरतेच मर्यादित झाले आहे. सक्तीचे शिक्षण, शिष्यवृत्ती, आरक्षण या सगळ्याचा लाभ आज सर्वसामान्य कष्टकरी लोकांना मिळत नाही. ज्या शिक्षण बंदी…
