पोलिसांनी निर्दयीपणे आंदोलनाचे दमन करून शेकडो विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन कापसहेडा सीमा पोलीस ठाण्यात डांबून ठेवले. मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांचा विद्यार्थी-युवकविरोधी चेहरा पुन्हा एकदा उघडकीस! पारदर्शक परीक्षा पध्दती आणि भ्रष्टाचारमुक्त नोकरभरती हा आमचा हक्क आहे, पोलिसांच्या दडपशाहीने आमचा संघर्ष थांबणार नाही! पेपरफुटी आणि भरतीतील हेराफेरीच्या विरोधात भगतसिंह जनअधिकार यात्रेअंतर्गत दिशा-नौभासचे आंदोलन सुरूच राहणार!
