६७ वर्षांच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात ज्यावेळी देशात आर्थिक संकट, महागाई, बेरोजगारी,भूकबळी आणि गरीबी वाढली त्याच वेळी दंगे कां भडकले? सांप्रदायिक शक्ती नेहमी तेव्हाच कां सक्रिय होतात ज्यावेळी देशातील जनतेमध्ये व्यवस्थेच्या विरोधात चीड निर्माण होते? नेहमी मंदिर आणि मशिदीचा आणि धर्मांतरणाचा मुद्दा तेव्हाच कां वर काढला जातो ज्यावेळी देशात एक राजकीय संकट निर्माण होते आणि व्यवस्था धोक्यात येते? मित्रांनो, जरा विचार करा! ६७ वर्षांमध्ये झालेल्या दंग्यांतून कधी आपल्याला काही मिळाले आहे का?गरीब कष्टकरी जनतेसाठी मंदिर मशिद बनणे वा न बनणे हा खरा मुद्दा आहे की महागाई, गरीबी आणि बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा आहे? मित्रांनो, आपण किती काळ या निवडणुकांतील मदाऱ्यांना आपल्याला धर्म आणि जातीच्या नावाने गंडवण्याची संधी देत राहणार?